शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Russia-Ukraine Conflict: “हा राष्ट्रीय बाणा नाही, निवडणुकांमुळे ‘ऑपरेशन गंगा’ नाव”; संजय राऊतांची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 12:12 IST

Russia-Ukraine Conflict: देशाची मुले संकटात असताना तुम्हाला तिथे निवडणुका आणि प्रचार दिसतोय, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष (Russia-Ukraine Conflict) अधिकच तीव्र होताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसह नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. केंद्रातील मोदी सरकारने या मोहिमेला ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव दिले आहे. एअर इंडियाच्या विमानातून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी आणि नागरिक मायदेशात परतले आहेत. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे नाव देण्यात आल्याची टीका राऊत यांनी केली आहे. 

युक्रेन येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्यासंदर्भातील व्हिडिओ समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. यावर, आतापर्यंत जगात अनेक युद्ध झाली. इराकपासून अफगाणिस्तानपर्यंत. पण अशाप्रकारे एखाद्या देशात भारतीय विद्यार्थ्यांवर अत्याचार झाले नव्हते. केंद्रातील मोदी सरकारचे हे अपयश आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच हजारो भारतीय अडकलेले असताना १५० जण मायदेशात परतल्यावर त्याची जाहिरात सुरू आहे, या शब्दांत संजय राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 

प्रपोगांडा बाजूला ठेऊन यामध्ये लक्ष घातलं पाहिजे

उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत म्हणून ‘ऑपरेशन गंगा’. देशाची मुले संकटात असताना तुम्हाला तिथे निवडणुका आणि प्रचार दिसत आहे. पक्षाचा प्रसार दिसतोय तर त्याला मी राष्ट्रीय बाणा म्हणत नाही. विद्यार्थ्यांचा पालकांचा आक्रोश दिसत आहे. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सीमेवर मारहाण होत आहे. त्यांच्याकडचे पैसे संपत आले आहेत. त्यांना येण्याचा मार्ग दिसत नाही. या देशात किंवा जगात अशी परिस्थिती कधी उद्भवली नव्हती. सरकारने राजकारण, प्रपोगांडा बाजूला ठेऊन यामध्ये लक्ष घातले पाहिजे. यापूर्वीही अनेक ठिकाणांहून आपण भारतीयांना एअरलिफ्ट केले आहे, असा घणाघात करत, आताच्या घडीला पंजाब किंवा महाराष्ट्रात निवडणुका असत्या, तर त्यानुसार मोहिमेला नाव दिले असते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते टीव्ही९शी बोलत होते.

दरम्यान, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १३ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले असून, त्यांना शक्य तितक्या लवकर परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत भारताने तेथे अडकलेल्या आपल्या ९०७ नागरिकांना परत आणले आहे, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाSanjay Rautसंजय राऊतCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण