शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

Gyanvapi Mosque Controversy: “उद्‌ध्वस्त केलेल्या मंदिराविषयी आता बोलण्यात काहीही अर्थ नाही”: सद्गुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 10:18 IST

Gyanvapi Mosque Controversy: वाद वाढवून उपयोग नसून, दोन्ही समाजाने एकत्र बसून यावर तोडगा काढावा, असे सद्गुरू यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीचा वाद (Gyanvapi Mosque Controversy) पुन्हा उफाळून आला आहे. या ठिकाणी शिव मंदिर असल्याचा दावा करत काही हिंदू संघटनांनी वाराणसी न्यायालयात धाव घेत सर्वेक्षण करण्याची मागणी केली. त्याचा अहवालही आता न्यायालयाला सादर करण्यात आला आहे. तर या प्रकरणी मुस्लिम संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दखल देण्यास नकार दिला. यानंतर देशातील राजकीय वर्तुळात अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. यातच आता ज्ञानवापी मशिदीच्या वादासंदर्भात सद्गुरू (Sadhguru) यांनी भाष्य केले असून, उध्वस्त केलेल्या मंदिराविषयी आता बोलून काहीही उपयोग नाही, असे म्हटले आहे. 

मुघलांसह अनेक परकीयांनी भारतावर केलेल्या आक्रमाणांत हजारो मंदिरांची तोडफोड करण्यात आली. आपण त्यांचे संरक्षण करू शकलो नाही. आता त्यांच्याबद्दल बोलण्यात अर्थ नाही. कारण आपण इतिहासाचे पुनर्लेखन करू शकत नाही. दोन्ही समाजाने एकत्र बसून ठरवावे की कोणत्या दोन-तीन ठिकाणी वाद आहे. मग सर्वांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढावा. एकावेळी एकाच वादावर मंथन करून वाद वाढवून उपयोग नाही. काहीतरी घेणे आणि काही देणे आवश्यक आहे. अशा प्रकारे देश पुढे जाऊ शकतो. प्रत्येक वादाला फक्त हिंदू-मुस्लिमच्या नजरेतून पाहण्याची गरज नाही, असे सद्गुरू यांनी नमूद केले. 

भारत सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर

ज्ञानवापी मशिदीच्या वादाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर भाष्य करणे सद्गुरू यांनी टाळले. मी अद्याप या प्रकरणाशी अद्ययावत नाही. याविषयी मला जास्त माहिती नाही, असे सद्गुरू यांनी सांगितले. सद्गुरू मानतात की भारत सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास भारत जगातील एक मोठी शक्ती बनेल. पण यासाठी प्रत्येक मुद्द्यावर वाद घालण्याची गरज नाही, असे सद्गुरू यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. 

ती जागा भारत सरकारची, मशिदीसाठी दिलेली नाही

दरम्यान, वाराणसीतील ज्ञानवापी मशिद खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हिंदू पक्षाकडून १९३६ साली ब्रिटिश सरकारने या जागेसंदर्भात दाखल केलेले एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्यात, वादग्रस्त जागा भारत सरकारच्या मालकीची असून ती मशिदीसाठी देण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आल्याचा दावा केला आहे. ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भिंतीवरील मूर्तींची पूजा आणि दर्शनाचा अधिकार दिला जावा, अशी मागणी करून पाच हिंदू महिला भाविकांनी वाराणसीमधील एका न्यायालयात दिवाणी खटला दाखल केला आहे. 

दरम्यान, याचिकाकर्त्यांच्या वतीने विष्णू शंकर जैन यांनी न्यायालयात बाजू मांडली. मुघल बादशहा औरंगजेबाने एप्रिल १६६९मध्ये एक आदेश काढून वाराणसीतील आदि विश्वेश्वर (काशी विश्वनाथ) मंदिर उद्‌ध्वस्त करण्याचे आदेश दिले होते. तत्कालीन शासक किंवा त्यानंतरही इतर शासकांनी वादग्रस्त जागेवर वक्फ तयार करण्याचा किंवा मुस्लिम अथवा इतर मुस्लिमांच्या इतर विश्वस्त संस्थांना जमीन सोपवण्याचा आदेश दिला होता, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. मात्र, औरंगजेबाने काढलेल्या फर्मानाची प्रत कोलकात्यातील आशियाई ग्रंथालयात ठेवण्यात आली आहे, असे जैन यांनी न्यायालयाला सांगितले. 

टॅग्स :Gyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदVaranasiवाराणसी