शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

नाद करायचा नाय! वसंतदादांच्या नातवाचं संसदेत इंग्रजीतून भाषण; केली ‘ही’ मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 14:50 IST

Sangli MP Vishal Patil Speech In English At Lok Sabha Parliament: राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना विशाल पाटील यांनी इंग्रजीतून मुद्दा मांडत राज्यातील पूरस्थितीबाबत संसदेचे लक्ष वेधून घेतले.

Sangli MP Vishal Patil Speech In English At Lok Sabha Parliament: यंदाची लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी, मुद्द्यांमुळे चांगलीच गाजली. महायुतीतील अनेक दिग्गजांना धक्का बसला. तर महाविकास आघाडीतील बेबनावही पाहायला मिळाला. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत खटके उडाले. अखेर विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकले. लोकसभेचे अधिवेशन सुरू असून, विशाल पाटील यांनी चक्क इंग्रजीतून मुद्दा मांडत महत्त्वाची मागणी केली.

शिक्षण आणि इंग्रजी भाषेवरून निलेश लंके आणि सुजय विखे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर विजयी होत निलेश लंके यांनी थेट इंग्रजीतून शपथ घेतली आणि आश्चर्याचा धक्का देत विरोधकांची तोंडे बंद केली. यातच आता सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनीही बेधडकपणे इंग्रजीतून मुद्दा मांडला आणि भूमिका स्पष्ट केली. खासदार विशाल पाटील यांनी संसदेत पहिले भाषण केले आणि सांगली, कोल्हापूर व सामीवासीयांच्या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला.

सातारा, सांगली व कोल्हापूरमधील प्रश्नांवर भाष्य

विशाल पाटील यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात महाराष्ट्राच्या सातारा, सांगली व कोल्हापूरमधील प्रश्नांना हात घातला. या भागातील पूरस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. सन २००५, २०१९ आणि २०२१ नंतर आजही तीच परिस्थिती आहे. CWC गाईडलाईनुसार या धरणांची उंची वाढविण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. कृष्णा नदीवरील साताऱ्यातील कोयना धरण आणि कर्नाटक व महाराष्ट्र सीमारेषेवरील आलमट्टी धरणासंदर्भात विशाल पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थितीची माहिती देत मोठे नुकसान होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या पूरस्थितीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांचे जीव गेले. या पुरामध्ये जनावरेही वाहून गेली. दगावली, असे सांगत विशाल पाटील यांनी सरकारने यात लक्ष घालावे, अशी मागणी केली.

दरम्यान, या परिस्थितीकडे केंद्रीय जल आयोगाच्या धोरणानुसार धरणातील पाणीसाठ्याबाबतच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. त्यात चार मुद्द्यांचा प्राधान्याने विचार करायला हवा. ज्यात कृष्णा, कोयना, पंचगंगा या नद्यांतील पाणी आणि कोयना, अलमट्टी धरणातील पाणीसाठा याचे ‘रिअल टाइम मॉनिटरिंग’ करणे, पूर व्यवस्थापन आराखडा राबवणे, पूरपट्ट्यात आवश्यक पायाभूत सुविधा देणे आणि महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्यांतील पाटबंधारे विभागाचा समन्वय हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. कारण, या महापुरात मनुष्यबळ, पशुधन, शेतीसह मालमत्तेची मोठी हानी होते. हे टाळण्यासाठी केंद्राने लक्ष द्यायला हवे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात आसाममधील पूरबाधित क्षेत्राचा उल्लेख केला आहे. त्याप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातील पूरबाधित क्षेत्राचा विचार करावा. येथे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे विशाल पाटील म्हणाले. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाMaharashtraमहाराष्ट्र