शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

कलम 370 हटवल्यामुळे जम्मू-काश्मीरला फायदाच होणार- राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 20:11 IST

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं आहे. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यावर मत व्यक्त केलं आहे.

नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं आहे. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यावर मत व्यक्त केलं आहे. जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्याने तेथील नागरिकांना देखील आता देशातील इतर नागरिकांप्रमाणे अधिकार मिळणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले आहे. भारताच्या 73व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करताना ते बोलत होते. 

राष्ट्रपतींनी सांगितले की, जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर आता तेथील लोकांना पूर्ण देशातील नागरिकांप्रमाणेच अधिकार मिळणार आहे. तसेच तेथील रहिवाशी आरक्षण आणि नोकरीचा लाभ घेऊ शकतील. त्याचप्रमाणे तिहेरी तलाक रद्द झाल्याने देशातील मुस्लिम महिलांमध्ये न्याय मिळाल्याची भावना आहे. 

भारत हे एक स्वातंत्र्य राष्ट्राच्या रूपाने 72 वर्षं पूर्ण करत आहे. त्याचप्रमाणे 2 ऑक्टोबरला राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या महात्मा गांधींची 150वी जयंती साजरी करणार आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांनी दाखवलेल्या जनजागृतीचाही त्यांनी उल्लेख केला आहे. निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर पोहचून मतदान केल्याने त्यांनी मतदारांचे मी आभार मानतो. तसेच राज्यसभा आणि लोकसभेत विविध विधेयके पारीत झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदIndependence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारत