शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Satya Pal Malik: “गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार, आवाज उठवला म्हणून मला हटवलं”: सत्यपाल मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 09:06 IST

Satya Pal Malik: जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात झाल्यानंतर मलिक यांची २०१९ मध्ये गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली हाेती. 

ठळक मुद्देगोव्यातील भाजप सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सपशेल अपयशीगोवा सरकारने राबवलेली घर-घर रेशन ही योजना अव्यवहारीपंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत दिली माहिती

नवी दिल्ली: मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी गोव्यातील भाजप सरकारवर मोठे गंभीर आरोप केले आहेत. गोव्यातील प्रमोद सावंत (Pramod Sawant) सरकारने कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही. या वक्तव्यावर ही ठाम आहे, असे सांगत गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार होत असून, यासंदर्भात आवाज उठवल्यामुळेच मला तेथून हटवण्यात आले, असा गंभीर आरोप सत्यपाल मलिक यांनी केला आहे. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात झाल्यानंतर मलिक यांची २०१९ मध्ये गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली हाेती. सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारबाबत केलेले गंभीर दावे आणि आरोपांनंतर एकच खळबळ उडाली असल्याचे सांगितले जात आहे.

गोव्यातील भाजप सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सपशेल अपयशी ठरले असून, यावर मी ठाम आहे. गोवा सरकारने जे काही केले, त्यात मोठा भ्रष्टाचार होता. गोवा सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळेच मला राज्यपाल पदावरून हटवण्यात आले. मात्र, मी लोहियावादी आहे. चरण सिह यांचा सहवास मला लाभला आहे. कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार सहन करणार नाही, अशी ठाम भूमिका सत्यपाल सिंह यांनी मांडली. 

पंतप्रधान मोदींना याबाबत दिली माहिती

गोवा सरकारने राबवलेली घर-घर रेशन ही योजना अव्यवहारी होती. एका कंपनीच्या सांगण्यावरून ही योजना राबवली गेली होती. या कंपनीने सरकारला पैसेही दिले. काँग्रेस नेत्यांसह अनेकांनी याबाबत चौकशी करण्याची विनंती मला केली होती. त्यानुसार चौकशी केली आणि त्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली, असेही मलिक यांनी सांगितले. तसेच कोरोना काळात गोव्यातील दाबोळी विमानतळाजवळ असलेल्या खाणीतील काम बंद करण्याचा सल्ला सरकारला दिला होता. मात्र, सरकारने ऐकले नाही आणि नंतर तोच परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला, असा दावा मलिक यांनी केला आहे. देशातील लोकं आजही सत्य बोलायला घाबरतात, असे मलिक यांनी म्हटले आहे. ते टीव्ही टुडेशी बोलत होते. 

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव आणि मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याने केंद्र सरकारची गाेची झाली आहे. मलिक यांना राम माधव आणि मुंबईतील एका कंपनीच्या सूचनेनुसार ३०० काेटी रुपयांची लाच देऊ केल्याचा आराेप हाेत आहे. मात्र,  या प्रकरणाच्या चाैकशीचे आदेश कसे द्यावे, अशा कात्रीत सरकार अडकले आहे. मलिक यांनी दाेन वर्षांनी हे प्रकरण उकरून का काढले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राम माधव हे त्यावेळी भाजपचे सरचिटणीस आणि जम्मू आणि काश्मीरचे प्रभारी हाेते.  

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाPoliticsराजकारण