शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

सदाभाऊ खोतांनी केला पंजाबचा अभ्यास दौरा, शेतमालाच्या व्यापाराचा घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 21:14 IST

कृषी व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पंजाब राज्याच्या अभ्यास दौऱ्याला आजपासून सुरुवात केली आहे. खोत यांनी चंदीगड येथील पंजाब पणन मंडळाला भेट देऊन तेथील अधिका-यांसोबत शेतमालाच्या मार्केटसंदर्भात विविध विषयांवर चर्चा केली.

मुंबई, दि. 12 - कृषी व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पंजाब राज्याच्या अभ्यास दौऱ्याला आजपासून सुरुवात केली आहे. खोत यांनी चंदीगड येथील पंजाब पणन मंडळाला भेट देऊन तेथील अधिका-यांसोबत शेतमालाच्या मार्केटसंदर्भात विविध विषयांवर चर्चा केली.महाराष्ट्र-पंजाबमध्ये शेतमालाची देवाण-घेवाण कशी करता येईल, यावर प्रामुख्याने चर्चा झाली.  तेथील एक शिष्टमंडळाने महाराष्ट्रात यावे, यासाठी सदाभाऊ खोत यांनी त्यांना निमंत्रित केले. पंजाब पणन मंडळ आवारातील मार्केटलाही खोत यांनी भेट दिली.  तेथे वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेल्या मालाची विशेषतः नाशिकवरून आलेल्या कांदा आदी शेतमालाची त्यांनी पाहणी केली.गुरबजन सिंग-डीजीएम, औरपाल साहनी-आयटी, मंडी बोर्ड, बाजार समितीचे सभापती जुझार सिंग, सचिव मनोज शर्मा, महाराष्ट्राच्या पणन मंडळाचे भास्कर पाटील, MAIDC, महाराष्ट्राचे सत्यवान वराळे आदी  उपस्थित होते. खोत यांची पंजाब अॅग्रीकल्चरल मार्केटिंग बोर्ड कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात महाराष्ट्र आणि पंजाबच्या कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भातील धोरणावर चर्चा झाली. पणनच्या अधिका-यांनी पंजाब अॅग्रो इंडस्ट्रीजचे नियोजन सादर केले. शेतक-यांसाठी घेतलेली नियमनमुक्ती, आडत बंद करण्याचा निर्णय आदींची खोत यांनी माहिती दिली. तेथील अधिका-यांनी सदाभाऊ खोतांचे अभिनंदन केले.

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये सध्या कांद्याचे दर वाढले असून, दरवाढीचा फायदा सर्वसामान्य कांदा उत्पादकांना होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कांदा आयातीवर निर्बंध घालावेत; तसेच कांदा साठवणुकीवर निर्बंध घालू नयेत, अशी विनंती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे.राज्यामध्ये सध्या कांद्याचे सरासरी दर 1500 ते 1700 रुपये प्रति. क्विंटलपर्यंत आहेत. कांद्याच्या दरामध्ये झालेल्या वाढीचा फायदा सर्वसामान्य कांदा उत्पादकांना होत आहे. सुमारे 70 ते 80 टक्के कांदा शेतक-यांनी कांदा चाळीमध्ये साठवणूक केलेला असल्याने दरवाढीचा फायदा कांदा उत्पादकांना होणार आहे. तरी केंद्र शासनाने कांदा आयातीवर निर्बंध घालावेत आणि कांदा साठवणुकीवर निर्बंध घालू नये, अशी विनंती खोत यांनी पासवान यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच याबाबत संबंधित विभागाला निर्देश द्यावेत, अशी विनंती रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती देखील पणन राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यापूर्वी अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी वाणिज्य मंत्रालयाला, कांदा निर्यातीवर प्रथम बंदी घालण्यात यावी आणि त्यानंतरच अन्य देशांतून देशांतर्गत वापरासाठी स्वस्त दरातील कांदा आयात करण्यात यावा, असं सुचवलं होतं. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत