शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

पाकिस्तानच्या राजकारणाला दहशतवादाचा कँसर; एस जयशंकर यांचे थेट भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 23:04 IST

S. Jaishankar on Pakistan : पाकिस्तानच्या कृत्यांमुळे फक्त आपलेच नुकसान होत नाही, तर संपूर्ण उपखंड अस्थिर होत आहे.

S. Jaishankar on Pakistan : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला भरकार्यक्रमात सुनावले. 'पाकिस्तान सतत दहशतवादाला पाठिंबा देतो. या दहशतवाच्या कँसरने पाकिस्तानच्या राजकारणात शिरकाव केलाय. हा त्यांची संपूर्ण राजकीय व्यवस्था खाऊन टाकतोय. पाकिस्तानच्या कृत्यांमुळे फक्त आपलेच नुकसान होत नाही, तर संपूर्ण उपखंड अस्थिर होत आहे. पाकिस्तानने दहशतवादाचा दृष्टिकोन सोडला पाहिजे,' अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.

भारत-चीन संबंधांवर भाष्ययावेळी त्यांनी भारत चीनचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले, भारत आणि चीनचा एकाचवेळी उदय झाल्यामुळे संबंध संतुलित करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पूर्वीच्या आदर्शवादी आणि दिशाभूल धोरणांमुळे सहकार्य आणि स्पर्धेला अडथळा होता, परंतु गेल्या दशकात भारताचा दृष्टिकोन बदलला आहे. 2020 च्या सीमा विवादामुळे संबंध गुंतागुंतीचे झाले, या समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भारताची ताकद मजबूत करण्यावर भर चीनच्या वाढत्या क्षमतेमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांसाठी भारताला तयार राहण्याची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय शक्तीचा जलद विकास होणे आवश्यक आहे. यामध्ये सीमेवरील रचना आणि समुद्राकडे होणारे दुर्लक्ष सुधारावे लागेल. तसेच, संवेदनशील भागातील अवलंबित्व कमी करावे लागेल. भारत आपली एकूण ताकद वाढवण्यावर भर देत आहे. भारताचा दृष्टिकोन परस्पर आदर, परस्पर संवेदनशीलता आणि परस्पर हितावर अवलंबून आहे. भारत-चीन संबंधांच्या दीर्घकालीन विकासाचा केवळ द्विपक्षीय संबंधांवरच नव्हे तर जागतिक व्यवस्थेवरही परिणाम होईल, असेही जयशंकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादchinaचीन