शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 06:55 IST

अहिंसात्मक सत्याग्रह शेतकऱ्यांना निर्भय बनवितो

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) हल्ल्याची शिकवण देतो, तर अहिंसात्मक सत्याग्रह शेतकऱ्यांना निर्भय बनवितो, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. आरएसएसचा एकजुटीने मुकाबला करून तीन कृषी कायदे मोदी सरकारला रद्द करायला भाग पाडू, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.राजस्थानातील अलवार जिल्ह्यात शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली आहे. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी वरील वक्तव्य केले.टिकैत यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) एका नेत्यास अटक करण्यात आली आहे. अभाविप ही भाजपची विद्यार्थी शाखा आहे.तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या गाझिपूर, सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांकडून तिन्ही कायद्यांना कडाडून विरोध केला जात असून, किमान आधारभूत किंमत या कायद्यामुळे संपुष्टात येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. या कायद्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या संपून शेतकऱ्यांना पूर्णत: उद्योगपतींच्या दयेवर अवलंबून राहावे लागेल, अशी भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत.आम्ही संघाचा एकजुटीने मुकाबला करूराहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, संघ हल्ला करावयास शिकवतो. अहिंसात्मक सत्याग्रह शेतकऱ्यांना निर्भय बनवतो. आम्ही संघाचा एकजुटीने मुकाबला करू. शेतकरीविरोधी तीन कृषी कायदे रद्द केले जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ