शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

farmers protest : शेतकरी संघटनांकडून नरेंद्र मोदींना पत्र, कृषी कायद्यांवर पुन्हा चर्चा करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 20:40 IST

Samyukta Kisan Morcha Writes to PM Modi to Resume Talks Over Farm Laws : संयुक्त किसान मोर्चाने आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून शेतकऱ्यांशी चर्चा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्दे'संयुक्त किसान मोर्चा शांततापूर्ण आंदोलनावर विश्वास ठेवत असून शांततेत आंदोलन सुरुच ठेवेल.'

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. यातच देशात कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे शेतकरी आंदोलन स्थगित करण्याची चर्चा होत होती, मात्र  हे आंदोलन स्थगित करण्यात येणार नाही, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर, संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पुन्हा कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. (Samyukta Kisan Morcha Writes to PM Modi to Resume Talks Over Farm Laws)

संयुक्त किसान मोर्चाने आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून शेतकऱ्यांसोबत पुन्हा चर्चा सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच, कोरोना संकट काळात शेतकरी कुणाचेही आरोग्य धोक्यात घालत नाहीत. मात्र, हे आंदोलनही मागे घेऊ शकत नाहीत. कारण हे जीवन-मृत्यू आणि येणाऱ्या पिढ्यांचा विषय आहे, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

(कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी 'बनारस मॉडेल', नरेंद्र मोदींवर नवाब मलिकांचा निशाणा)

याचबरोबर, नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याने सरकारने परिपक्वता दर्शविली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांनी फेटाळलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणे, हे देशातील लोकशाही व मानवी नीतिमत्तेच्या विरोधात आहे. संयुक्त किसान मोर्चा शांततापूर्ण आंदोलनावर विश्वास ठेवत असून शांततेत आंदोलन सुरुच ठेवेल.

ज्या तीन कृषी कायद्यांना शेतक-यांनी फेटाळले आहे, ते कायदे कोणत्याही लोकशाही सरकारने रद्द केले असते. तसेच, आतापर्यंत शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी दिली असती, असे किसान मोर्चाने म्हटले आहे. शेतकऱ्यांसोबत गंभीर आणि प्रामाणिक चर्चा पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी आपली (सरकार) आहे, असेही किसान मोर्चाने म्हटले आहे.

(काँग्रेस पक्षाकडून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार- नाना पटोले)

विशेष म्हणजे देश सध्या कोरोनाविरोधात लढा देत आहे. कोरोना संकट काळातच कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करून हजारो शेतकरी अजूनही दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना संकट पाहता शेतकऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित करावे, अशी मागणी होत आहे. पण भारतीय शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्टपणे सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. तसेच, आंदोलन मागे घेतल्यानंतर कोरोना संकट संपेल, करेल असे सरकार लेखी लिहून देऊ शकेल का? असा सवाल राकेश टिकैत यांनी केला आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदीrakesh tikaitराकेश टिकैत