शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पुन्हा शाळाबा‘ मुलांचे मेगा सर्वेक्षण

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

शिक्षणमंत्र्यांचा निर्णय : मुंबईत झाली बैठक

शिक्षणमंत्र्यांचा निर्णय : मुंबईत झाली बैठक
नागपूर : महाराष्ट्र शासनाने ४ जुलै रोजी केलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या केलेल्या सर्वेक्षणावर अनेक संस्थांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्र्यांनी शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबाबत बुधवारी मुंबई येथे स्वयंसेवी संस्थांची बैठक घेतली. शिक्षण मंत्र्यांनी अपेक्षित सर्वेक्षण झाले नसल्याचे मान्य करीत शिक्षण विभाग व स्वयंसेवी संस्था यांची एकत्रित राज्यस्तरीय समिती स्थापन करून, नोव्हेंबरमध्ये मेगा सर्वेक्षण करण्याचे बैठकीत जाहीर केले. या बैठकीत भटक्या जमातीसाठी काम करणाऱ्या संघर्ष वाहिनीला बोलावण्यात आले होते. संघर्ष वाहिनीचे संयोजक दीनानाथ वाघमारे यांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणासाठी अंगणवाडी सेविका व आशा वर्करची मदत घेण्याचा सल्ला दिला.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीला शिक्षण संचालक महावीर माने, प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षक आमदार व राज्यातील शाळाबाह्य मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. विदर्भातून संघर्ष वाहिनी व खोजचे ॲड. बंडू साने यांना बोलाविण्यात आले होते. शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या कामामध्ये वीटभट्टी कामगार, ऊस तोडणी कामगार, दगड खाणीत काम करणारे कामगार यांचे प्रामुख्याने सर्वेक्षण करणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. बैठकीत संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे यांनी रोजगारामुळे स्थलांतरण होत असल्याने मोठ्या प्रमाणात मुले शाळाबाह्य असल्याचे सांगितले. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना संपूर्ण गावाची माहिती असते. त्यांच्या मदतीने सर्व कुटुंबाचे, मुलांचे सर्वेक्षण करण्यात यावे. यात मुलांचे नाव, जात, वय, वर्ग, शाळेची माहिती नोंदविण्यात यावी. सर्वेक्षणामुळे शाळेच्या पटावर असणाऱ्या व पटावर असून गैरहजर असणाऱ्या मुलांची संपूर्ण माहिती अहवालात येईल. या अहवालाची तपासणी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष करावी. हे दोन्ही रिपोर्ट सरकारला सादर झाल्यावर २०११ मध्ये झालेल्या पटपडताळणीच्या धर्तीवर शालेय शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश न करता, इतर शासकीय कर्मचारी अथवा स्वयंसेवी संस्थांकडून प्रत्यक्ष पटपडताळणी करावी. या तिन्ही रिपोर्टनंतर प्रत्यक्षात किती मुले शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास येईल. २०११ मध्ये झालेल्या पटपडताळणीत २० लाख मुले शाळाबाह्य असल्याचे उघडकीस आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या भूमिकेवर शिक्षणमंत्र्यांनी रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी तात्पुरते वसतिगृह, ब्रिज कोर्स, हंगामी शाळा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.