शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

Satya Pal Malik: “PM मोदींना घाबरत नाही, थेट आव्हान देऊ शकतो”; सत्यपाल मलिकांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 12:15 IST

Satya Pal Malik: शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ते हिंसाचाराचा मार्ग स्वीकारू शकतात. दिल्लीने शेतकऱ्यांशी पंगा घेऊ नये, असा सल्ला सत्यपाल मलिक यांनी दिला.

जोधपूर: गेल्या अनेक दिवसांपासून मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. तसेच कृषी कायद्यासह अनेकविध मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर मलिक सातत्याने निशाणा साधतानाही दिसत आहेत. अशातच आता जोधपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना थेट टक्कर देऊ शकतो, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. 

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास, ते त्यांना पटवून देण्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करू शकतात. केंद्राने शेतकऱ्यांशी लढा देऊ नये. ते धोकादायक लोक आहेत, असा माझा दिल्लीला सल्ला आहे, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना हवे ते मिळेल. चर्चेतून मार्ग निघाला नाही, तर ते मोठा लढा देतील आणि लढ्यातूनही काही निष्पन्न झाले नाही तर ते हिंसाचारही करतील, असे सत्यपाल मलिक यांनी सांगितले.

दिल्लीहून फोन येऊ शकतो

केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात सुमारे वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देत मलिक म्हणाले की, शेतकऱ्यांची तोंडे बंद करता येणार नाहीत. आपल्या मागण्या कशा पूर्ण करायच्या हे त्यांना बरोबर माहिती आहे. या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन सुरू करणार, तसे झाल्यास 'दिल्लीहून फोन' येऊ शकतो, असे सत्यपाल मलिक यांनी सूचित केले. यानंतर बोलताना मलिक म्हणाले की, मी दिल्लीत दीड खोलीच्या घरात राहतो. त्यामुळे मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदींना आव्हान देऊ शकतो. यापूर्वीही जेव्हा सत्यपाल मलिक पंतप्रधानांना भेटले होते, तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अवघ्या पाच मिनिटात भांडण झाले होते. 

दरम्यान, माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या अंगरक्षकांनी केलेल्या हत्येचा संदर्भात बोलताना राज्यपाल मलिक म्हणाले की, मी त्यांना सांगितले की, शीख आणि जाट काहीही विसरत नाहीत. तुम्ही त्यांना काहीतरी देऊन पाठवावे. त्यांना इंदिराजींचीही आठवण सांगितली होती, असे ते म्हणाले. जोधपूरमध्ये मारवाड जाट महासभेच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सत्यपाल मलिक उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणFarmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकार