शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापन आवश्यक : गौतम गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 01:30 IST

गाजीपूर येथील क्षेपणभूमीची परिस्थिती आणि आसपासच्या भागातील नागरिकांना होणारा त्रास याबाबत गंभीर यांनी चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या स्वच्छतेसाठी कचऱ्याचे व्यवस्थापन आवश्यक असल्याचे पूर्व दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर यांनी सांगितले. गाजीपूर आणि अन्य भागात क्षेपण भूमीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही गंभीर यांनी स्पष्ट केले.

सीआयआय-सीबीआरआयच्या वतीने आयोजित ‘बिल्डिंग ग्रीन रिअल इस्टेट’ सम्मेलनात गंभीर बोलत होते. ते म्हणाले की, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट क्षेत्रानेही स्वच्छतेसाठी अभियान राबवण्याची गरज आहे.

गाजीपूर येथील क्षेपणभूमीची परिस्थिती आणि आसपासच्या भागातील नागरिकांना होणारा त्रास याबाबत गंभीर यांनी चिंता व्यक्त केली आहे. गंभीर यांनी याबाबत इंदौरच्या आयुक्तांचीही भेट घेतली. गंभीर म्हणाले की, माझ्या कार्यकाळात गाजीपूर क्षेपणभूमीबाबत निर्णय घेण्यास प्राधान्य देणार आहे. गंभीर यांनी निवडणूक काळात कचºयापासून वीजनिर्मिती, स्वच्छ यमुना या योजनांवर काम करण्याचे आश्वासन दिले होते. वायु प्रदूषणाबाबत ते म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहन हे भविष्य असून सरकार अनुदान देऊन त्याला पाठिंबा देत आहे.दिल्लीतील बससंख्या कमी होऊन तीन ते चार हजार राहिली आहे. सार्वजनिक परिवहन प्रणालीला बळकटी देण्याची गरज आहे. कचरा व्यवस्थापनाप्रमाणेत महिला सुरक्षेचा प्राधान्याने विचार केला जाणार असून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. स्थानिक क्षेत्र विकास निधी योजनेंतर्गत मिळालेले पाच कोटी पुरेसे नाहीत. उद्योगांना पाठींबा देण्यासाठी या रकमेत आणखी वाढ होण्याची गरज गंभीर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान