शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

Satpuda tiger project: सातपुडा व्याघ्र प्रकल्प अबाधित होणार, गावे इतरत्र करणार पुनर्वसित; सरकारने लागू केले होते धोरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 07:59 IST

Satpuda tiger project: वन्यजीवांसाठी भारतातील सर्वोत्कृष्ट वसतिस्थानपैकी एक असलेले सातपुडा व्याघ्र प्रकल्प नजीकच्या भविष्यात गावरहित होणार आहे. याच व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग असलेल्या बोरी अभयारण्याच्या हद्दीतून गेल्या आठवड्यात स्थानांतरित केलेले सुपलई हे शेवटचे गाव होय.

- अभिलाष खांडेकरभोपाळ : वन्यजीवांसाठी भारतातील सर्वोत्कृष्ट वसतिस्थानपैकी एक असलेले सातपुडा व्याघ्र प्रकल्प नजीकच्या भविष्यात गावरहित होणार आहे. याच व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग असलेल्या बोरी अभयारण्याच्या हद्दीतून गेल्या आठवड्यात स्थानांतरित केलेले सुपलई हे शेवटचे गाव होय.होशंगाबाद जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पातील ५५ गावांमुळे वाघांच्या संरक्षणात अडचणी निर्माण होत आहेत. या व्याघ्र प्रकल्पात ७० वाघ आढळले असून, येथील वाघांची संख्या लवकरच वाढण्याची शक्यता आहे.

व्याघ्र प्रकल्पातील गावे इतरत्र पुनर्वसित करण्यासाठी भारत सरकारने एक धोरण लागू केले होते. अलीकडच्या भरपाई योजनेनुसार एका युनिटला (कुटुंबातील एक प्रौढ व्यक्ती) व्याघ्र प्रकल्पातून स्थानांतरित केल्यास १५ लाख रुपये मिळतात.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण विस्थापित कुटुंबांना देशभरातील वन विभागामार्फत भरपाई देते.

सातपुडा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक एल. के. कृष्णमूर्ती यांनी ‘लोकमत’ला फोनवरून सांगितले की, देशातील काही अभयारण्यांपैकी गावरहित होणारे बोरी वन्यजीव अभयारण्य एक आहे. व्याघ्र संर्वधानाच्यादृष्टीने हे मोठे यश आहे. यामुळे मनुष्य आणि प्राणी यांच्यातील संघर्ष कमी होईल.माजी क्षेत्रीय संचालक आर. पी. सिंह यांनी काही वर्षांपूर्वी इतरत्र स्थानांतरित करण्याची योजना सुरू केली होती. सुपलई गाव इतरत्र पुनर्वसित करण्याचे स्वागत केले आहे. उद्यान व्यवस्थापनातील एक मोठे यश आहे. त्यामुळे भारतातील वाघांचे संरक्षण करण्यासाठी मदत होईल. सातपुडा व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित क्षेत्रातून ८ हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहेत.

टॅग्स :Tigerवाघ