शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

'माझ्या अमेरिका दौऱ्याबाबत राहुल गांधी खोटं बोलले', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 18:22 IST

S Jaishankar on Rahul Gandhi : राहुल गांधी भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जयशंकर यांनी केला.

S Jaishankar on Rahul Gandhi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळावे, यासाठी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना अमेरिकेला पाठवण्यात आले होते, असा आरोप राहुल गांधींनी आज संसदेत बोलताना केला. या आरोपांवर आता स्वतः जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'यूएस दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावर कधीही चर्चा झाली नाही. राहुल गांधी भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत,' असा पलटवार जयशंकर यांनी केला. 

राहुल गांधींवर निशाणा साधत परराष्ट्र मंत्र्यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले की, 'विरोधी पक्षनेते राहुल गांधी माझ्या डिसेंबर 2024 मधील अमेरिका दौऱ्याबाबत जाणूनबुजून खोटे बोलले. मी बायडेन प्रशासनाच्या परराष्ट्र सचिव आणि NSA यांना भेटायला गेलो होतो. आमच्या कॉन्सुल जनरलच्या बैठकीच्या अध्यक्षतेसाठीही गेलो होतो. पंतप्रधानांच्या निमंत्रणाबाबत चर्चा झाली नाही. आपले पंतप्रधान अशा कार्यक्रमांना सहसा उपस्थित राहत नाहीत, हे सर्वज्ञात आहे. राहुल गांधी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी देशाची प्रतिमा मलीन करत आहेत,' असा आरोप जयशंकर यांनी केला.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तिसऱ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.  आपल्या देशात चांगली उत्पादन व्यवस्था असती तर परराष्ट्रमंत्र्यांना इतक्या वेळा अमेरिकेला जावे लागले नसते आणि आपल्या पंतप्रधानांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला बोलवण्यासाठी विनंती करावी लागली नसती. परराष्ट्र मंत्र्यांना अमेरिकेत जाऊन प्लीज आमच्या पंतप्रधानांना बोलवा, असे म्हणायला लागले नसते, असे विधान राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी टीका करत असताना पंतप्रधान मोदीही लोकसभेत उपस्थित होते.

राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर भाजप खासदारांनी लोकसभेत गदारोळ घातला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असे निराधार आरोप करू शकत नाहीत, असे म्हटले. विरोधी पक्षाचे नेते अशी गंभीर आणि तथ्यहीन विधाने करू शकत नाहीत. हा दोन देशांमधील संबंधांशी निगडित मुद्दा आहे आणि राहुल गांधी आमच्या पंतप्रधानांच्या निमंत्रणाबाबत पुष्टी नसलेली विधाने करत आहेत, असे किरेन रिजिजू म्हणाले.

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद