शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 05:52 IST

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १९९९ मधील कारगिल युद्धात शहीद झालेल्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

नवी दिल्ली : कारगिल विजय दिनानिमित्त शनिवारी देशभर भारतीय वीर जवानांनी या युद्धात दाखवलेल्या शौर्याला सलामी देण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १९९९ मधील कारगिल युद्धात शहीद झालेल्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तर कारगिलमध्ये सरकारी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना राखी बांधली.

कारगिल क्षेत्रातून पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी तीन महिने चाललेल्या ‘ऑपरेशन विजय’मध्ये प्राणांची बाजी लावून भारतीय जवानांनी लडाखच्या कारगिल भागात असलेल्या हिमाच्छादित शिखरांवर पुन्हा ताबा मिळवला होता. तो दिवस होता २६ जुलै १९९९. 

कठीण परिस्थितीत विजय

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वीर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना या जवानांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शत्रूवर मिळवलेला विजय कायम प्रेरणादायी ठरेल, असे नमूद केले.

सदैव प्रेरणा मिळेल : राष्ट्रपती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या युद्धात बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली. हे बलिदान देशातील नागरिकांना सतत प्रेरणा देत राहील, असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

मालदीव दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनानिमित्त भारतीयांना शुभेच्छा देताना, ही मातृभूमी वीर जवानांच्या अद्वितीय शौर्याचे कायम स्मरण करेल, असे म्हटले आहे. या जवानांनी भारतीय स्वाभिमानाच्या रक्षणासाठी जीवन समर्पित केल्याचे त्यांनी नमूद केले.

 

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनRajnath Singhराजनाथ सिंहDefenceसंरक्षण विभाग