शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

Russia Ukraine War: अणुयुद्ध झाल्यास अर्ध्या तासात १० कोटी मृत्यू, १८ हजार वर्षे मागे जाईल जग, मुंबईसारख्या शहरात होईल मृत्यूचं तांडव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 10:32 IST

Russia Ukraine War: आजच्या आधुनिक जगात अणुयुद्ध झाल्यास काय होईल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एका संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार एक अणुबॉम्ब क्षणार्धात लाखो लोकांचा बळी घेईल. तसेच जर १० किंवा शेकडो अणुबॉम्ब पडले तर केवळ लाखो-करोडो लोकांचा मृत्यू होईल, तसेच पृथ्वीवरील वातावरणही बिघडेल.

नवी दिल्ली -  रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षांमुळे अणुयुद्ध पेटण्याची भीती बळावली आहे. युक्रेनमधील रशियाचे आक्रमण निर्णायक टप्प्यावर आले आहे. मात्र धोका अद्याप टळलेला नाही. त्यातच कुठल्याही बाहेरील देशाने या युद्धात उडी घेतल्यास या आधी कधी पाहिले नसतील असे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. त्यामुळे संरक्षण तज्ज्ञ पुतीन यांच्या या इशाऱ्याकडे अणुयुद्धाची धमकी म्हणून पाहत आहेत.

त्यामुळे आजच्या आधुनिक जगात अणुयुद्ध झाल्यास काय होईल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. स्वित्झर्लंडमधील इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्यूक्लिअर वेपन (ICAN) या संस्थेला २०१७ मध्ये नोबेल पीस प्राईज मिळाले होते. या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार एक अणुबॉम्ब क्षणार्धात लाखो लोकांचा बळी घेईल. तसेच जर १० किंवा शेकडो अणुबॉम्ब पडले तर केवळ लाखो-करोडो लोकांचा मृत्यू होईल, तसेच पृथ्वीवरील वातावरणही बिघडेल.

ICAN च्या रिपोर्टनुसार एक अणुबॉम्ब संपूर्ण शहराला नष्ट करेल. जर आजच्या काळात अनेक अणुबॉम्बचा वापर झाल्यास यामध्ये कोट्यवधी लोक मारले जातील. तसेच अमेरिका आणि रशियामध्ये अणुयुद्ध सुरू झाल्यास मरणाऱ्यांची संख्या १० कोटींपेक्षा अधिक असेल.

त्यातच मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या जिथे दर चौरस किमीमध्ये एक लाखांपेक्षा अधिक लोक राहतात. अशा शहरात हिरोशिमासारखा अणुबॉम्ब पडल्यास एका आठवडाभरात ८.७० लाख पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जर अमेरिका आणि रशियामध्ये अणुयुद्ध झाल्यास ५०० अणुबॉम्बचा वापर केला गेला तर अर्ध्या तासात १० कोटींपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होईल.सध्या जगात असलेल्या अण्वस्त्रांपैकी १ टक्का जरी अण्वस्त्रांचा वापर झाला, तर दोन अब्ज लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल. संपूर्ण जगातील आरोग्य व्यवस्था बिघडेल. जखमींना उपचार मिळणार नाहीत.

हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बसारखे १०० अणुबॉम्ब वापरले गेले, तर जगातील संपूर्ण व्यवस्था बिघडेल. जगातील संपूर्ण वातावरण बिघडेल. शेतीवर विपरीत परिणाम होतील. अणुयुद्ध झाल्यास पृथ्वीच्या पृष्टभागावर मोठ्या प्रमाणात धूर जमा होईल. त्यामुळे तापमान दोन अंशांनी घटेल. तसेच जागतिक पर्जन्यमानात ४५ टक्क्यांनी घट होईल. पृथ्वीच्या पृष्टभागावर काही ठिकाणी उणे ७ ते उणे आठ एवढे तापमान होईल. त्यामुळे १८ हजार वर्षांपूर्वी आलेल्या हिमयुगासारखी परिस्थिती निर्माण होईल.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धMumbaiमुंबईInternationalआंतरराष्ट्रीय