शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शीखविरोधी दंगल: सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा, म्हणाला- 'मी 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:43 IST

पीडित महिला 1984 पासून न्यायाची वाट पाहत होती. आज अखेर राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने माजी काँग्रेस खासदाराला शिक्षा सुनावली.

Sajjan Kumar News :दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने 1984 च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 21 फेब्रुवारी रोजी शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता. दंगलीदरम्यान सरस्वती विहारमधील जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांच्या हत्येशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यावेळी सज्जन कुमार दिल्ली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा खासदार होता. 

फाशीची शिक्षा देण्याची मागणी1984 च्या शीख विरोधी दंगलीत सज्जन कुमारने केलेल्या जमावाच्या हल्ल्यात जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांची 1 नोव्हेंबर 1984 रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मृत जसवंत यांच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सज्जन कुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अनेक वर्षांनंतर आता आज याप्रकरणी आरोपीला शिक्षा झाली आहे. विशेष म्हणजे, दिल्ली दंगलीशी संबंधित आणखी एका प्रकरणात सज्जन कुमार जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

मी 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे...दिल्ली पोलिस आणि पीडितांनी हे प्रकरण दुर्मिळ प्रकरण मानून सज्जन कुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालापूर्वी सज्जन कुमारने शिक्षेत सौम्यतेचे आवाहन केले होते. या प्रकरणात मला फाशीची शिक्षा देण्यास कोणताही आधार नसल्याचे त्याने आपल्या युक्तिवादात म्हटले. सज्जन कुमार म्हणाला की, मी 80 वर्षांचा झालो आहे. वाढत्या वयाबरोबर मी अनेक आजारांशी झुंजत आहे. मी 2018 पासून तुरुंगात आहे. तेव्हापासून मला कोणतीही फर्लो/पॅरोल मिळालेली नाही. तुरुंगात माझी वागणूक नेहमीच चांगली होती, माझ्याविरुद्ध कोणतीही तक्रार आली नाही. त्यामुळे माझ्यात सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी तीनदा खासदार झालो,  अनेक सामाजिक कामे केली, त्यामुळे मी स्वतःला निर्दोष समजतो. न्यायालयाने मानवतावादी पैलू लक्षात घेऊन या प्रकरणात किमान शिक्षेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आरोपीने केली होती.

28 प्रकरणांमध्ये दोषी हिंसाचार आणि त्यानंतरच्या घटनांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नानावटी आयोगाने सांगितले की, दिल्लीत दंगलीच्या संदर्भात 578 एफआयआर नोंदवण्यात आले होते, ज्यामध्ये 2733 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी 240 प्रकरणे “अज्ञात” म्हणून बंद करण्यात आली, तर 250 प्रकरणांमध्ये लोकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. केवळ 28 प्रकरणांमध्ये दोष सिद्ध झाले, ज्यात अंदाजे 400 लोकांना दोषी ठरवण्यात आले. त्यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि खासदार सज्जन कुमार यांच्यावर 1 आणि 2 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्लीतील पालम कॉलनीमध्ये पाच जणांच्या हत्येचा आरोपही होता.  

टॅग्स :delhiदिल्लीCourtन्यायालयdelhi violenceदिल्लीcongressकाँग्रेस