शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Russia Ukraine War: यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशिया मदत करणार?; राजदूत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 14:40 IST

आम्ही भारताचे धोरणात्मक भागीदार आहोत. संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखवलेल्या संतुलित भूमिकेबद्दल आम्ही भारताचे आभारी आहोत असं रशियानं म्हटलं आहे.

नवी दिल्ली – मागील ७ दिवसांपासून रशिया-यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. मात्र या युद्धाचा फटका यूक्रेनमधील भारतीयांना बसत आहे. मेडिकल शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारतानं ऑपरेशन गंगा हाती घेतले आहे. भारतीय वायूदलही यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करत आहेत.

यूक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने अनेक देशांशी संपर्क साधला आहे. त्यात भारताने रशियाच्या दूतावासाशी संपर्क साधत यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याची विनंती केली आहे. भारतातील रशियन राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी याबाबत पुष्टी केली आहे. अलीपोव म्हणाले की, आम्ही खारकीव आणि पूर्व यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. रशियाच्या हद्दीतून त्याठिकाणी अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती डेनिस अलीपोव्ह यांनी दिली.

डेनिस अलीपोव्ह म्हणाले की, आम्ही भारताचे धोरणात्मक भागीदार आहोत. संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखवलेल्या संतुलित भूमिकेबद्दल आम्ही भारताचे आभारी आहोत. भारताला या संकटाची जाणीव आहे. भारतासोबतच्या संरक्षण करारावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही. भारताला S-400 च्या पुरवठ्याचा प्रश्न आहे, कोणत्याही अडथळ्याची अपेक्षा करू नका. हा करार अव्याहतपणे सुरू ठेवण्याचे मार्ग आहेत. निर्बंध जुने असो किंवा नवीन, कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये असं रशियन राजदूताने सांगितले आहे.

...म्हणून भारताची तटस्थ भूमिका

रशिया सध्या भारताला सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला चालना देण्याच्या भारताच्या निर्णयामुळे, रशियाकडून आयात करण्यात येणाऱ्या संरक्षण उपकरणांचा वाटा निश्चितच खाली आला आहे, जो ७०% वरून ४९% वर आला आहे. असे असूनही, रशिया सध्या भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. भारताने आयात केलेल्या संरक्षण उपकरणांपैकी ६० टक्के रशियाकडून येतात. अशा परिस्थितीत रशियाच्या विरोधात जाऊन भारत आपल्या संबंधांचा त्याग करू इच्छित नाही.

युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षितपणे आणि यशस्वीपणे बाहेर काढण्यासाठी भारताला युद्धात सहभागी असलेल्या दोन्ही देशांकडून सुरक्षा आश्वासनांची आवश्यकता आहे. अशा स्थितीत भारताचा दृष्टीकोन कोणत्याही एका देशाकडे झुकलेला दिसला तर तेथे उपस्थित भारतीय नागरिकांसाठी संकटे निर्माण होऊ शकतात त्यामुळे भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारत