शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

Satpuda tiger project: सातपुडा व्याघ्र प्रकल्प अबाधित होणार, गावे इतरत्र करणार पुनर्वसित; सरकारने लागू केले होते धोरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 07:59 IST

Satpuda tiger project: वन्यजीवांसाठी भारतातील सर्वोत्कृष्ट वसतिस्थानपैकी एक असलेले सातपुडा व्याघ्र प्रकल्प नजीकच्या भविष्यात गावरहित होणार आहे. याच व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग असलेल्या बोरी अभयारण्याच्या हद्दीतून गेल्या आठवड्यात स्थानांतरित केलेले सुपलई हे शेवटचे गाव होय.

- अभिलाष खांडेकरभोपाळ : वन्यजीवांसाठी भारतातील सर्वोत्कृष्ट वसतिस्थानपैकी एक असलेले सातपुडा व्याघ्र प्रकल्प नजीकच्या भविष्यात गावरहित होणार आहे. याच व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग असलेल्या बोरी अभयारण्याच्या हद्दीतून गेल्या आठवड्यात स्थानांतरित केलेले सुपलई हे शेवटचे गाव होय.होशंगाबाद जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पातील ५५ गावांमुळे वाघांच्या संरक्षणात अडचणी निर्माण होत आहेत. या व्याघ्र प्रकल्पात ७० वाघ आढळले असून, येथील वाघांची संख्या लवकरच वाढण्याची शक्यता आहे.

व्याघ्र प्रकल्पातील गावे इतरत्र पुनर्वसित करण्यासाठी भारत सरकारने एक धोरण लागू केले होते. अलीकडच्या भरपाई योजनेनुसार एका युनिटला (कुटुंबातील एक प्रौढ व्यक्ती) व्याघ्र प्रकल्पातून स्थानांतरित केल्यास १५ लाख रुपये मिळतात.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण विस्थापित कुटुंबांना देशभरातील वन विभागामार्फत भरपाई देते.

सातपुडा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक एल. के. कृष्णमूर्ती यांनी ‘लोकमत’ला फोनवरून सांगितले की, देशातील काही अभयारण्यांपैकी गावरहित होणारे बोरी वन्यजीव अभयारण्य एक आहे. व्याघ्र संर्वधानाच्यादृष्टीने हे मोठे यश आहे. यामुळे मनुष्य आणि प्राणी यांच्यातील संघर्ष कमी होईल.माजी क्षेत्रीय संचालक आर. पी. सिंह यांनी काही वर्षांपूर्वी इतरत्र स्थानांतरित करण्याची योजना सुरू केली होती. सुपलई गाव इतरत्र पुनर्वसित करण्याचे स्वागत केले आहे. उद्यान व्यवस्थापनातील एक मोठे यश आहे. त्यामुळे भारतातील वाघांचे संरक्षण करण्यासाठी मदत होईल. सातपुडा व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित क्षेत्रातून ८ हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहेत.

टॅग्स :Tigerवाघ