शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

farmers protest : शेतकरी संघटनांकडून नरेंद्र मोदींना पत्र, कृषी कायद्यांवर पुन्हा चर्चा करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 20:40 IST

Samyukta Kisan Morcha Writes to PM Modi to Resume Talks Over Farm Laws : संयुक्त किसान मोर्चाने आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून शेतकऱ्यांशी चर्चा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्दे'संयुक्त किसान मोर्चा शांततापूर्ण आंदोलनावर विश्वास ठेवत असून शांततेत आंदोलन सुरुच ठेवेल.'

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. यातच देशात कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे शेतकरी आंदोलन स्थगित करण्याची चर्चा होत होती, मात्र  हे आंदोलन स्थगित करण्यात येणार नाही, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर, संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पुन्हा कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. (Samyukta Kisan Morcha Writes to PM Modi to Resume Talks Over Farm Laws)

संयुक्त किसान मोर्चाने आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून शेतकऱ्यांसोबत पुन्हा चर्चा सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच, कोरोना संकट काळात शेतकरी कुणाचेही आरोग्य धोक्यात घालत नाहीत. मात्र, हे आंदोलनही मागे घेऊ शकत नाहीत. कारण हे जीवन-मृत्यू आणि येणाऱ्या पिढ्यांचा विषय आहे, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

(कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी 'बनारस मॉडेल', नरेंद्र मोदींवर नवाब मलिकांचा निशाणा)

याचबरोबर, नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याने सरकारने परिपक्वता दर्शविली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांनी फेटाळलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणे, हे देशातील लोकशाही व मानवी नीतिमत्तेच्या विरोधात आहे. संयुक्त किसान मोर्चा शांततापूर्ण आंदोलनावर विश्वास ठेवत असून शांततेत आंदोलन सुरुच ठेवेल.

ज्या तीन कृषी कायद्यांना शेतक-यांनी फेटाळले आहे, ते कायदे कोणत्याही लोकशाही सरकारने रद्द केले असते. तसेच, आतापर्यंत शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी दिली असती, असे किसान मोर्चाने म्हटले आहे. शेतकऱ्यांसोबत गंभीर आणि प्रामाणिक चर्चा पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी आपली (सरकार) आहे, असेही किसान मोर्चाने म्हटले आहे.

(काँग्रेस पक्षाकडून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार- नाना पटोले)

विशेष म्हणजे देश सध्या कोरोनाविरोधात लढा देत आहे. कोरोना संकट काळातच कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करून हजारो शेतकरी अजूनही दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना संकट पाहता शेतकऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित करावे, अशी मागणी होत आहे. पण भारतीय शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्टपणे सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. तसेच, आंदोलन मागे घेतल्यानंतर कोरोना संकट संपेल, करेल असे सरकार लेखी लिहून देऊ शकेल का? असा सवाल राकेश टिकैत यांनी केला आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदीrakesh tikaitराकेश टिकैत