शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कारवरील नियंत्रण सुटून स्कोर्पिओ तलावात कोसळली; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 10:25 IST

पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले. एकाच कुटुंबातील ४ जणांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बिहारच्या गया जिल्ह्यातील वजीरगंज परिसरात रात्री भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या २ मुलांचा समावेश आहे. श्राद्धाच्या कार्यक्रमावरून घरी परतताना ही घटना घडली. सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास हे सर्व स्कोर्पिओ कारमधून जात असताना दखिनगावातील तलावात त्यांची कार कोसळली. यावेळी कारमधील ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर वाहन चालकाने कसा बसा त्याचा जीव वाचवला. 

मृतकांमध्ये ४० वर्षीय शशिकांत शर्मा, ३८ वर्षीय पत्नी रिंकी देवी, १७ वर्षीय मुलगा सुमित कुमार आणि ९ वर्षीय मुलगा बाळकृष्ण यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तलावातील चौघांचे मृतदेह बाहेर काढले. तोपर्यंत अपघातग्रस्त कुटुंबाच्या नातेवाईकांनाही ही बातमी कळवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले. एकाच कुटुंबातील ४ जणांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वाचवा-वाचवा ओरडत होता ड्रायव्हर

अपघातातील कार चालवणारा युवक सिंटू कुमार या दुर्घटनेतून थोडक्यात वाचला आणि बाहेर येऊन वाचवा-वाचवा जोरदार ओरडत होता. ड्रायव्हरचा आवाज ऐकून जवळील हॉटेलमधील लोक तिथे पोहचले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी गावकरी आणि जेसीबीच्या मदतीने स्कोर्पिओ तलावाच्या बाहेर काढली परंतु तोपर्यंत कारमध्ये बसलेल्या चौघांचा जीव गुदमरुन मृत्यू झाला.

या घटनेतील मृत शशिकांत शर्मा हे परिसरातील प्रमुख शेतकरी नेते होते. त्यांचा मोठा मुलगा सुमित राजकारणात सक्रीय होता. गावातील एकाच कुटुंबातील ४ जणांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या चौघांचे मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवले असता गावकऱ्यांना रुग्णवाहिका थांबवत त्याला विरोध केला. कुटुंबातील कोणीच वाचलं नाही मग पोस्टमोर्टम कशाला असा सवाल गावकऱ्यांनी केला. ही घटना कळताच शशिकांतची वृद्ध आईची तब्येत ढासळली. त्यांच्यावरही स्थानिक डॉक्टरांनी उपचार केले.  

टॅग्स :Accidentअपघात