शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Russia- Ukraine War: यूक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण; व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 09:43 IST

यूक्रेनच्या अशा वातावरणात अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांमुळे पालकांची चिंता वाढली आहे

नवी दिल्ली – रशिया-यूक्रेन यांच्यातील युद्धाला ५ दिवस उलटले. आजही यूक्रेनच्या अनेक शहरांत स्फोटांचे आवाज कानी पडत आहेत. यूक्रेनचं सैन्य बलाढ्य रशियासमोर झुकण्यास तयार नाही. यूक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशिया आक्रमक हल्ला करत आहे. मात्र यूक्रेनचे सैन्यही देशाचं संरक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत. त्यात आता सर्वसामान्य नागरिकही युद्धात उतरला आहे.

यूक्रेनच्या अशा वातावरणात अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांमुळे पालकांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत ऑपरेशन गंगा अंतर्गत यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणलं जात आहे. परंतु अजूनही बरेच विद्यार्थी त्याठिकाणी दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी(Congress Rahul Gandhi) यांनी भारत सरकारकडे लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधींनी ट्विट करुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात विद्यार्थ्यांसोबत हिंसाचार आणि मारहाण होत असल्याचं दिसत आहे.

राहुल गांधींनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय की, ज्यारितीने यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडीओ,फोटो येत आहेत ते पाहून मला त्यांच्या पालकांची चिंता समजू शकते. असे व्हिडीओ पाहून हिंसा सहन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना वेदना होत असतील. कुठल्याही पालकांवर अशी वेळ येऊ नये. भारत सरकारने यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी तात्काळ मिशन हाती घेतले पाहिजे. आपल्या मुलांना अशारितीने सोडू शकत नाही असं त्यांनी सांगितले.

याआधी राहुल गांधींनी कर्नाटकातील काही विद्यार्थ्यांचा व्हिडीओ शेअर केला होता. ते विद्यार्थी यूक्रेनमध्ये बंकरमध्ये अडकले होते. बंकरमधील स्थिती विदारक होती. ज्याठिकाणी हल्ला झालाय त्या पूर्व यूक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी अडकलेत. या विद्यार्थ्यांना तातडीनं मायदेशी आणलं पाहिजे असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाने यूक्रेनमधील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा हाती घेतले आहे. त्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी केलेत.

सोमवारी सकाळी एअर इंडियाचं विमान ६.३० च्या सुमारास रोमानियाची राजधानी बुखारेस्टहून दिल्लीला पोहचलं. त्यात २४९ विद्यार्थी होते. गेल्या ३ दिवसांपासून आतापर्यत ही पाचवी फ्लाईट आहे. ३ दिवसांत आतापर्यंत १ हजार १५६ भारतीयांना यूक्रेनमधून परत आणलं आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर यूक्रेनमधील स्थिती बिघडत चालली आहे. भारतासह अनेक देशातील नागरिक त्याठिकाणी अडकले आहेत. प्रत्येक देश आपापल्या परिने नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मागील २ दिवसांपासून यूक्रेनची राजधानी कीववर रशिया हल्ला करत आहे. रशिया-यूक्रेनमधील युद्ध रोखण्यासाठी जगभरातून प्रयत्न होत आहेत.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया