शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये रातोरात २०० कुटुंबांनी ‘असा’ कारनामा केला की राज्य सरकारची झोप उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 11:09 IST

मागासवर्गीय कुटुंबांना सरकारने दिलेले आश्वासन दिले होते. वारंवार लेखी व तोंडी आग्रह करूनही सरकारने याकडे दुर्लक्ष केले.

समस्तीपूर – सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचं राजकारण पेटलेले असताना सुमारे दोनशे कुटुंबांनी सरकारी जमिनीवर कब्जा केला आहे. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने या कुटुंबांनी सरकारी जमीन ताब्यात घेऊन रातोरात झोपड्या उभ्या केल्या. या मागासवर्गीय कुटुंबांनी आपली घरे शासकीय जमिनीवर उभी केली. याबाबत माहिती मिळताच सरकारी यंत्रणेत खळबळ उडाली. निवडणुकीच्या वातावरणात कोणी असं करु शकतं हे कोणालाही वाटले नव्हते.

मतांचे राजकारण

आता या मागासवर्गीय कुटुंबाना जबरदस्तीने सरकारी जमिनीतून काढून टाकता येणार नाही अशी प्रशासनासमोर अडचण आहे, यांना सक्तीने जमिनीवरुन हुसकावून लावले तर विरोधी पक्ष हा मुद्दा लावून धरतील आणि सरकारला मागासवर्गीयविरोधी म्हणून प्रचार करून त्यांचे मते पदरात पाडू शकतात. त्यामुळे प्रशासनाने वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारली आहे.

आश्वासन पूर्ण न केल्यानं सरकारी जमिनीवर कब्जा

मागासवर्गीय कुटुंबांना दिलेलं आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. वारंवार लेखी व तोंडी आग्रह करूनही सरकारने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, ही जमीन सरप्लस म्हणून जाहीर करत ती सरकारच्या विभागांना आणि इतर संस्थांना देण्याचा घाट घातला. ज्यामुळे भूमिहीन कुटुंबांनी सरकारी जमीन ताब्यात घेतली. जिल्ह्यातील उजियारपूरच्या आखा गावात सीपीएम नेते अजय कुमार यांच्या नेतृत्वात दोनशे मागासवर्गीय कुटुंबांनी रायपूर ठाकूरवाडीची जमीन ताब्यात घेतली. या कुटुंबांनी जमिनीवर झोपडी बांधली आणि लाल झेंडा फडकावला. ज्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती आहे.

मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने वादग्रस्त जमिनीच्या ठिकाणी दाखल झाले. याशिवाय जिल्ह्यात मोठ्या संख्येने क्यूआरटी, दंगल विरोधी पथक, महिला पोलीस पथकासह परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता एसडीओ दलसिंहसराय ज्ञानेंद्र कुमार, एसडीपीओ कुंदन कुमार यांच्यासह सर्व अधिकारी या ठिकाणी पोहोचले. प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांनी कब्जा हटवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तणाव पसरला. नंतर प्रशासनाने सीपीएम नेते अजय कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर ३१ ऑगस्टला बैठक घेण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये १३० स्थलांतरित कुटुंबांना कागदपत्रे तपासल्यानंतर ताबा देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.

अवैध कब्जा करणाऱ्यांवर कारवाई करणार

या प्रकरणात प्रशासनाचे अधिकारी संजय कुमार महतो यांनी माहिती दिली की, वरील जमीन भूसंपादन कायद्यानुसार ठाकूरवाडीचे महंत रामशंकर दास यांच्याकडून सरप्लस घोषित करण्यात आली आहे. कोणालाही जमिनीचे वाटप झाले नाही. या प्रकरणात, कोणतेही बांधकाम किंवा व्यवसाय बेकायदेशीर आहे. असे करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. या जागेवर आयटीआय कॉलेज, उजियारपूर पोलीस स्टेशन इमारत आणि पंचायत इमारत बांधण्यासाठी विभागीय कार्यालयामार्फत प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक