शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

दहशतवादी अबू दुजाना एन्काउंटर : काश्मीर खो-यात मोबाइल इंटरनेट सेवा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 15:23 IST

श्रीनगर, दि. 1 - सुरक्षा रक्षकांच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू दुजानाचा खात्मा झालेला आहे. अबू दुजानाच्या खात्म्यानंतर खबरदारी म्हणून काश्मीर खो-यामध्ये मंगळवारी शाळा व कॉलेज बंद करण्यात आले.  शाळा-कॉलेजांसोबत मोबाइल इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुजानाच्या खात्म्यानंतर काही लोकांकडून काश्मीरच्या काही ठिकाणी दगडफेक व घोषणाबाजीच्याही घटना समोर आल्या ...

श्रीनगर, दि. 1 - सुरक्षा रक्षकांच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू दुजानाचा खात्मा झालेला आहे. अबू दुजानाच्या खात्म्यानंतर खबरदारी म्हणून काश्मीर खो-यामध्ये मंगळवारी शाळा व कॉलेज बंद करण्यात आले.  शाळा-कॉलेजांसोबत मोबाइल इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुजानाच्या खात्म्यानंतर काही लोकांकडून काश्मीरच्या काही ठिकाणी दगडफेक व घोषणाबाजीच्याही घटना समोर आल्या आहे. दरम्यान, आता येथील परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीर खो-यात हिंसाचार उफाळून येऊ नये, यासाठी शाळा-कॉलेज व इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.  

दरम्यान,  अबु दुजानाच्या खात्म्यामुळे भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले. अबू दुजाना भारतीय लष्कराच्या रडारवर होता. अखेर त्याला कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले. अबू दुजाना दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर होता. विशेष म्हणजे दुजानाचा खात्मा होण्यात त्याच्या मोबाइल फोनची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी शोध मोहीम राबवली होती. त्यावेळी पळून जाण्यात दुजानाला यश आले होते. परंतु पसार होत असताना त्याचा मोबाइल गाडीत राहिला. त्यामुळे सुरक्षा जवानांच्या हाती दहशतवादी हालचालींबाबत मोठा पुरावा लागला. या मोबाइलच्या आधारे लष्करानं संपर्क क्रमांक ट्रॅक  करून दहशतवादी चळवळीची माहिती मिळवली. सुरक्षा दलाचे जवान त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून होते. मंगळवारी जेव्हा तो त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी आला होता, त्यावेळी सुरक्षा दलाला त्याची माहिती मिळाली आणि लष्करानं पुलवामामधल्या बाकरीपोरा येथे त्याला चहूबाजूंनी घेरलं. त्यानंतर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. दुजाना ज्या घरात थांबला होता, तिथून जवळपास 4 तास त्यानं एकदाही गोळीबार केला नाही. लष्करानं त्या घरावर रॉकेट लाँचर सोडले. त्याच वेळी अबू दुजानासह आरिफ ललहारीचाही खात्मा झाला.

सीआरपीएफ 182 बटालियन, 183 बटालियन, 55 राष्ट्रीय रायफल्स आणि एसओजीच्या टीमनं मिळून ही कारवाई केली होती. तत्पूर्वी 19 जुलैलासुद्धा लष्करानं अबू दुजानाला घेरलं होतं. पुलवामातल्या बंदेरपुरा गावात लष्कर आणि एसओजीच्या जवानांनी अबू दुजानाला पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र दुजाना त्यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांना चकमा देऊन फरार होण्यात यशस्वी ठरला होता.  भारतीय लष्कराने अबू दुजानावर 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. दरम्यान, काश्मीर खो-यात लष्करानं ऑपरेशन ऑलआऊट राबवलं आहे. या ऑपरेशनअंतर्गत लष्करानं दहशतवाद्यांची यादी तयार केली  आहे. त्याच पार्श्वभूमीवर लष्करानं वेगवेगळ्या ठिकाणी ऑपरेशनही राबवलं आहे. या ऑपरेशनअंतर्गत लष्करानं आतापर्यंत 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.