शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Russia-Ukraine Conflict: “भारताचा तिरंगा नसता तर सुखरुप आलो नसतो”; मायदेशात आलेल्या विद्यार्थ्यांचा रोमांचकारी अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 07:26 IST

Russia-Ukraine Conflict: राष्ट्रध्वज तिरंगा पाहून युक्रेन आणि रशियन सैनिकांनी भारतीय विद्यार्थ्यांना कोणतीही इजा न करता मदत केली.

नवी दिल्ली: विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, या ओळींचा प्रत्यय युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आला आहे. परदेशात भारताच्या तिरंग्याची ताकद काय आहे, हे युद्धग्रस्त युक्रेनमधून मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावनांतून समोर येत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा हाती घेतले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी भारतात परतले आहेत. भारताचा तिरंगा हाती नसता तर सुखरूप परत आलो नसतो, अशा भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. तसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. 

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष (Russia-Ukraine Conflict) मोठ्या प्रमाणात तीव्र होताना दिसत आहे. रशिया आणि युक्रेन यांची बेलारूस येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये रशियाने युक्रेनसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. दुसरीकडे युक्रेनच्या विविध भागांवर रशियन सैन्याने हल्ले सुरूच ठेवले आहेत. युक्रेनचे सैनिकही त्याला प्रत्युत्तर देत आहे. यातच एअर इंडियाची विमाने हजारो भारतीयांना घेऊन मायदेशात परतत आहेत. 

तिरंगा नसता तर आम्ही सुखरूप बाहेर पडलो नसतो

मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, ज्यामध्ये युक्रेनियन आणि रशियन सैनिक भारताचा तिरंगी ध्वज असलेले वाहन पाहून गोळीबार थांबवत आहेत. एवढेच नाही तर भारतीय विद्यार्थ्यांनाही रस्ता दाखवला जात आहे. भारताच्या तिरंगा ध्वजामुळे सुखरूप परत येऊ शकलो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. रिपोर्टनुसार, आग्र्याच्या आदित्य सिंग युक्रेनमध्ये आहे. त्यांनी आपल्या कुटुंबीयांना फोनवर सांगितले की, येथे खाण्यापिण्याची समस्या आहे, यापूर्वी भारतीय दूतावासाशी संपर्क होत नव्हता. मात्र, आता संपर्कानंतर सुमारे १५० विद्यार्थी तीन बसमधून रोमानियाला रवाना झाले आहेत. 

तिरंगा हाती घेऊन बाहेर पडलो

भारताचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा पाहून रशियन सैनिकांनीही मदत केली. त्यांना रोमानियात आणले गेले. युक्रेनमधून परतलेल्या साक्षीने सांगितले की, आम्हाला युक्रेनमध्ये तिरंग्याचे महत्त्व काय आहे हे कळले. तिरंगा तुमच्यासोबत नसेल तर तुमच्यावर कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो, अशा सूचना आम्हाला आधीच मिळाल्या होत्या. आम्हीही तिरंगा घेऊन बाहेर पडलो होतो, त्यामुळे मला सुखरूप परत येता आले, असे साक्षी म्हणाली. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार