शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

LAC वरून केव्हा हटणार चिनी आरमी? जयशंकर म्हणाले, 75% वाद मिटले, पण 'हा' एक मुद्दा अद्यापही कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 20:27 IST

जयशंकर म्हणाले, जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये जो संघर्ष झाला, त्याचा परिणाम आमच्या संबंधांवर झाला आहे. सीमेवर कुणालाही हिंसाचाराची परवानगी दिली जाऊ शकत नाही.

केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पूर्व लडाखमध्येचीनसोबत सुरू असलेल्या तणावासंदर्भात भाष्य केले आहे. 75% वाद मिटला आहे. मात्र, सीमेवर जमलेले चिनी सैनिक हा अद्यापही एक मोठा मुद्दा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे एका थिंक टँकशी चर्चा करताना ते बोलत होते. 

जयशंकर म्हणाले, जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये जो संघर्ष झाला, त्याचा परिणाम आमच्या संबंधांवर झाला आहे. सीमेवर कुणालाही हिंसाचाराची परवानगी दिली जाऊ शकत नाही. चीन जेव्हा आपले सैन्य मागे घेईल तेव्हाच संबंध सामान्य होऊ शकतात, ही एकमेव अट आहे.

जयशंकर म्हणाले, वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू आहे. यात काही प्रमाणात प्रगती झाली आहे. सुमारे 75 टक्के वादांवर उपाय शोधण्यात आले आहेत. दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आहेत. याला कसे सामोरे जायचे आणि हा प्रश्न कसा सोडवायचा यावर दोन्ही देश चर्चा करत आहेत. एवढेच नाही, तर वाद संपुष्टात आल्यास चीन सोबतचे संबंध पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे होऊ शकतात. वादावर तोडगा निघाला तर शांतता आणि सौहार्द परत येऊ शकते, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे. 

असे असेल पहिले पाऊल - जयशंकर म्हणाले, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) आजही चीनने सैन्य मोठ्या प्रमाणावर तैनात आहे. प्रत्युत्तरात आम्हीही आमच्या सैनिकांना वर पाठवले आहे. जेव्हा आम्ही कोरोनाचा सामना करत होतो, लॉकडाऊनमध्ये हतो, तेव्हा चीनने हे कृत्य केले आहे. हा अत्यंत धोकादायक प्लॅन होता. कारण एवढ्या उंचावर थंडीमध्ये सैनिकांची तैनाती केल्यास दुर्घटना होऊ शकतात आणि जून 2022 मध्ये हेच घडले. गलवानमध्ये सैनिकांमध्ये संघर्ष झाला. आमचा मुद्दा हा आहे की, चीनने असे कृत्य का केले. आपले सैनिक सीमेवर का पाठवले. आम्ही गेल्या चार वर्षांपासून चर्चा करत आहोत. मात्र आजही, परिस्थिती सामान्य होण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असेल.

चीनला स्पष्ट संदेश -चीनला स्पष्ट संदेस देत जयशंकर म्हणाले, चीनला सैनिक मागे घ्यावेच लागतील. त्यांना पुन्हा एकदा आपल्या ठ‍िकानांवर पोहोचावेच लागेल. तेव्हाच आमचे जवानही त्यांच्या निर्धारित ठिकाणावर परततील. यानंतरच संबंध सामान्य होऊ शकतात. तसेच, सीमेवरील गस्तीसंदर्भातही दोन्ही देशांचा करार आहे. चीनला याचे पालन करावे लागेल, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतchinaचीनladakhलडाख