शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

"राष्ट्रपतींना नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नव्हते, कारण त्या...", उदयनिधी स्टॅलिन यांचे पुन्हा सनातन धर्मावर वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 08:55 IST

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावरुन उदयनिधी स्टॅलिन केंद्रातील मोदी सरकारवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. 

सनातन धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आलेले तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नाव घेऊन सनातन धर्मावर टीका केली आहे. तसेच, संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावरुन उदयनिधी स्टॅलिन केंद्रातील मोदी सरकारवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. 

बुधवारी (२० सप्टेंबर) आपल्या पक्षाच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले नाही, कारण त्या आदिवासी समाजाचे आहेत आणि विधवा आहेत. हाच सनातन धर्म आहे का? असा सवाल करत उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातनच्या विरोधात आवाज उठवत राहू, असेही यावेळी भाष्य केले. 

जवळपास ८०० कोटी रुपये खर्च करून बांधलेले नवीन संसद भवन हा एक महत्त्वाचा प्रकल्प होता. संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी (भाजप) उद्घाटनासाठी तामिळनाडूतील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रित केले होते, परंतु भारताच्या राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आले नाही. तसेच, आता विशेष अधिवेशनासाठीही त्यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही, असेही उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. 

याशिवाय, उदयनिधी स्टॅलिन यांनी निदर्शनास आणून दिले की, संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडले, तेव्हाही हिंदी अभिनेत्रींना आमंत्रित करण्यात आले होते, मग देशाच्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना का आमंत्रित करण्यात आलेले नाही? राष्ट्रपतींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही कारणांमुळे बाहेर ठेवण्यात आले होते. या घटना म्हणजे अशा निर्णयांवर 'सनातन धर्मा'चा प्रभाव असल्याचे द्योतकच, असा दावाही उदयनिधी स्टॅलिन यांनी केला आहे.

याचबरोबर, सनातनबद्दलच्या आपल्या आधीच्या वक्तव्यावर ठाम राहून उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, "लोकांनी माझ्या डोक्यावर बक्षीस ठेवले आहे, परंतु मी या सर्व गोष्टींना घाबरत नाही. सनातनला संपवण्यासाठी द्रमुकची स्थापना करण्यात आली आणि आम्ही आमचे ध्येय साध्य करेपर्यंत आम्ही थांबणार नाही."

याआधी काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी (2 सप्टेंबर) चेन्नई येथे बोलताना सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली होती. उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते की, सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. जसे की, डासांमुळे डेंग्यू, कोरोना आणि मलेरियासारखे आजार होतात. त्यांचा आपण विरोध करू शकत नाही, त्यांचा नायनाट करावा लागतो. सनातन धर्मही तसाच आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणPresidentराष्ट्राध्यक्ष