शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशिया मदत करणार?; राजदूत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 14:40 IST

आम्ही भारताचे धोरणात्मक भागीदार आहोत. संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखवलेल्या संतुलित भूमिकेबद्दल आम्ही भारताचे आभारी आहोत असं रशियानं म्हटलं आहे.

नवी दिल्ली – मागील ७ दिवसांपासून रशिया-यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. मात्र या युद्धाचा फटका यूक्रेनमधील भारतीयांना बसत आहे. मेडिकल शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारतानं ऑपरेशन गंगा हाती घेतले आहे. भारतीय वायूदलही यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करत आहेत.

यूक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने अनेक देशांशी संपर्क साधला आहे. त्यात भारताने रशियाच्या दूतावासाशी संपर्क साधत यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याची विनंती केली आहे. भारतातील रशियन राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी याबाबत पुष्टी केली आहे. अलीपोव म्हणाले की, आम्ही खारकीव आणि पूर्व यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. रशियाच्या हद्दीतून त्याठिकाणी अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती डेनिस अलीपोव्ह यांनी दिली.

डेनिस अलीपोव्ह म्हणाले की, आम्ही भारताचे धोरणात्मक भागीदार आहोत. संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखवलेल्या संतुलित भूमिकेबद्दल आम्ही भारताचे आभारी आहोत. भारताला या संकटाची जाणीव आहे. भारतासोबतच्या संरक्षण करारावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही. भारताला S-400 च्या पुरवठ्याचा प्रश्न आहे, कोणत्याही अडथळ्याची अपेक्षा करू नका. हा करार अव्याहतपणे सुरू ठेवण्याचे मार्ग आहेत. निर्बंध जुने असो किंवा नवीन, कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये असं रशियन राजदूताने सांगितले आहे.

...म्हणून भारताची तटस्थ भूमिका

रशिया सध्या भारताला सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला चालना देण्याच्या भारताच्या निर्णयामुळे, रशियाकडून आयात करण्यात येणाऱ्या संरक्षण उपकरणांचा वाटा निश्चितच खाली आला आहे, जो ७०% वरून ४९% वर आला आहे. असे असूनही, रशिया सध्या भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. भारताने आयात केलेल्या संरक्षण उपकरणांपैकी ६० टक्के रशियाकडून येतात. अशा परिस्थितीत रशियाच्या विरोधात जाऊन भारत आपल्या संबंधांचा त्याग करू इच्छित नाही.

युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षितपणे आणि यशस्वीपणे बाहेर काढण्यासाठी भारताला युद्धात सहभागी असलेल्या दोन्ही देशांकडून सुरक्षा आश्वासनांची आवश्यकता आहे. अशा स्थितीत भारताचा दृष्टीकोन कोणत्याही एका देशाकडे झुकलेला दिसला तर तेथे उपस्थित भारतीय नागरिकांसाठी संकटे निर्माण होऊ शकतात त्यामुळे भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारत