शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

farmers protest : शेतकरी संघटनांकडून नरेंद्र मोदींना पत्र, कृषी कायद्यांवर पुन्हा चर्चा करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 20:40 IST

Samyukta Kisan Morcha Writes to PM Modi to Resume Talks Over Farm Laws : संयुक्त किसान मोर्चाने आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून शेतकऱ्यांशी चर्चा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्दे'संयुक्त किसान मोर्चा शांततापूर्ण आंदोलनावर विश्वास ठेवत असून शांततेत आंदोलन सुरुच ठेवेल.'

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. यातच देशात कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे शेतकरी आंदोलन स्थगित करण्याची चर्चा होत होती, मात्र  हे आंदोलन स्थगित करण्यात येणार नाही, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर, संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पुन्हा कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. (Samyukta Kisan Morcha Writes to PM Modi to Resume Talks Over Farm Laws)

संयुक्त किसान मोर्चाने आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून शेतकऱ्यांसोबत पुन्हा चर्चा सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच, कोरोना संकट काळात शेतकरी कुणाचेही आरोग्य धोक्यात घालत नाहीत. मात्र, हे आंदोलनही मागे घेऊ शकत नाहीत. कारण हे जीवन-मृत्यू आणि येणाऱ्या पिढ्यांचा विषय आहे, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

(कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी 'बनारस मॉडेल', नरेंद्र मोदींवर नवाब मलिकांचा निशाणा)

याचबरोबर, नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याने सरकारने परिपक्वता दर्शविली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांनी फेटाळलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणे, हे देशातील लोकशाही व मानवी नीतिमत्तेच्या विरोधात आहे. संयुक्त किसान मोर्चा शांततापूर्ण आंदोलनावर विश्वास ठेवत असून शांततेत आंदोलन सुरुच ठेवेल.

ज्या तीन कृषी कायद्यांना शेतक-यांनी फेटाळले आहे, ते कायदे कोणत्याही लोकशाही सरकारने रद्द केले असते. तसेच, आतापर्यंत शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी दिली असती, असे किसान मोर्चाने म्हटले आहे. शेतकऱ्यांसोबत गंभीर आणि प्रामाणिक चर्चा पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी आपली (सरकार) आहे, असेही किसान मोर्चाने म्हटले आहे.

(काँग्रेस पक्षाकडून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार- नाना पटोले)

विशेष म्हणजे देश सध्या कोरोनाविरोधात लढा देत आहे. कोरोना संकट काळातच कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करून हजारो शेतकरी अजूनही दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना संकट पाहता शेतकऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित करावे, अशी मागणी होत आहे. पण भारतीय शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्टपणे सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. तसेच, आंदोलन मागे घेतल्यानंतर कोरोना संकट संपेल, करेल असे सरकार लेखी लिहून देऊ शकेल का? असा सवाल राकेश टिकैत यांनी केला आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदीrakesh tikaitराकेश टिकैत