शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

शाळेला उशीर होतोय, मोदीजी लक्ष द्या !

By admin | Updated: October 15, 2015 02:21 IST

रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम रखडल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन शाळेत पोहोचण्यात होणाऱ्या विलंबाकडे तिसरीत शिकणाऱ्या एका आठ वर्षांच्या

बेंगळुरू : रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम रखडल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन शाळेत पोहोचण्यात होणाऱ्या विलंबाकडे तिसरीत शिकणाऱ्या एका आठ वर्षांच्या चिमुकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-मेलने पत्र पाठवून लक्ष वेधले आणि काय पंतप्रधान कार्यालयानेही(पीएमओ) लागलीच आदेश पाठवत कारवाई सुरू केली आहे. वायव्य जंक्शनवरील वाहतुकीची कोंडी हजारो वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याकडे एका विद्यार्थ्याने लक्ष वेधल्यानंतर पीएमओनेही संवदेनशील प्रतिसाद देत रेल्वेला या प्रश्नात लक्ष घालण्याचा आदेश दिला. गोरागुंटेपल्या जंक्शनजवळील रेल्वे क्रॉसिंगवर बांधण्यात येत असलेल्या फ्लायओव्हरमुळे वाहतुकीची कोंडी दैनंदिन झाली आहे. परिणामी विद्यारण्यापुरा येथे राहणाऱ्या अभिनव नावाच्या या मुलाला यशवंतपूर येथील नॅशनल पब्लिक स्कूल या त्याच्या तीन कि.मी. अंतरावरील शाळेत पोहोचण्यासाठी ४५ मिनिटांचा अवधी लागतो. संरक्षण मंत्रालयाकडून निधी मिळण्यास विलंब झाल्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे. वाहनांच्या प्रदूषणामुळे केवळ लोकांच्या प्रकृतीवरच नव्हे तर माझ्या अभ्यासावरही परिणाम झाला आहे, असे अभिनवने पत्रात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)