शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उपग्रहभेदी क्षेपणास्त्र काँग्रेसच्याच काळात झाले होते पूर्ण विकसित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 05:13 IST

उपग्रहाचा वेध घेणारे क्षेपणास्त्र (अग्नी-५) विकसित केल्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत असले तरी प्रत्यक्षात काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातच हे तंत्रज्ञान पूर्ण विकसित झाले होते.

नवी दिल्ली : उपग्रहाचा वेध घेणारे क्षेपणास्त्र (अग्नी-५) विकसित केल्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत असले तरी प्रत्यक्षात काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातच हे तंत्रज्ञान पूर्ण विकसित झाले होते.उपग्रहाचा वेध घेणारे क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या संरक्षण संशोधन व विकास विभाग (डीआरडीओ) व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) संयुक्त प्रस्तावास तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी २००८ सालीच परवानगी दिली होती. २००९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा सत्तेत आल्यानंतर डॉ. मनमोहनसिंग यांनी क्षेपणास्त्र विकसित कार्यक्रमास प्रोत्साहन दिले. जानेवारी २००७ मध्ये चीनने क्षेपणास्त्राने एका उपग्रहाचा वेध घेतला होता. भारतासह सर्वच आशियाई देशांवर त्यामुळे दबाव वाढला. भारताने त्यास प्रत्युत्तराची तयारी २००८ पासूनच सुरू केली. मात्र, २०१० साली अमेरिकेने उपग्रह शस्त्रास्त्रांच्या वापरासंबंधी निर्बंध घालण्याचे संकेत दिले होते. भारताच्या उपग्रह भेदणाऱ्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर (ज्याची चाचणी बुधवारी झाली) आंतरराष्ट्रीय दबाव वाढला.आंतरराष्ट्रीय दबावावर ‘डिप्लोमसी’साठी डॉ. मनमोहनसिंग यांनी २०१० साली ‘अवकाश सुरक्षा समन्वय समूह’ (एसएससीजी) स्थापन केला होता. आंतरराष्ट्रीय समूहाकडून येणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देण्याची या गटाची जबाबदारी होती. आंतरराष्ट्रीय दबाव कमी करण्यात यश आल्याने २६ एप्र्रिल २०१२ रोजी उपग्रह भेदणारे क्षेपणास्त्र भारताने स्वबळावर विकसित केले होते.तेव्हा सरकारने परवानगी दिली नव्हती; जेटलींचा आरोपअरूण जेटली यांनीदेखील यूपीए सरकारला उपग्रह भेदणाºया अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी न करण्यासाठी दोष दिला. तत्कालीन सरकारमध्ये क्षमता व स्पष्टता नव्हती. भारत उपग्रहभेदी क्षेपणास्त्र विकसित करू शकत होता. मात्र, सरकारने त्यास परवानगी दिली नव्हती, असा आरोप जेटलींना केला.

टॅग्स :Mission Shaktiमिशन शक्ती