शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

'रावणही साधुच्या वेषात आला होता, सावध राहा...; अखिलेश यादवांचे योगींवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:32 IST

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Akhilesh Yadav on CM Yogi Adityanath: उत्तर प्रदेश विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर हल्ला चढवला होता. उर्दू भाषेपासून महाकुंभावर केलेल्या खोट्या प्रचारापर्यंत मुख्यमंत्री योगींनी समाजवादी पक्षावर टीकास्त्र डागलं होतं. त्यानंतर आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि कन्नौजचे खासदार अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भगवे कपडे घातल्याने कोणी योगी बनतो का? असा सवाल करत अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगींवर निशाणा साधला.

अखिलेश यादव यांनी कन्नौजच्या दौऱ्यावर भाजप आणि उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. अर्थसंकल्पावरुन भाजपला धारेवर धरताना हे सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करू शकत नसल्याचे अखिलेश यादव म्हणाले. सरकार खते, बी-बियाणे, कीटकनाशके वेळेवर पुरवू शकत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीत सामना करावा लागतोय असा दावा अखिलेश यादव यांनी केला.

महाकुंभाच्या निकृष्ट नियोजनाला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. महाकुंभाची वेळ वाढवण्यात यावी जेणेकरून ज्यांना आजपर्यंत स्नान करता आले नाही त्यांना संधी मिळू शकेल. भाजपचे हे असे सरकार आहे ज्यामध्ये इंजिन आणि डब्बे एकमेकांना धडकत आहेत, असं अखिलेश यादव म्हणाले.

यानंतर त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र डागलं. "भगवे कपडे घालून योगी होत नाही. भारतातील लोकांना रामायण चांगलेच माहिती आहे. रावणही माता सीतेचे अपहरण करण्यासाठी ऋषीच्या वेशात आला होता, हेसुद्धा लोकांना माहिती आहे. संपूर्ण देश आणि राज्याला माहिती आहे. हे सर्व सनातनी लोकांनाही माहीत आहे. हिंदू समाजातील लोकांना माहीत आहे. म्हणून आपण आणि आपण सर्वांनी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे," असंही अखिलेश यादव म्हणाले.

"अशा लोकांपासून सावध राहायला पाहिजे, ज्यांचे वागणे आणि भाषा अत्यंत वाईट आहे. अलोकतांत्रिक भाषा बोलत आहे. समाजवाद्यांना समाजवादाचे काहीच कळत नाही, असे म्हटलं जात आहे. समाजवादी म्हणजे सर्वांना साथ देणे, समाजवादी म्हणजे सर्वांचा आदर करणे, समाजवादी म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालणे. पण आमच्या मुख्यमंत्र्यांना काहीच कळत नाही. कोणतीही माहिती नसलेले हे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यांना लोकशाहीबद्दल विचाराल तर त्यांना त्याचा अर्थही कळत नाही," असाही टोला अखिलेश यादव यांनी लगावला.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवyogi adityanathयोगी आदित्यनाथSamajwadi Partyसमाजवादी पार्टी