शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

मुलींना संपत्तीत मिळालेला समान हक्क पूर्वलक्षी नाही - सुप्रीम कोर्ट

By admin | Updated: November 3, 2015 04:04 IST

अविभक्त हिंदू कुटुंबाच्या वडिलोपार्जित संपत्तीत मुलींना समान हक्क देण्यासाठी हिंदू वारसा हक्क कायद्यात सुधारणा करण्यात आली असली तरी मुलींना हा हक्क पूर्वलक्षी प्रभावाने

नवी दिल्ली : अविभक्त हिंदू कुटुंबाच्या वडिलोपार्जित संपत्तीत मुलींना समान हक्क देण्यासाठी हिंदू वारसा हक्क कायद्यात सुधारणा करण्यात आली असली तरी मुलींना हा हक्क पूर्वलक्षी प्रभावाने बजावता येणार नाही. हा सुधारित कायदा ज्या दिवशी लागू झाला त्या दिवशी ज्यांचे वडील हयात होते अशाच मुलींना समान हक्क मिळू शकेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.न्यायालयाने म्हटले की, हिंदू मुलींवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी करण्यात आलेली कायद्यातील ही दुरुस्ती लोककल्याणाच्या स्वरूपातील असली तरी ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही. कारण संसदेनेच ही दुरुस्ती पश्चातलक्षी प्रभावाने लागू होईल, असे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे जेव्हा कायद्यात एखादी गोष्ट सरळ भाषेत स्पष्टपणे नमूद केलेली असते तेव्हा त्यातून दुसरा अर्थ काढता येत नाही.न्यायालयाने म्हटले की, हा सुधारित कायदा ९ सप्टेंबर २००५ पासून लागू केला गेला आहे. म्हणजेच अविभक्त हिंदू कुटुंबातील मुलींचा जन्म केव्हाही झालेला असला तरी ज्यांचे वडील या तारखेला हयात होते अशाच मुलींना या नव्या तरतुदीचा आधार घेऊन वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क मागता येईल. ज्यांचे वडील ही दुरुस्ती लागू होण्याआधीच दिवंगत झाले असतील अशा मुलींनी संपत्तीच्या वाटणीसाठी दावा सप्टेंबर २००५ नंतर दाखल केला तरी त्यात या सुधारित तरतुदीचा आधार घेता येणार नाही.न्यायालयाने असेही म्हटले की, हा सुधारित कायदा सप्टेंबर २००५ पासून लागू झाला असला तरी २० डिसेंबर २००४ पूर्वी त्यावेळच्या प्रचलित कायद्यानुसार झालेले वाटणीचे निवाडे हे अंतिम असतील व त्यांचा नव्या कायद्यानुसार फेरविचार होणार नाही, असेही या दुरुस्तीमध्ये स्पष्टपणे नमूद केले गेले आहे. ही तारीख कायदा लागू होण्याच्या आधीची असली तरी यावरून संपूर्ण सुधारित तरतूदही पूर्वलक्षी प्रभावाने लागू होते, असा नाही. सुधारित कायद्याचे विधेयक संसदेत ज्या दिवशी सादर केले गेले तोपर्यंतच्या निवाड्यांना जुन्या कायद्यानुसार अंतिम स्वरूप मिळावे, एवढाच या मागचा उद्देश आहे.(विशेष प्रतिनिधी)मूळ कायदा व कोर्टापुढील वाद१९५६ च्या मूळ हिंदू वारसा हक्क कायद्यात (हिंदू सक्सेशन अ‍ॅक्ट) वडिलोपार्जित संपत्तीत मुलींना कोणताही हिस्सा मिळत नव्हता. त्या कायद्यानुसार अविभक्त हिंदू कुटुंबातील मुलींचा हक्क फक्त स्वत:च्या चरितार्थासाठी रक्कम मिळण्यापुरता किंवा तजवीज करण्यापुरता मर्यादित होता. मात्र केंद्र सरकारने २००५ मध्ये या कायद्याच्या कलम ६ मध्ये दुरुस्ती केली आणि वडिलोपार्जित संपत्तीत मुलींनाही मुलांएवढाच समान वाटा मिळण्याची तरतूद केली.विविध न्यायालयांच्या भिन्न निकालांमुळे होता संभ्रमकायद्यातील या दुरुस्तीचा लाभ मुलींना केव्हापासून मिळू शकतो यावर देशातील विविध उच्च न्यायालयांनी गेल्या सहा-सात वर्षांत भिन्न निकाल दिले होते. याविरुद्ध एकूण २० अपिले सर्वोच्च न्यायालयात केली गेली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालांविरुद्ध केलेल्या सुशीला निवृत्ती रसाळ वि. विष्णू आणि मल्हार हनुमंतराव कुलकर्णी वि. गीता या अपिलांचाही त्यात समावेश होता. यापैकी बेळगावचे दिवंगत नागरिक यशवंत चंद्रकांत उपाध्ये यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधीच्या प्रकाश वि. फुलवती या भावंडांच्या अपिलात न्या. अनिल आर. दवे आणि न्या. आदर्श कुमार गोयल यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे निकाल देऊन कायद्याचा विवाद्य मुद्दा निकाली काढला. इतर अपिले त्यातील तथ्यांनुसार स्वतंत्र निर्णय देण्यासाठी येत्या १५ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहेत.