शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

400 किमी दूर बसलेल्या क्षत्रुचा खात्मा करण्यास सक्षम, भारतात दाखल होणार रशियन बनावटीची 'S-400 मिसाइल' सिस्टीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 17:55 IST

रशियन बनावटीच्या या क्षेपणास्त्राच्या मदतीने 400 किमी अंतरावरील शत्रूच्या युद्धनौका, ड्रोन, विमाने आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर हलला करता येईल.

नवी दिल्ली:रशियाने भारताला जमिनीवरुन हवेत मारा करणारे S-400  क्षेपणास्त्र प्रणालीचा पुरवठा सुरू केला आहे. S-400 च्या पुरवठ्यासाठी रशिया आणि भारताने ऑक्टोबर 2018 मध्ये करार केला होता. हे क्षेपणास्त्र 4 वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून,  400 किमी अंतरावरील शत्रूच्या युद्धनौका, ड्रोन, विमाने आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर मारा करण्यास सक्षम आहे. भारताच्या पश्चिम सीमेजवळ या क्षेपणास्त्र प्रणालीला तैनात केले जाईल, तेथूनचे याद्वारे पाकिस्तान आणि चीनच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवरील हल्ल्यांचा सामना करण्यास मदत मिळेल.

फेडरल सर्व्हिस फॉर मिलट्री टेक्निकल कोऑपरेशन(FSMTC) चे संचालक दिमित्री शुगाएव म्हणाले की, भारताला S-400 हवाई संरक्षण प्रणालीचा पुरवठा वेळेवर केला जात आहे. FSMTC ही रशियन सरकारची मुख्य संरक्षण निर्यात संस्था आहे. सध्या S-400 चा वापर चीन आणि तुर्कीमध्ये होत आहे.

भारतासाठी S-400 क्षेपणास्त्रे का महत्त्वाची आहेत?

ही क्षेपणास्त्र प्रणाली एकाच वेळी 36 ठिकाणांना लक्ष्य करू शकते. या प्रणालीला एका ट्रकवर फीट केले जाते आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे हलवता येते. अमेरिकेकडेही या क्षेपणास्त्रांचा सामना करणारी कोणतीही क्षेपणास्त्रे नाहीत. ही रशियन बनावटीची S-200 क्षेपणास्त्रे आणि S-300 क्षेपणास्त्रांची चौथी आणि अधिक शक्तिशाली आवृत्ती आहे.

भारत पाच S-400 खरेदी करत आहेस्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या मते, S-400 ही जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक आहे. त्यात बसवलेले प्रगत रडार 400 किमी अंतरापर्यंतचे लक्ष्य पाहून ते नष्ट करू शकते. भारत रशियाकडून पाच S-400 संरक्षण प्रणाली खरेदी करत आहे. भारतीय लष्कराचे तज्ज्ञ या वर्षी जानेवारीपासून रशियामध्ये ही यंत्रणा चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. या प्रणालीसाठी भारताने 2019 मध्ये रशियाला $800 मिलियन दिले होते. संपूर्ण डील सुमारे 35,000 कोटी रुपयांची आहे.

टॅग्स :russiaरशियाCentral Governmentकेंद्र सरकारPakistanपाकिस्तानchinaचीन