शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या पुस्तकांचा शोध; वाचनप्रेरणा दिनानिमित्त विशेष उपक्रम

By admin | Updated: October 15, 2015 02:59 IST

वाचन प्रेरणा दिनानिमित्त शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी राज्यातील काही लेखक, पत्रकार, वाचक व सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आयुष्याला वळण देणारी किंवा प्रभावित करणारी तीन पुस्तके कोणती

अहमदनगर : वाचन प्रेरणा दिनानिमित्त शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी राज्यातील काही लेखक, पत्रकार, वाचक व सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आयुष्याला वळण देणारी किंवा प्रभावित करणारी तीन पुस्तके कोणती’ असा प्रश्न करत घेतलेल्या शोधातून ८०० पेक्षा जास्त पुस्तकांची यादी तयार झाली आहे. यातून निवडक २२५ पुस्तकांची यादी करण्यात आली आहे़ राज्यातील आजी-माजी मंत्र्यांसह अनेकांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या पुस्तकांची नावे सांगितली. माणसाच्या आयुष्यावर पुस्तक परिणाम करते म्हणजे नेमके काय करते, याचा शोध घेण्याचा प्रयत्न यानिमित्त केला आहे, असे कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ‘मराठीत गेली अनेक वर्षे वाचली जाणारी पुस्तकेच डिजिटल काळातही प्रभावित करत आहेत, असे या यादीवरून लक्षात येते़ या माध्यमातून उच्च अभिरुची असणारे आणि उत्कृष्ट इंग्रजी वाचन करणारे अनेक वाचक भेटले,’ असे कुलकर्णी यांनी सांगितले. राजन गवस, सुनील कर्णिक, सुबोध जावडेकर, लक्ष्मण माने, भानू काळे, नंदा खरे, अरुण गद्रे, जयंत पवार, अतुल देऊळगावकर, शोभा भागवत, जयराज साळगावकर, विनोद शिरसाठ, अवधूत परळकर, हेमंत कर्णिक, राजीव तांबे, प्रमोद मुनघाटे अशा अनेकांनी त्यांना पुस्तके सुचविली. (प्रतिनिधी)>> शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, माजी शिक्षणमंत्री व ‘लोकमत’चे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा व बाळासाहेब थोरात यांनी तीन पुस्तके सांगितली़ तावडे यांनी शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’, रिचर्ड बचचे ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सिगल’ आणि एकनाथ रानडे यांचे ‘सेवा साधना’ ही पुस्तके आयुष्यावर प्रभाव टाकणारी वाटतात, असे सांगितले. माजी मंत्री व ‘लोकमत’चे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांना मिच अल्बोमचे ‘थर्सडे विथ मॉरी’, पंडित नेहरू यांचे ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’ आणि रा़ भा़ पाटणकर यांचे ‘अपूर्ण क्रांती’ ही पुस्तके जीवनावर प्रभाव टाकणारी वाटतात़ पुरके यांना ‘तुकारामाची गाथा’ ओशो रजनीश यांचे ‘शिक्षा मे क्रांती’ व बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे ही पुस्तके प्रभावित करून गेली़ बाळासाहेब थोरात यांना मानवेंद्रनाथ रॉय यांचे चरित्र, योगी अरविंदांचे साहित्य आणि गांधींचे ‘सत्याचे प्रयोग’ जीवनाला वळण लावणारे ठरले, असे वाटते.