शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

Sabarimala Temple : भाविकांच्या भावनेकडे दुर्लक्ष करण्यात येऊ नये, संघाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 08:46 IST

सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही हा वाद थांबलेला नाही. एकीकडे हिंदुत्ववादी संघटना या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नवी दिल्ली - सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही हा वाद थांबलेला नाही. एकीकडे हिंदुत्ववादी संघटना या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपली भूमिका स्पष्ट करताना भाविकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही अएसे मत मांडले आहे. तसेच या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन न्यायिक तसेच अन्य पर्यायांवर विचार करावा, असा सल्ला संघाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर व्हायला हवा असे सांगतानाच हा नियम तातडीने लागू करण्याचा केरळ सरकारचा निर्णय दुर्दैवी असल्याचेही संघाने म्हटले आहे.   सुप्रीम कोर्टानं सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल देत मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला होता. . महिला या पुरुषांपेक्षा दुय्यम नाहीत. महिलांना देवाची पूजा करण्यावरही बंधनं घातली जात आहेत. देवाशी असलेले नाते हे शारीरिक घटकावर ठरू शकत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी यावेळी व्यक्त केले होते. मात्र या निकालानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना बुधवारी रस्त्यावर उतरल्या होत्या. निदर्शनं करणाऱ्या संघटनांमध्ये आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचाही समावेश आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाची स्वतंत्र परंपरा असतो, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय अस्वीकारार्ह आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.दरम्यान, हा एका स्थानिक मंदिरातील परंपरेचा प्रश्न आहे. ज्यामध्ये महिलांसह लाखो भाविकांची श्रद्धा जोडली गेलेली आहे. या भाविकांची श्रद्धा आणि भावना दुर्लक्षुन चालणार नाही, असे संघाने स्पष्ट केले आहे. एखादी परंपरा जबरदस्तीने तोडण्याविरोधात आंदोलन करणाऱ्या भाविकांची आणि महिलांची उग्र प्रतिक्रिया उमटणे साहजिक आहे, असे संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी सांगितले. तसेच भाविकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून कायद्याची अंमलबजावणी करणे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. का होती मंदिरात प्रवेशबंदी? केरळमधील सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. विशेषत: 15 वर्षांहून अधिक वयाच्या मुलींना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत होता. केवळ लहान मुली आणि वृद्ध महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जायचा. मंदिरात विराजमान असलेले अयप्पा ब्रम्हचारी होते, अशी श्रद्धा आहे. सबरीमाला यात्रेच्या आधी 41 दिवस कठोर व्रत करण्याचा नियम आहे. मासिक पाळीमुळे महिला सलग 41 दिवस व्रत करू शकत नाहीत. त्यामुळेच 10 ते 50 या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. सबरीमाला मंदिर प्रकरणात न्यायालय महिलांच्या बाजूनं निकाल देईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या प्रकरणाच्या शेवटच्या सुनावणीत न्यायालयानं आपला रोख स्पष्ट केला होता. मंदिर प्रवेशात भेदभाव केला जाऊ शकत नाही. देवाचं दर्शन हा महिलांचा घटनात्मक अधिकार आहे, असं न्यायालयानं सुनावणी म्हटलं होतं.  

टॅग्स :Sabarimala Templeसबरीमाला मंदिरKeralaकेरळRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ