शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

पीएम किसान सन्मान निधीमध्ये गडबड-घोटाळा, रजिस्ट्रेशन न करताच खात्यात येताहेत पैसे

By बाळकृष्ण परब | Updated: December 16, 2020 11:30 IST

PM Kisan Sanman Nidhi News : गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली होती.

ठळक मुद्देप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये हे तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातातया योजनेमध्ये गडबड-घोटाळा होत असल्याच्या बातम्या वारंवार येत असतातआता तर ज्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली नाही, अशा लोकांच्या खात्यातही या योजनेचे पैसे जमा होत असल्याचे समोर आले आहे

नवी दिल्ली - गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये हे तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. मात्र या योजनेमध्ये गडबड-घोटाळा होत असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. अनेक ठिकाणी अपात्र लोकांच्या खात्यात पैसे जमा होतात. आता तर ज्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली नाही, अशा लोकांच्या खात्यातही या योजनेचे पैसे जमा होत असल्याचे समोर आले आहे.मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत UIDAI आणि TRAI चे माजी प्रमुख असलेल्या रामसेवक शर्मा यांच्या बँक खात्यामध्ये यावर्षी पीएम किसान सन्मान योजनेमधून तीन हप्त्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत. मात्र शर्मा यांनी या योजनेसाठी आपल्या नावाची नोंदणी केली नव्हती. मी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठेही नोंदणी केलेली नव्हती. तरीही माझ्या नावाची नोंद झाली आहे. याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकाने ओळख न पटवता खाते पात्र कसे ठरवले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.शर्मा यांनी सांगितले की, पीएन किसान सन्मान निधी योजनेंतर्गत माझ्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये तीन वेळा पाठवण्यात आले. शर्मा यांच्या नावाने हे खाते ८ जानेवारी रोजी उघडण्यात आल होते. तसेच ते सुमारे नऊ महिने अ‍ॅक्टिव्ह होते. अखेर २४ सप्टेंबर रोजी हे खाते डिअ‍ॅक्टिव्हेट झाले. उत्तर प्रदेशमधील फिरोझाबाद जिल्ह्यात एक शेतकरी म्हणून माझे नाव रजिस्टर झाले होते. दरम्यान, याची माहिती मिळाल्यानंतर मी याबाबत बँकेला कळवले आहे. मात्र त्याचे अद्याप उत्तर मिळालेले नाही. मी या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहे कारण मी प्राप्तिकर भरतो, असे त्यांनी सांगितले.अभिनेता भगवान हनुमान, आयएसआय गुप्तहेर महबूब अख्तर आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या नावानेसुद्धा पीएम किसान योजनेची खाती बनली आहेत. त्यांची आधारकार्ड उपलब्ध आहेत. हनुमानच्या खात्यात सहा हजार, महबूब अख्तरच्या खात्यात चार हजार तर रितेश देशमुखच्या खात्यात या योजनेचे दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाMONEYपैसाfraudधोकेबाजी