शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

महिन्याला ७५ हजार पगार! भारतातील युवक शेती करण्यासाठी जपानला गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 16:22 IST

भारत सरकारच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२२ पर्यंत भारतातून ५९८ युवक जपानला गेले आहेत.

नवी दिल्ली - निर्मल सिंह रंसवाल १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर जपानला गेला, त्याठिकाणी तो शेती करतो, ऐकून चकीत झाला ना...उत्तराखंडच्या चंपावतमधील निर्मल शेती करण्यासाठी जपानला गेलेला एकमेव भारतीय नाही. जपानच्या एकूण लोकसंख्येपैकी २० टक्क्याहून अधिक लोकसंख्या वृद्ध लोकांची आहे. त्यामुळे तेथील शेती उद्योगावर मोठे संकट उभे राहिले आहे. याच कारणामुळे जपान भारताच्या कानाकोपऱ्यातून कुशल लोक जपानला घेऊन जात आहे. 

आता जपाननं भारत सरकारसोबत एक करार केला आहे. त्या करारानुसार भारतीय युवकांना जपानच्या गरजेनुसार ट्रेनिंग देण्याचं काम हाती घेतले आहे. मागील वर्षी जपान जाणाऱ्या १८ जणांमध्ये निर्मल सिंहचा समावेश होता. यावर्षीही अनेक युवक जपानला जाणार आहेत. अरुणाचल प्रदेशमधील मोनित डोली जो एका रेस्टॉरंटमध्ये काम करायचा. त्याच्याकडे पीजी डिप्लोमाची डिग्री आहे. आता तो जपानच्या नारा शहरात राहतो. 

मोनित सकाळी ३ वाजता उठतो, शेतात जातो. त्याठिकाणी यूनिफॉर्ममध्येच असतो. पायात बूट आणि हातात ग्लव्स घातलेले असतात. कवि लूथरा हे युवकांना रोजगार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत काम करणारी कंसल्टिंग फर्ममध्ये एमडी आहे. ते सांगतात की, जपानला जगातील युवकांची गरज आहे हे सत्य आहे. परंतु कुशल युवकांनाच संधी दिली जाते. केवळ शेती करणाऱ्यांची नव्हे तर इतर क्षेत्रातही युवक हवेत असं त्यांनी म्हटलं. 

भारत सरकारच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२२ पर्यंत भारतातून ५९८ युवक जपानला गेले आहेत. त्या सर्वांनी राष्ट्रीय कौशल्य विभागाकडून ट्रेनिंग घेतले होते. महाराष्ट्रातूनही ३४ युवक जपानला गेल्याची माहिती कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. लोढा म्हणाले की, भारतीय युवकांकडे शेतीचं कौशल्य असून त्यात जपानमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत. तिथे १.२ लाख येन म्हणजेच ७५ हजार रुपये मासिक पगार दिला जातो. त्याचसोबत ओवरटाईमचेही पैसे दिले जातात असं त्यांनी सांगितले.