शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

युतीबाबत सरसंघाचालकांचे मौन, मोदींवर कौतुकाचा वर्षाव

By admin | Updated: October 3, 2014 15:04 IST

गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेल्या भाजपा- शिवसेना युतीच्या तुटीबाबत एकही शब्द न उच्चारणा-या सरसंघचालक मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर मात्र कौतुकाचा वर्षाव केला.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३ - गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेल्या भाजपा- शिवसेना युतीच्या तुटीबाबत एकही शब्द न उच्चारणा-या सरसंघचालक मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर मात्र कौतुकाचा वर्षाव केला. नागपूर येथे विजयादशमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात बोलताना त्यांनी संपूर्ण राष्ट्राला संबोधित केले. युतीच्या तुटण्याबाबत भागवतांनी चकार शब्दही काढला नाही. मोदींच्या सरकारला केवळ सहा महिने पूर्ण झाले आहेत, देशात नवचैतन्य संचारले आहे, त्यांनी केलेल्या कामगिरीवरून चांगले संकेत मिळत आहेत, असे ते म्हणाले. मात्र असे असले तरी सरकारच्या हातात जादूची कांडी नाही. विकास कामांसाठी केंद्र सरकारला वेळ द्यायला हवा असे सांगत त्यांनी मोदी सरकारवर टीका करणा-यांना सडेतोड उत्तर दिले,
यावेळी त्यांनी देशातील धर्म व संस्कृतीने तोडण्याचे नव्हे तर सर्वांना नेहमी जोडून ठेवल्याचे प्रतिपादन केले.  भारताने कधीही कोणत्याही देशाच्या संस्कृतीवर हल्ला केला नाही अथवा कोणत्याही समुदायाला त्यांचा धर्म वा विचारधारा बदलण्याची सक्ती केली नाही. सर्वांचा स्वीकार करणे व सर्वांना एकत्र घेऊन चालणे हीच आपली संस्कृती आहे, असे ते म्हणाले. भारत हा प्राचीन असून तो इतरांचा मोठा भाऊ आहे, असेही त्यांनी सांगितले. सर्वांना एकत्र घेऊन चाललो तरच देशाचा विकास शक्य आहे. वैयक्तिक स्वार्थामुळे आपले फक्त पतन होते. पश्चिमी राष्ट्रांत जे वातावरण आहे त्याला त्यांचा अहंकार, कट्टरवादी विचारधाराच कारणीभूत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी मंगळ मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व वैज्ञानिकांचे अभिनदंनही केले. 
यावेळी त्यांनी नागरिकांना स्वदेशी वापरण्याचा सल्ला दिला. आपण सरकारकडून अपेक्षा करतो की, देशाने चीनच्या घुसखोरीवर चोख उत्तर द्यायला हवं, मात्र आपण त्याच चीनी वस्तू वापरतो. चीनी वस्तू वापरण बंद केलं तरच आपली अर्थव्यवस्था सुधारेल असे त्यांनी सांगितले. 
दरम्यान सरसंघचालकांचे भाषण दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित करण्यात आले असून त्याला काही लोकांनी आक्षेप घेतल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. एखाद्या धार्मिक संघटनेसाठी केलेला हा सरकारी माध्यमांचा गैरवापर असल्याचे सांगत इतर धर्मीय नागरिकही त्यांचे कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवण्याची मागणी करतील. याविरोधात आवाज उठवायला हवा असे मत गुहा यांनी व्यक्त केले. . सरकारी यंत्रणेचा मोदी सरकार दुरूपयोग करत असल्याची टीका करत सीपीएमनेही यावर नाराजी व्यक्त केली आहे.