शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बिहारमध्ये रातोरात २०० कुटुंबांनी ‘असा’ कारनामा केला की राज्य सरकारची झोप उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 11:09 IST

मागासवर्गीय कुटुंबांना सरकारने दिलेले आश्वासन दिले होते. वारंवार लेखी व तोंडी आग्रह करूनही सरकारने याकडे दुर्लक्ष केले.

समस्तीपूर – सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचं राजकारण पेटलेले असताना सुमारे दोनशे कुटुंबांनी सरकारी जमिनीवर कब्जा केला आहे. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने या कुटुंबांनी सरकारी जमीन ताब्यात घेऊन रातोरात झोपड्या उभ्या केल्या. या मागासवर्गीय कुटुंबांनी आपली घरे शासकीय जमिनीवर उभी केली. याबाबत माहिती मिळताच सरकारी यंत्रणेत खळबळ उडाली. निवडणुकीच्या वातावरणात कोणी असं करु शकतं हे कोणालाही वाटले नव्हते.

मतांचे राजकारण

आता या मागासवर्गीय कुटुंबाना जबरदस्तीने सरकारी जमिनीतून काढून टाकता येणार नाही अशी प्रशासनासमोर अडचण आहे, यांना सक्तीने जमिनीवरुन हुसकावून लावले तर विरोधी पक्ष हा मुद्दा लावून धरतील आणि सरकारला मागासवर्गीयविरोधी म्हणून प्रचार करून त्यांचे मते पदरात पाडू शकतात. त्यामुळे प्रशासनाने वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारली आहे.

आश्वासन पूर्ण न केल्यानं सरकारी जमिनीवर कब्जा

मागासवर्गीय कुटुंबांना दिलेलं आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. वारंवार लेखी व तोंडी आग्रह करूनही सरकारने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, ही जमीन सरप्लस म्हणून जाहीर करत ती सरकारच्या विभागांना आणि इतर संस्थांना देण्याचा घाट घातला. ज्यामुळे भूमिहीन कुटुंबांनी सरकारी जमीन ताब्यात घेतली. जिल्ह्यातील उजियारपूरच्या आखा गावात सीपीएम नेते अजय कुमार यांच्या नेतृत्वात दोनशे मागासवर्गीय कुटुंबांनी रायपूर ठाकूरवाडीची जमीन ताब्यात घेतली. या कुटुंबांनी जमिनीवर झोपडी बांधली आणि लाल झेंडा फडकावला. ज्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती आहे.

मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने वादग्रस्त जमिनीच्या ठिकाणी दाखल झाले. याशिवाय जिल्ह्यात मोठ्या संख्येने क्यूआरटी, दंगल विरोधी पथक, महिला पोलीस पथकासह परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता एसडीओ दलसिंहसराय ज्ञानेंद्र कुमार, एसडीपीओ कुंदन कुमार यांच्यासह सर्व अधिकारी या ठिकाणी पोहोचले. प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांनी कब्जा हटवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तणाव पसरला. नंतर प्रशासनाने सीपीएम नेते अजय कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर ३१ ऑगस्टला बैठक घेण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये १३० स्थलांतरित कुटुंबांना कागदपत्रे तपासल्यानंतर ताबा देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.

अवैध कब्जा करणाऱ्यांवर कारवाई करणार

या प्रकरणात प्रशासनाचे अधिकारी संजय कुमार महतो यांनी माहिती दिली की, वरील जमीन भूसंपादन कायद्यानुसार ठाकूरवाडीचे महंत रामशंकर दास यांच्याकडून सरप्लस घोषित करण्यात आली आहे. कोणालाही जमिनीचे वाटप झाले नाही. या प्रकरणात, कोणतेही बांधकाम किंवा व्यवसाय बेकायदेशीर आहे. असे करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. या जागेवर आयटीआय कॉलेज, उजियारपूर पोलीस स्टेशन इमारत आणि पंचायत इमारत बांधण्यासाठी विभागीय कार्यालयामार्फत प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक