शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दुर्लक्ष केल्यानेच देशात कोरोनाची दुसरी लाट: RSS सरसंघचालक मोहन भागवतांनी सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 07:49 IST

कोरोनाच्या या गंभीर संकटाच्या काळात लोकांमध्ये सकारात्मता वाढावी, त्यांच्यात आत्मविश्वास यावा या हेतूने संघाच्या वतीने ‘पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड’ ही व्याख्यानांची मालिका आयोजित केली जात आहे

नवी दिल्ली : डॉक्टरांनी वारंवार सावधानतेचा इशारा दिल्यानंतरही कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सरकार तसेच प्रशासन आणि लोकांनीही काहीसे दुर्लक्ष केल्याने देशापुढे सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर संकट ओढ‌वले आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी व्यक्त केले. तज्ज्ञ आता देशात तिसरी लाटही येऊ शकते असे सांगत असतील तर त्याला अजिबात घाबरून न जाता तयारीने या संकटाला सामोरे जात हे युद्ध जिंकले पाहिजे, असे आवाहनही मोहन भागवत यांनी नागरिकांना केले.

कोरोनाच्या या गंभीर संकटाच्या काळात लोकांमध्ये सकारात्मता वाढावी, त्यांच्यात आत्मविश्वास यावा या हेतूने संघाच्या वतीने ‘पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड’ ही व्याख्यानांची मालिका आयोजित केली जात आहे. यातील व्याख्यानात मोहन भागवत बोलत होते. या ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात भागवत म्हणाले की, देशाच्या सरकार आणि लोकांनी दुर्लक्ष केल्यानेच देशात कोरोनाची दुसरी लाट भविष्याच्या विचार करून लोकांनी तसेच सरकारने सध्या सुरु असलेल्या घडामोडींमधून योग्य तो बोध घेतला पाहिजे. देशाला भेडसावत असलेल्या सगळ्या अडचणींना बाजूला सारत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सगळ्यांनी आत्मविश्वासाने उभे राहिले पाहिजे. 

यावेळी मोहन भागवत यांनी नागरिकांना कायम वैज्ञानिकतेचा आधार घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, तुमच्यापर्यंत येणाऱ्या कोणत्याही नव्या विचाराचे वैज्ञानिकतेच्या आधारावर परीक्षण करूनच मगच त्याचा स्वीकार करा. संघाच्या वतीने ११ मे पासून या व्याख्यानांचे आयोजन केले जात आहे. शुक्रवारी आयोजित केलेल्या व्याख्यानात विप्रोचे ग्रुपचे संस्थापक अझिम प्रेमजी, आध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांनीही आपले विचार मांडले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMohan Bhagwatमोहन भागवत