शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

कारवरील नियंत्रण सुटून स्कोर्पिओ तलावात कोसळली; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 10:25 IST

पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले. एकाच कुटुंबातील ४ जणांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बिहारच्या गया जिल्ह्यातील वजीरगंज परिसरात रात्री भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या २ मुलांचा समावेश आहे. श्राद्धाच्या कार्यक्रमावरून घरी परतताना ही घटना घडली. सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास हे सर्व स्कोर्पिओ कारमधून जात असताना दखिनगावातील तलावात त्यांची कार कोसळली. यावेळी कारमधील ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर वाहन चालकाने कसा बसा त्याचा जीव वाचवला. 

मृतकांमध्ये ४० वर्षीय शशिकांत शर्मा, ३८ वर्षीय पत्नी रिंकी देवी, १७ वर्षीय मुलगा सुमित कुमार आणि ९ वर्षीय मुलगा बाळकृष्ण यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तलावातील चौघांचे मृतदेह बाहेर काढले. तोपर्यंत अपघातग्रस्त कुटुंबाच्या नातेवाईकांनाही ही बातमी कळवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले. एकाच कुटुंबातील ४ जणांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वाचवा-वाचवा ओरडत होता ड्रायव्हर

अपघातातील कार चालवणारा युवक सिंटू कुमार या दुर्घटनेतून थोडक्यात वाचला आणि बाहेर येऊन वाचवा-वाचवा जोरदार ओरडत होता. ड्रायव्हरचा आवाज ऐकून जवळील हॉटेलमधील लोक तिथे पोहचले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी गावकरी आणि जेसीबीच्या मदतीने स्कोर्पिओ तलावाच्या बाहेर काढली परंतु तोपर्यंत कारमध्ये बसलेल्या चौघांचा जीव गुदमरुन मृत्यू झाला.

या घटनेतील मृत शशिकांत शर्मा हे परिसरातील प्रमुख शेतकरी नेते होते. त्यांचा मोठा मुलगा सुमित राजकारणात सक्रीय होता. गावातील एकाच कुटुंबातील ४ जणांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या चौघांचे मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवले असता गावकऱ्यांना रुग्णवाहिका थांबवत त्याला विरोध केला. कुटुंबातील कोणीच वाचलं नाही मग पोस्टमोर्टम कशाला असा सवाल गावकऱ्यांनी केला. ही घटना कळताच शशिकांतची वृद्ध आईची तब्येत ढासळली. त्यांच्यावरही स्थानिक डॉक्टरांनी उपचार केले.  

टॅग्स :Accidentअपघात