शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे ५१ वर्षीय माजी आमदार १२ वीची परीक्षा द्यायला पोहोचले, म्हणाले LLB करायचंय अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 10:58 IST

उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (यूपी बोर्ड) इयत्ता १० आणि १२ वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत.

बरेली-

उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (यूपी बोर्ड) इयत्ता १० आणि १२ वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी विविध परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देत आहेत. पण बरेलीतील एका परीक्षा केंद्रावर चक्क एक माजी आमदार इयत्ता १२ वीची परीक्षा देण्यासाठी पोहोचला आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

लॅमिनेशन केलेलं हॉल तिकीट, पाण्याची बॉटल आणि रायटिंग पॅड घेऊन ५१ वर्षीय एक व्यक्ती इयत्ता १२ वीच्या परीक्षेला पोहोचला. या व्यक्तीनं परीक्षा केंद्रावरील सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. कारण ती व्यक्ती दुसरं तिसरं कुणी नसून विभागातील माजी आमदार राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल होते. राजेश मिश्रा हे भाजपाचे माजी आमदार आहेत. 

राजेश मिश्रा यांनी १६ फेब्रुवारी रोजी इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचले. यावेळी परीक्षा केंद्रावरील विद्यार्थी आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या उमेदवाराला पाहून आश्चर्यचकीत झाले. वयाच्या या टप्प्यात शिक्षणाला महत्व दिल्याबद्दल अनेकांनी त्यांचं कौतुकही केलं. 

"परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी मला पाहून आश्चर्यचकीत झाले होते. पण त्यांच्या विभागातील एक राजकीय नेता त्यांच्यासोबत परीक्षेला बसतोय हे पाहून ते आनंदी होते", असं राजेश मिश्रा म्हणाले. 

राजेश मिश्रा २०१७ साली उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यांनी बरेलीच्या बिथरी चैनपूर विधानसभा मतदार संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. पण गेल्या निवडणुकीत भाजपानं मिश्रा यांना तिकीट दिलं नव्हतं. 

आपल्या राजकीय करिअरच्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून माजी आमदार मिश्रा यांनी आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी इयत्ता १२ ची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार शिक्षण पूर्ण केल्यानं त्यांना आपल्या युवा मतदारांशी चांगल्या पद्धतीनं संवाद साधता येईल आणि यामागे एक मोठा उद्देश देखील आहे, असंही ते म्हणाले. 

वकिली करण्याची इच्छामिश्रा म्हणाले की, एक आमदार म्हणून काम करत असताना मला अनेक गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या की जे आर्थिक पातळीवर कमकुवत आहेत. अशांना न्याय मिळत नाही. कारण ते चांगल्या वकिलाचा खर्च करु शकत नाही. अशा लोकांची मदत करण्यासाठी कायद्याचा अभ्यास करण्याचा विचार आहे आणि एलएलबी करण्यासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश