शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापन आवश्यक : गौतम गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 01:30 IST

गाजीपूर येथील क्षेपणभूमीची परिस्थिती आणि आसपासच्या भागातील नागरिकांना होणारा त्रास याबाबत गंभीर यांनी चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या स्वच्छतेसाठी कचऱ्याचे व्यवस्थापन आवश्यक असल्याचे पूर्व दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर यांनी सांगितले. गाजीपूर आणि अन्य भागात क्षेपण भूमीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही गंभीर यांनी स्पष्ट केले.

सीआयआय-सीबीआरआयच्या वतीने आयोजित ‘बिल्डिंग ग्रीन रिअल इस्टेट’ सम्मेलनात गंभीर बोलत होते. ते म्हणाले की, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट क्षेत्रानेही स्वच्छतेसाठी अभियान राबवण्याची गरज आहे.

गाजीपूर येथील क्षेपणभूमीची परिस्थिती आणि आसपासच्या भागातील नागरिकांना होणारा त्रास याबाबत गंभीर यांनी चिंता व्यक्त केली आहे. गंभीर यांनी याबाबत इंदौरच्या आयुक्तांचीही भेट घेतली. गंभीर म्हणाले की, माझ्या कार्यकाळात गाजीपूर क्षेपणभूमीबाबत निर्णय घेण्यास प्राधान्य देणार आहे. गंभीर यांनी निवडणूक काळात कचºयापासून वीजनिर्मिती, स्वच्छ यमुना या योजनांवर काम करण्याचे आश्वासन दिले होते. वायु प्रदूषणाबाबत ते म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहन हे भविष्य असून सरकार अनुदान देऊन त्याला पाठिंबा देत आहे.दिल्लीतील बससंख्या कमी होऊन तीन ते चार हजार राहिली आहे. सार्वजनिक परिवहन प्रणालीला बळकटी देण्याची गरज आहे. कचरा व्यवस्थापनाप्रमाणेत महिला सुरक्षेचा प्राधान्याने विचार केला जाणार असून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. स्थानिक क्षेत्र विकास निधी योजनेंतर्गत मिळालेले पाच कोटी पुरेसे नाहीत. उद्योगांना पाठींबा देण्यासाठी या रकमेत आणखी वाढ होण्याची गरज गंभीर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान