शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine Conflict: “भारताचा तिरंगा नसता तर सुखरुप आलो नसतो”; मायदेशात आलेल्या विद्यार्थ्यांचा रोमांचकारी अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 07:26 IST

Russia-Ukraine Conflict: राष्ट्रध्वज तिरंगा पाहून युक्रेन आणि रशियन सैनिकांनी भारतीय विद्यार्थ्यांना कोणतीही इजा न करता मदत केली.

नवी दिल्ली: विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, या ओळींचा प्रत्यय युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आला आहे. परदेशात भारताच्या तिरंग्याची ताकद काय आहे, हे युद्धग्रस्त युक्रेनमधून मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावनांतून समोर येत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा हाती घेतले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी भारतात परतले आहेत. भारताचा तिरंगा हाती नसता तर सुखरूप परत आलो नसतो, अशा भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. तसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. 

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष (Russia-Ukraine Conflict) मोठ्या प्रमाणात तीव्र होताना दिसत आहे. रशिया आणि युक्रेन यांची बेलारूस येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये रशियाने युक्रेनसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. दुसरीकडे युक्रेनच्या विविध भागांवर रशियन सैन्याने हल्ले सुरूच ठेवले आहेत. युक्रेनचे सैनिकही त्याला प्रत्युत्तर देत आहे. यातच एअर इंडियाची विमाने हजारो भारतीयांना घेऊन मायदेशात परतत आहेत. 

तिरंगा नसता तर आम्ही सुखरूप बाहेर पडलो नसतो

मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, ज्यामध्ये युक्रेनियन आणि रशियन सैनिक भारताचा तिरंगी ध्वज असलेले वाहन पाहून गोळीबार थांबवत आहेत. एवढेच नाही तर भारतीय विद्यार्थ्यांनाही रस्ता दाखवला जात आहे. भारताच्या तिरंगा ध्वजामुळे सुखरूप परत येऊ शकलो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. रिपोर्टनुसार, आग्र्याच्या आदित्य सिंग युक्रेनमध्ये आहे. त्यांनी आपल्या कुटुंबीयांना फोनवर सांगितले की, येथे खाण्यापिण्याची समस्या आहे, यापूर्वी भारतीय दूतावासाशी संपर्क होत नव्हता. मात्र, आता संपर्कानंतर सुमारे १५० विद्यार्थी तीन बसमधून रोमानियाला रवाना झाले आहेत. 

तिरंगा हाती घेऊन बाहेर पडलो

भारताचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा पाहून रशियन सैनिकांनीही मदत केली. त्यांना रोमानियात आणले गेले. युक्रेनमधून परतलेल्या साक्षीने सांगितले की, आम्हाला युक्रेनमध्ये तिरंग्याचे महत्त्व काय आहे हे कळले. तिरंगा तुमच्यासोबत नसेल तर तुमच्यावर कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो, अशा सूचना आम्हाला आधीच मिळाल्या होत्या. आम्हीही तिरंगा घेऊन बाहेर पडलो होतो, त्यामुळे मला सुखरूप परत येता आले, असे साक्षी म्हणाली. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार