शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रशियाचा मास्टरस्ट्रोक! १९७१ च्या युद्धात अमेरिकेनं भारतावर हल्ल्याची तयारी केली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:31 IST

३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता परंतु भारतीय सैन्याने त्यांना चोख उत्तर  दिले.

नवी दिल्ली - १९७१ च्या युद्धात भारताला घेरण्यासाठी आणि सैन्य तळावर हल्ला करण्यासाठी अमेरिकेचे न्यूक्लियर पॉवर्ड एअरक्राफ्ट USS एंटरप्राईज बंगालच्या खाडीच्या दिशेने येत होते. पूर्वीचे पाकिस्तान म्हणजे आताचे बांगलादेश इथं भारताने पोहचू नये असं अमेरिकेला वाटत होते. त्यासाठी एअरक्राफ्ट कॅरिअर इंटरप्राइजला बंगालच्या खाडीत तैनात करून रवाना करण्यात आले होते. तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी त्यांच्या सैन्याला थेट भारतीय सैन्य तळावर हल्ला करण्याची परवानगी दिली होती. 

अमेरिकेच्या या खेळीला चोख उत्तर देण्यासाठी रशिया भारताच्या मदतीला पोहचली त्यामुळे अमेरिकेला पळावं लागले. अमेरिका भारतासोबत काय करणार आहे हे रशियाने आधीच सूचित केले होते. त्यावेळी भारतानेही आमचे वॉलंटियर फायटर पायलट अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरिअर इंटरप्राईज आत्मघातकी हल्ल्यासाठी तयार ठेवले होते. 

रशियाच्या एका पाऊलाने युद्धाची दिशा बदलली

रशियाने १९७१ च्या युद्धावेळी खतरनाक चाल खेळली. सोवियत नौसेना प्रमुख एडमिरल गोर्श्कोव यांनी त्यांच्या न्यूक्लियर पॉवर्ड सबमरीनला पाण्याच्या वरील बाजूस आणले. ज्यामुळे अमेरिकन सॅटेलाईट त्याचा फोटो काढू शकेल. रशियाच्या नौसेनेने क्रुझ मिसाईल लेन्स पाणबुड्या बंगालच्या खाडीजवळील समुद्रात पाण्याच्या वरच्या बाजूस दिसतील अशा आणल्या. त्यानंतर जे रशियाला हवं होते तेच झाले. अमेरिकन सॅटेलाईटने हा फोटो घेतला. 

दरम्यान, अमेरिकेने सॅटेलाईट फोटोत बंगालच्या खाडीजवळ रशियाच्या न्यूक्लियर सबमरीन तैनात आहेत हे पाहिले आणि त्यांना धक्का बसला. अमेरिकन नौदल घाबरले. जर त्यांनी भारतावर हल्ला केला तर रशियाची पाणबुडी अमेरिकन सैन्यावर हल्ला करेल. अमेरिकेला रशियासोबत युद्ध नको होतं. त्यामुळे अमेरिकेने त्यांच्या एअरक्राफ्टला दिशा बदलायला सांगितली आणि ते श्रीलंकेच्या दिशेने गेले. 

१३ दिवसांत युद्ध संपलं

३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता परंतु भारतीय सैन्याने त्यांना चोख उत्तर  दिले. जनरल मानेकशा यांच्या नेतृत्वात अवघ्या १३ दिवसांत पाकिस्तानला तोंडघशी पडावे लागले. १६ डिसेंबरला भारताने बांगलादेशाला पूर्व पाकिस्तानपासून स्वातंत्र मिळवून दिले. या युद्धात ९१ हजार पाक सैनिक भारताने पकडले परंतु पाकिस्तान सरकारच्या निवेदनानंतर भारताने त्यांना सोडून गेले. या युद्धात रशियाने भारताला साथ दिली नसती तर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या दुहेरी संकटात भारत अडकला असता.    

टॅग्स :IndiaभारतrussiaरशियाAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान