शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Russia-Ukraine Conflict: “भारताचा तिरंगा नसता तर सुखरुप आलो नसतो”; मायदेशात आलेल्या विद्यार्थ्यांचा रोमांचकारी अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 07:26 IST

Russia-Ukraine Conflict: राष्ट्रध्वज तिरंगा पाहून युक्रेन आणि रशियन सैनिकांनी भारतीय विद्यार्थ्यांना कोणतीही इजा न करता मदत केली.

नवी दिल्ली: विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, या ओळींचा प्रत्यय युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आला आहे. परदेशात भारताच्या तिरंग्याची ताकद काय आहे, हे युद्धग्रस्त युक्रेनमधून मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावनांतून समोर येत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा हाती घेतले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी भारतात परतले आहेत. भारताचा तिरंगा हाती नसता तर सुखरूप परत आलो नसतो, अशा भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. तसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. 

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष (Russia-Ukraine Conflict) मोठ्या प्रमाणात तीव्र होताना दिसत आहे. रशिया आणि युक्रेन यांची बेलारूस येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये रशियाने युक्रेनसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. दुसरीकडे युक्रेनच्या विविध भागांवर रशियन सैन्याने हल्ले सुरूच ठेवले आहेत. युक्रेनचे सैनिकही त्याला प्रत्युत्तर देत आहे. यातच एअर इंडियाची विमाने हजारो भारतीयांना घेऊन मायदेशात परतत आहेत. 

तिरंगा नसता तर आम्ही सुखरूप बाहेर पडलो नसतो

मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, ज्यामध्ये युक्रेनियन आणि रशियन सैनिक भारताचा तिरंगी ध्वज असलेले वाहन पाहून गोळीबार थांबवत आहेत. एवढेच नाही तर भारतीय विद्यार्थ्यांनाही रस्ता दाखवला जात आहे. भारताच्या तिरंगा ध्वजामुळे सुखरूप परत येऊ शकलो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. रिपोर्टनुसार, आग्र्याच्या आदित्य सिंग युक्रेनमध्ये आहे. त्यांनी आपल्या कुटुंबीयांना फोनवर सांगितले की, येथे खाण्यापिण्याची समस्या आहे, यापूर्वी भारतीय दूतावासाशी संपर्क होत नव्हता. मात्र, आता संपर्कानंतर सुमारे १५० विद्यार्थी तीन बसमधून रोमानियाला रवाना झाले आहेत. 

तिरंगा हाती घेऊन बाहेर पडलो

भारताचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा पाहून रशियन सैनिकांनीही मदत केली. त्यांना रोमानियात आणले गेले. युक्रेनमधून परतलेल्या साक्षीने सांगितले की, आम्हाला युक्रेनमध्ये तिरंग्याचे महत्त्व काय आहे हे कळले. तिरंगा तुमच्यासोबत नसेल तर तुमच्यावर कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो, अशा सूचना आम्हाला आधीच मिळाल्या होत्या. आम्हीही तिरंगा घेऊन बाहेर पडलो होतो, त्यामुळे मला सुखरूप परत येता आले, असे साक्षी म्हणाली. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार