शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सरदार सरोवर हा ‘अभियांत्रिकी चमत्कार’ !, विरोध करणा-यांचा मोदींनी घेतला ‘समाचार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 01:46 IST

सरदार सरोवर धरण बांधण्यासाठी जेवढ्या अडचणी आल्या, तेवढ्या अडचणी जगातील कोणत्याही प्रकल्पासाठी आल्या नसतील, असे सांगत, हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकीमधील चमत्कार आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

दभोई (गुजरात) : सरदार सरोवर धरण बांधण्यासाठी जेवढ्या अडचणी आल्या, तेवढ्या अडचणी जगातील कोणत्याही प्रकल्पासाठी आल्या नसतील, असे सांगत, हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकीमधील चमत्कार आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. नर्मदा नदीवर उभारण्यात आलेल्या जगातील दुस-या सर्वात मोठ्या धरणाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी मोदी यांनी धरणास विरोध करणा-यांचा समाचार घेतला.बडोदा जिल्ह्यात प्रकल्पापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या दभोई येथे मोदी यांनी एका रॅलीला संबोधित केले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांची उपस्थिती होती. आपल्या ६७व्या वाढदिवशी या प्रकल्पाचे लोकार्पण करताना, मोदी म्हणाले की, ज्या लोकांनी या धरणाला विरोध केला, त्या प्रत्येकाचे नाव माझ्याकडे आहे, पण मी त्यांचा उल्लेख करणार नाही. मला त्यांच्या मार्गाने जायचे नाही. एक वेळ तर अशीही आली होती की, जागतिक बँकेने या प्रकल्पाला कर्ज देण्यास नकार दिला.मोदी म्हणाले की, या योजनेसाठी मी सरदार वल्लभभाई पटेल आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा आभारी आहे. गुजरातमधील पाणी संकट ओळखून वल्लभभाई पटेल यांनी नर्मदा धरणाची कल्पना मांडली होती. बाबासाहेब आंबेडकर यांनीही विकासासाठी अनेक योजनांची कल्पना केली होती. हा प्रकल्प देशाच्या वाढत्या ताकदीचे प्रतीक बनेल. या योजनेसाठी लोकांनी निधी दिला. भारतातील जनतेच्या घामाच्या पैशांनी हा प्रकल्प उभा राहिला आहे. ज्या जागतिक बँकेने नर्मदा धरणासाठी निधी देण्यास नकार दिला. त्याच बँकेने २००१ मध्ये गुजरातमधील कच्छमधील प्रत्येक कामासाठी राज्याला ग्रीन अ‍ॅवार्डने सन्मानित केले. या प्रकल्पामुळे मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातील कोट्यवधी शेतक-यांचे नशीब बदलेल.मोदी म्हणाले की, पूर्व आणि पश्चिम या भारताच्या प्रमुख दोन बाजू आहेत. नर्मदा धरणामुळे पश्चिम भारतात सिंचनाची सोय झाली आहे. त्याचप्रमाणे, पूर्व भारतात विजेची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. नर्मदा धरणाजवळ होणा-या सरदार पटेल यांच्या १८२ मीटर उंचीच्या प्रतिमेचा ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’चा उल्लेख करून, ते म्हणाले की, यामुळे पर्यटनाला मोठी मदत होणार आहे.प्रकल्पाचा इतिहास>नर्मदा धरणाची उंची आता १३८ .६८ मीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. सरदार सरोवर धरणाची कल्पना तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी १९४६ मध्ये मांडली होती. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. त्यानंतर, या प्रकल्पाचे काम मागच्या सात दशकांपासून सुरू होते. या पाण्यावर निर्माण होणा-या विजेचा फायदा गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांना होणार आहे.>जलसत्याग्रह स्थगितगुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नर्मदा नदीवरील ‘सरदार सरोवर’ प्रकल्प, रविवारी राष्ट्राला अर्पण केल्यानंतर, काही तासांनी या प्रकल्पाच्या विरोधात ‘नर्मदा बचाव आंदोलन’च्या वतीने मेधा पाटकर यांच्यासह ३० महिलांनी मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात छोटा बरदा गावी शुक्रवारी सुरू केलेला ‘जलसत्याग्रह’ स्थगित केला.जलसंधारण क्षमता५,८६० दशलक्ष घनफूटसिंचन क्षमता१.९०५ दशलक्ष हेक्टर (महाराष्ट्रात उपसा सिंचनाने ३७,५०० हेक्टर)कालव्याचे जाळे७५ हजार किमीजलविद्युत क्षमता१,४५० मेवॉ. (यापैकी २७ टक्के महाराष्ट्राला)> या धरणासाठी एकूण ६.८२ दशलक्ष घनमीटर काँक्रिट वापरले आहे. वापरलेल्या काँक्रिटच्या दृष्टीने अमेरिकेतील ग्रँड कोउले धरणानंतर, हे सर्वात मोठे धरण आहे. या धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग ८५ हजार घनफूट प्रतिसेकंद असेल. त्या दृष्टीने ते चीनमधील गाझेन्बा व ब्राझिलमधील तुकुरी या धरणांनंतर, तिस-या क्रमांकाचे धरण आहे.