शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Russia- Ukraine War: यूक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण; व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 09:43 IST

यूक्रेनच्या अशा वातावरणात अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांमुळे पालकांची चिंता वाढली आहे

नवी दिल्ली – रशिया-यूक्रेन यांच्यातील युद्धाला ५ दिवस उलटले. आजही यूक्रेनच्या अनेक शहरांत स्फोटांचे आवाज कानी पडत आहेत. यूक्रेनचं सैन्य बलाढ्य रशियासमोर झुकण्यास तयार नाही. यूक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशिया आक्रमक हल्ला करत आहे. मात्र यूक्रेनचे सैन्यही देशाचं संरक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत. त्यात आता सर्वसामान्य नागरिकही युद्धात उतरला आहे.

यूक्रेनच्या अशा वातावरणात अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांमुळे पालकांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत ऑपरेशन गंगा अंतर्गत यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणलं जात आहे. परंतु अजूनही बरेच विद्यार्थी त्याठिकाणी दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी(Congress Rahul Gandhi) यांनी भारत सरकारकडे लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधींनी ट्विट करुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात विद्यार्थ्यांसोबत हिंसाचार आणि मारहाण होत असल्याचं दिसत आहे.

राहुल गांधींनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय की, ज्यारितीने यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडीओ,फोटो येत आहेत ते पाहून मला त्यांच्या पालकांची चिंता समजू शकते. असे व्हिडीओ पाहून हिंसा सहन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना वेदना होत असतील. कुठल्याही पालकांवर अशी वेळ येऊ नये. भारत सरकारने यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी तात्काळ मिशन हाती घेतले पाहिजे. आपल्या मुलांना अशारितीने सोडू शकत नाही असं त्यांनी सांगितले.

याआधी राहुल गांधींनी कर्नाटकातील काही विद्यार्थ्यांचा व्हिडीओ शेअर केला होता. ते विद्यार्थी यूक्रेनमध्ये बंकरमध्ये अडकले होते. बंकरमधील स्थिती विदारक होती. ज्याठिकाणी हल्ला झालाय त्या पूर्व यूक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी अडकलेत. या विद्यार्थ्यांना तातडीनं मायदेशी आणलं पाहिजे असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाने यूक्रेनमधील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा हाती घेतले आहे. त्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी केलेत.

सोमवारी सकाळी एअर इंडियाचं विमान ६.३० च्या सुमारास रोमानियाची राजधानी बुखारेस्टहून दिल्लीला पोहचलं. त्यात २४९ विद्यार्थी होते. गेल्या ३ दिवसांपासून आतापर्यत ही पाचवी फ्लाईट आहे. ३ दिवसांत आतापर्यंत १ हजार १५६ भारतीयांना यूक्रेनमधून परत आणलं आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर यूक्रेनमधील स्थिती बिघडत चालली आहे. भारतासह अनेक देशातील नागरिक त्याठिकाणी अडकले आहेत. प्रत्येक देश आपापल्या परिने नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मागील २ दिवसांपासून यूक्रेनची राजधानी कीववर रशिया हल्ला करत आहे. रशिया-यूक्रेनमधील युद्ध रोखण्यासाठी जगभरातून प्रयत्न होत आहेत.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया