शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

अत्याचारांपासून वाचण्यासाठी मुस्लिम मुलींनी हिंदूशी लग्न करावं, भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 15:24 IST

उलट-सुलट विधानं करुन नेहमी चर्चेत असणाऱ्या भाजपा खासदार साध्वी प्राची यांनी मुस्लिम तरुणींना अजब-गजब सल्ला देऊन नवीन वादाला तोंड फोडले आहे.

नवी दिल्ली - उलट-सुलट विधानं करुन नेहमी चर्चेत असणाऱ्या भाजपा खासदार साध्वी प्राची यांनी मुस्लिम तरुणींना अजब-गजब सल्ला देऊन नवीन वादाला तोंड फोडले आहे. हलाला आणि तिहेरी तलाक प्रथेपासून वाचण्यासाठी मुस्लिम तरुणींनी धर्म बदलून हिंदू तरुणांसोबत लग्न केले पाहिजे, असा अजब सल्ला साध्वी प्राची यांनी दिला आहे. पुढे त्यांनी असंही म्हटलं की, ''इस्लाम धर्म कुप्रथांनी भरलेला आहे, अशा परिस्थितीत धर्म परिवर्तन करुन हिंदूंसोबत लग्न केले तर हलालासारख्या वेदनादायी प्रथांपासून बचाव होऊ शकतो. हिंदू धर्मात स्वतःचा समावेश करुन मुस्लिम महिला आयुष्यभरासाठी अत्याचार आणि धमक्यांपासून स्वतःला वाचवू शकतात''. 

साध्वी इथेच थांबल्या नाही तर पुढे असाही सल्ला दिला की, हिंदू समाजात तिहेरी तलाक किंवा हलालाचा देखील कोणता त्रास नाही. हिंदू धर्मामध्ये विवाह केल्यास तुमचे चांगल्या संस्कारासहित स्वागत होईल. तिहेरी तलाकसंदर्भात साध्वी प्राची म्हणाल्या की, हलाला किंवा धर्मातून बहिष्कृत करण्याची धमकी देणाऱ्या मौलवींना पीडित महिलांनी चपराक लगावली पाहिजे. समाज गलिच्छ करण्याचं काम करणाऱ्या अशा मौलवींना शिक्षा झाली पाहिजे''

दरम्यान, साध्वी प्राची यांच्या विधानामुळे नवीन वाद सुरू झाला आहे. त्यांच्या विधानाला विरोध दर्शवत देवबंदी उलमानं म्हटलंय की, सर्व धर्माचे आपापले वैयक्तिक कायदे असतात, त्यानुसार सर्व जण आपापले आयुष्य जगतात. त्यामुळे हा आमच्या समाजाची बदनामी करण्याचा कट आहे.  

एकूणच साध्वी प्राची यांनी उलटसुलट विधान करत नवीन वाद निर्माण केला आहे. 

टॅग्स :Muslimमुस्लीमHinduहिंदूBJPभाजपा