शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

Satya Pal Malik: “गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार, आवाज उठवला म्हणून मला हटवलं”: सत्यपाल मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 09:06 IST

Satya Pal Malik: जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात झाल्यानंतर मलिक यांची २०१९ मध्ये गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली हाेती. 

ठळक मुद्देगोव्यातील भाजप सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सपशेल अपयशीगोवा सरकारने राबवलेली घर-घर रेशन ही योजना अव्यवहारीपंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत दिली माहिती

नवी दिल्ली: मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी गोव्यातील भाजप सरकारवर मोठे गंभीर आरोप केले आहेत. गोव्यातील प्रमोद सावंत (Pramod Sawant) सरकारने कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही. या वक्तव्यावर ही ठाम आहे, असे सांगत गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार होत असून, यासंदर्भात आवाज उठवल्यामुळेच मला तेथून हटवण्यात आले, असा गंभीर आरोप सत्यपाल मलिक यांनी केला आहे. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात झाल्यानंतर मलिक यांची २०१९ मध्ये गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली हाेती. सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारबाबत केलेले गंभीर दावे आणि आरोपांनंतर एकच खळबळ उडाली असल्याचे सांगितले जात आहे.

गोव्यातील भाजप सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सपशेल अपयशी ठरले असून, यावर मी ठाम आहे. गोवा सरकारने जे काही केले, त्यात मोठा भ्रष्टाचार होता. गोवा सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळेच मला राज्यपाल पदावरून हटवण्यात आले. मात्र, मी लोहियावादी आहे. चरण सिह यांचा सहवास मला लाभला आहे. कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार सहन करणार नाही, अशी ठाम भूमिका सत्यपाल सिंह यांनी मांडली. 

पंतप्रधान मोदींना याबाबत दिली माहिती

गोवा सरकारने राबवलेली घर-घर रेशन ही योजना अव्यवहारी होती. एका कंपनीच्या सांगण्यावरून ही योजना राबवली गेली होती. या कंपनीने सरकारला पैसेही दिले. काँग्रेस नेत्यांसह अनेकांनी याबाबत चौकशी करण्याची विनंती मला केली होती. त्यानुसार चौकशी केली आणि त्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली, असेही मलिक यांनी सांगितले. तसेच कोरोना काळात गोव्यातील दाबोळी विमानतळाजवळ असलेल्या खाणीतील काम बंद करण्याचा सल्ला सरकारला दिला होता. मात्र, सरकारने ऐकले नाही आणि नंतर तोच परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला, असा दावा मलिक यांनी केला आहे. देशातील लोकं आजही सत्य बोलायला घाबरतात, असे मलिक यांनी म्हटले आहे. ते टीव्ही टुडेशी बोलत होते. 

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव आणि मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याने केंद्र सरकारची गाेची झाली आहे. मलिक यांना राम माधव आणि मुंबईतील एका कंपनीच्या सूचनेनुसार ३०० काेटी रुपयांची लाच देऊ केल्याचा आराेप हाेत आहे. मात्र,  या प्रकरणाच्या चाैकशीचे आदेश कसे द्यावे, अशा कात्रीत सरकार अडकले आहे. मलिक यांनी दाेन वर्षांनी हे प्रकरण उकरून का काढले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राम माधव हे त्यावेळी भाजपचे सरचिटणीस आणि जम्मू आणि काश्मीरचे प्रभारी हाेते.  

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाPoliticsराजकारण