शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

सनातन ही दहशतवादी संघटना - आशिष खेतान

By admin | Updated: June 11, 2016 08:23 IST

सनातन ही एक दहशतवादी संघटना असून हिंदू समाजावरील एक कलंक आहे अशी टीका आशिष खेतान यांनी केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मास्टरमाईंड डॉ. वीरेंद्र तावडेला झालेल्या अटकेनंतर आता गुप्तचर संस्थांनी दाभोलकरांच्या फरार मारेक-यांचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते आशिष खेतान यांची ट्विटरवरून केली आहे. तसेच 'सनातन ही एक दहशतवादी संघटना असून हिंदू समाजावरील एक कलंक आहे' अशी टीकाही खेतान यांनी केली.
(डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी पहिली अटक)
  •  
  • डॉ. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) काल (शुक्रवार) अटक केली. दाभोलकर हत्या प्रकरणातील ही पहिलीच अटक आहे. विरेंद्र तावडे हा कान-नाक-घसा तज्ज्ञ आहे. त्याचा पनवेलजवळील कळंबोली येथे दवाखाना आहे. तावडे याचे पनवेलजवळील सनातनच्या आश्रमाजवळच कल्पतरू सोसायटीमध्ये घर आहे. तो हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता आहे. १ जून रोजी सीबीआयने पुण्यातील सारंग अकोलकर आणि तावडे यांच्या घरावर छापे टाकले होते. पुण्याच्या सीबीआय न्यायालयातून सर्च वॉरंट मिळाल्यानंतर तावडे याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये काही संशयास्पद वस्तू सापडल्या होत्या. त्याचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला होता. तसेच अकोलकर आणि तावडे या दोघांचा ई-मेलवरून संपर्क होता, असे तपासात दिसून आले होते.  छाप्यानंतर सीबीआयकडून तावडेला चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. शुक्रवारी चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 
(डॉ.दाभोलकरांच्या खुन्यांचा लागला शोध? CBIचे पुणे, पनवेलमध्ये छापे)
 
याच पार्श्वभूमीवर 'आप'चे नेते आशिष खेतान यांनी काही ट्विटसच्या माध्यमातून याप्रकरणावर भाष्य केले आहे. 'सनातनने उदारमतवादी व धर्मनिरपेक्ष लोकांची एक यादी बनवली असून त्यांचा काटा दूर करण्याचा कट आखला आहे. सनातन ही एक दहशतवादी संघटना असून ती हिंदू समाजावरील एक बट्टा आहे. तावडेच्या अटकेमुळे याप्रकरणी न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणातील सीडी सादर करण्यात आल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात युपीए सरकार अपयशी ठरले' असेही खेतान म्हणाले. 
 
यापूर्वीही खेतान यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या सनातन संस्था व त्यांच्याशी संलग्न असलेल्या हिंदू जनजागरण समितीनेच केली आहे, असा दावा केला होता. राजकारणातील उजव्या घटकांचा समावेश असलेल्या कॉंग्रेस पक्षाने दाभोलकर प्रकरणाची क्रूर चेष्टा केली, अशी टीका करतानाच सनातन संस्थेने गोवा व महाराष्ट्रामध्ये काही बॉंबस्फोट घडविल्याचा आरोपही खेतान यांनी केला होता.