शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

युतीबाबत सरसंघाचालकांचे मौन, मोदींवर कौतुकाचा वर्षाव

By admin | Updated: October 3, 2014 15:04 IST

गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेल्या भाजपा- शिवसेना युतीच्या तुटीबाबत एकही शब्द न उच्चारणा-या सरसंघचालक मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर मात्र कौतुकाचा वर्षाव केला.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३ - गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेल्या भाजपा- शिवसेना युतीच्या तुटीबाबत एकही शब्द न उच्चारणा-या सरसंघचालक मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर मात्र कौतुकाचा वर्षाव केला. नागपूर येथे विजयादशमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात बोलताना त्यांनी संपूर्ण राष्ट्राला संबोधित केले. युतीच्या तुटण्याबाबत भागवतांनी चकार शब्दही काढला नाही. मोदींच्या सरकारला केवळ सहा महिने पूर्ण झाले आहेत, देशात नवचैतन्य संचारले आहे, त्यांनी केलेल्या कामगिरीवरून चांगले संकेत मिळत आहेत, असे ते म्हणाले. मात्र असे असले तरी सरकारच्या हातात जादूची कांडी नाही. विकास कामांसाठी केंद्र सरकारला वेळ द्यायला हवा असे सांगत त्यांनी मोदी सरकारवर टीका करणा-यांना सडेतोड उत्तर दिले,
यावेळी त्यांनी देशातील धर्म व संस्कृतीने तोडण्याचे नव्हे तर सर्वांना नेहमी जोडून ठेवल्याचे प्रतिपादन केले.  भारताने कधीही कोणत्याही देशाच्या संस्कृतीवर हल्ला केला नाही अथवा कोणत्याही समुदायाला त्यांचा धर्म वा विचारधारा बदलण्याची सक्ती केली नाही. सर्वांचा स्वीकार करणे व सर्वांना एकत्र घेऊन चालणे हीच आपली संस्कृती आहे, असे ते म्हणाले. भारत हा प्राचीन असून तो इतरांचा मोठा भाऊ आहे, असेही त्यांनी सांगितले. सर्वांना एकत्र घेऊन चाललो तरच देशाचा विकास शक्य आहे. वैयक्तिक स्वार्थामुळे आपले फक्त पतन होते. पश्चिमी राष्ट्रांत जे वातावरण आहे त्याला त्यांचा अहंकार, कट्टरवादी विचारधाराच कारणीभूत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी मंगळ मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व वैज्ञानिकांचे अभिनदंनही केले. 
यावेळी त्यांनी नागरिकांना स्वदेशी वापरण्याचा सल्ला दिला. आपण सरकारकडून अपेक्षा करतो की, देशाने चीनच्या घुसखोरीवर चोख उत्तर द्यायला हवं, मात्र आपण त्याच चीनी वस्तू वापरतो. चीनी वस्तू वापरण बंद केलं तरच आपली अर्थव्यवस्था सुधारेल असे त्यांनी सांगितले. 
दरम्यान सरसंघचालकांचे भाषण दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित करण्यात आले असून त्याला काही लोकांनी आक्षेप घेतल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. एखाद्या धार्मिक संघटनेसाठी केलेला हा सरकारी माध्यमांचा गैरवापर असल्याचे सांगत इतर धर्मीय नागरिकही त्यांचे कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवण्याची मागणी करतील. याविरोधात आवाज उठवायला हवा असे मत गुहा यांनी व्यक्त केले. . सरकारी यंत्रणेचा मोदी सरकार दुरूपयोग करत असल्याची टीका करत सीपीएमनेही यावर नाराजी व्यक्त केली आहे.