शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

Russia Ukraine War: यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशिया मदत करणार?; राजदूत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 14:40 IST

आम्ही भारताचे धोरणात्मक भागीदार आहोत. संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखवलेल्या संतुलित भूमिकेबद्दल आम्ही भारताचे आभारी आहोत असं रशियानं म्हटलं आहे.

नवी दिल्ली – मागील ७ दिवसांपासून रशिया-यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. मात्र या युद्धाचा फटका यूक्रेनमधील भारतीयांना बसत आहे. मेडिकल शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारतानं ऑपरेशन गंगा हाती घेतले आहे. भारतीय वायूदलही यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करत आहेत.

यूक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने अनेक देशांशी संपर्क साधला आहे. त्यात भारताने रशियाच्या दूतावासाशी संपर्क साधत यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याची विनंती केली आहे. भारतातील रशियन राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी याबाबत पुष्टी केली आहे. अलीपोव म्हणाले की, आम्ही खारकीव आणि पूर्व यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. रशियाच्या हद्दीतून त्याठिकाणी अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती डेनिस अलीपोव्ह यांनी दिली.

डेनिस अलीपोव्ह म्हणाले की, आम्ही भारताचे धोरणात्मक भागीदार आहोत. संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखवलेल्या संतुलित भूमिकेबद्दल आम्ही भारताचे आभारी आहोत. भारताला या संकटाची जाणीव आहे. भारतासोबतच्या संरक्षण करारावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही. भारताला S-400 च्या पुरवठ्याचा प्रश्न आहे, कोणत्याही अडथळ्याची अपेक्षा करू नका. हा करार अव्याहतपणे सुरू ठेवण्याचे मार्ग आहेत. निर्बंध जुने असो किंवा नवीन, कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये असं रशियन राजदूताने सांगितले आहे.

...म्हणून भारताची तटस्थ भूमिका

रशिया सध्या भारताला सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला चालना देण्याच्या भारताच्या निर्णयामुळे, रशियाकडून आयात करण्यात येणाऱ्या संरक्षण उपकरणांचा वाटा निश्चितच खाली आला आहे, जो ७०% वरून ४९% वर आला आहे. असे असूनही, रशिया सध्या भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. भारताने आयात केलेल्या संरक्षण उपकरणांपैकी ६० टक्के रशियाकडून येतात. अशा परिस्थितीत रशियाच्या विरोधात जाऊन भारत आपल्या संबंधांचा त्याग करू इच्छित नाही.

युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षितपणे आणि यशस्वीपणे बाहेर काढण्यासाठी भारताला युद्धात सहभागी असलेल्या दोन्ही देशांकडून सुरक्षा आश्वासनांची आवश्यकता आहे. अशा स्थितीत भारताचा दृष्टीकोन कोणत्याही एका देशाकडे झुकलेला दिसला तर तेथे उपस्थित भारतीय नागरिकांसाठी संकटे निर्माण होऊ शकतात त्यामुळे भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारत