शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

रशियाचा मास्टरस्ट्रोक! १९७१ च्या युद्धात अमेरिकेनं भारतावर हल्ल्याची तयारी केली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:31 IST

३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता परंतु भारतीय सैन्याने त्यांना चोख उत्तर  दिले.

नवी दिल्ली - १९७१ च्या युद्धात भारताला घेरण्यासाठी आणि सैन्य तळावर हल्ला करण्यासाठी अमेरिकेचे न्यूक्लियर पॉवर्ड एअरक्राफ्ट USS एंटरप्राईज बंगालच्या खाडीच्या दिशेने येत होते. पूर्वीचे पाकिस्तान म्हणजे आताचे बांगलादेश इथं भारताने पोहचू नये असं अमेरिकेला वाटत होते. त्यासाठी एअरक्राफ्ट कॅरिअर इंटरप्राइजला बंगालच्या खाडीत तैनात करून रवाना करण्यात आले होते. तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी त्यांच्या सैन्याला थेट भारतीय सैन्य तळावर हल्ला करण्याची परवानगी दिली होती. 

अमेरिकेच्या या खेळीला चोख उत्तर देण्यासाठी रशिया भारताच्या मदतीला पोहचली त्यामुळे अमेरिकेला पळावं लागले. अमेरिका भारतासोबत काय करणार आहे हे रशियाने आधीच सूचित केले होते. त्यावेळी भारतानेही आमचे वॉलंटियर फायटर पायलट अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरिअर इंटरप्राईज आत्मघातकी हल्ल्यासाठी तयार ठेवले होते. 

रशियाच्या एका पाऊलाने युद्धाची दिशा बदलली

रशियाने १९७१ च्या युद्धावेळी खतरनाक चाल खेळली. सोवियत नौसेना प्रमुख एडमिरल गोर्श्कोव यांनी त्यांच्या न्यूक्लियर पॉवर्ड सबमरीनला पाण्याच्या वरील बाजूस आणले. ज्यामुळे अमेरिकन सॅटेलाईट त्याचा फोटो काढू शकेल. रशियाच्या नौसेनेने क्रुझ मिसाईल लेन्स पाणबुड्या बंगालच्या खाडीजवळील समुद्रात पाण्याच्या वरच्या बाजूस दिसतील अशा आणल्या. त्यानंतर जे रशियाला हवं होते तेच झाले. अमेरिकन सॅटेलाईटने हा फोटो घेतला. 

दरम्यान, अमेरिकेने सॅटेलाईट फोटोत बंगालच्या खाडीजवळ रशियाच्या न्यूक्लियर सबमरीन तैनात आहेत हे पाहिले आणि त्यांना धक्का बसला. अमेरिकन नौदल घाबरले. जर त्यांनी भारतावर हल्ला केला तर रशियाची पाणबुडी अमेरिकन सैन्यावर हल्ला करेल. अमेरिकेला रशियासोबत युद्ध नको होतं. त्यामुळे अमेरिकेने त्यांच्या एअरक्राफ्टला दिशा बदलायला सांगितली आणि ते श्रीलंकेच्या दिशेने गेले. 

१३ दिवसांत युद्ध संपलं

३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता परंतु भारतीय सैन्याने त्यांना चोख उत्तर  दिले. जनरल मानेकशा यांच्या नेतृत्वात अवघ्या १३ दिवसांत पाकिस्तानला तोंडघशी पडावे लागले. १६ डिसेंबरला भारताने बांगलादेशाला पूर्व पाकिस्तानपासून स्वातंत्र मिळवून दिले. या युद्धात ९१ हजार पाक सैनिक भारताने पकडले परंतु पाकिस्तान सरकारच्या निवेदनानंतर भारताने त्यांना सोडून गेले. या युद्धात रशियाने भारताला साथ दिली नसती तर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या दुहेरी संकटात भारत अडकला असता.    

टॅग्स :IndiaभारतrussiaरशियाAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान