शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

LAC वरून केव्हा हटणार चिनी आरमी? जयशंकर म्हणाले, 75% वाद मिटले, पण 'हा' एक मुद्दा अद्यापही कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 20:27 IST

जयशंकर म्हणाले, जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये जो संघर्ष झाला, त्याचा परिणाम आमच्या संबंधांवर झाला आहे. सीमेवर कुणालाही हिंसाचाराची परवानगी दिली जाऊ शकत नाही.

केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पूर्व लडाखमध्येचीनसोबत सुरू असलेल्या तणावासंदर्भात भाष्य केले आहे. 75% वाद मिटला आहे. मात्र, सीमेवर जमलेले चिनी सैनिक हा अद्यापही एक मोठा मुद्दा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे एका थिंक टँकशी चर्चा करताना ते बोलत होते. 

जयशंकर म्हणाले, जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये जो संघर्ष झाला, त्याचा परिणाम आमच्या संबंधांवर झाला आहे. सीमेवर कुणालाही हिंसाचाराची परवानगी दिली जाऊ शकत नाही. चीन जेव्हा आपले सैन्य मागे घेईल तेव्हाच संबंध सामान्य होऊ शकतात, ही एकमेव अट आहे.

जयशंकर म्हणाले, वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू आहे. यात काही प्रमाणात प्रगती झाली आहे. सुमारे 75 टक्के वादांवर उपाय शोधण्यात आले आहेत. दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आहेत. याला कसे सामोरे जायचे आणि हा प्रश्न कसा सोडवायचा यावर दोन्ही देश चर्चा करत आहेत. एवढेच नाही, तर वाद संपुष्टात आल्यास चीन सोबतचे संबंध पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे होऊ शकतात. वादावर तोडगा निघाला तर शांतता आणि सौहार्द परत येऊ शकते, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे. 

असे असेल पहिले पाऊल - जयशंकर म्हणाले, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) आजही चीनने सैन्य मोठ्या प्रमाणावर तैनात आहे. प्रत्युत्तरात आम्हीही आमच्या सैनिकांना वर पाठवले आहे. जेव्हा आम्ही कोरोनाचा सामना करत होतो, लॉकडाऊनमध्ये हतो, तेव्हा चीनने हे कृत्य केले आहे. हा अत्यंत धोकादायक प्लॅन होता. कारण एवढ्या उंचावर थंडीमध्ये सैनिकांची तैनाती केल्यास दुर्घटना होऊ शकतात आणि जून 2022 मध्ये हेच घडले. गलवानमध्ये सैनिकांमध्ये संघर्ष झाला. आमचा मुद्दा हा आहे की, चीनने असे कृत्य का केले. आपले सैनिक सीमेवर का पाठवले. आम्ही गेल्या चार वर्षांपासून चर्चा करत आहोत. मात्र आजही, परिस्थिती सामान्य होण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असेल.

चीनला स्पष्ट संदेश -चीनला स्पष्ट संदेस देत जयशंकर म्हणाले, चीनला सैनिक मागे घ्यावेच लागतील. त्यांना पुन्हा एकदा आपल्या ठ‍िकानांवर पोहोचावेच लागेल. तेव्हाच आमचे जवानही त्यांच्या निर्धारित ठिकाणावर परततील. यानंतरच संबंध सामान्य होऊ शकतात. तसेच, सीमेवरील गस्तीसंदर्भातही दोन्ही देशांचा करार आहे. चीनला याचे पालन करावे लागेल, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतchinaचीनladakhलडाख