शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

रशियाचा मास्टरस्ट्रोक! १९७१ च्या युद्धात अमेरिकेनं भारतावर हल्ल्याची तयारी केली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:31 IST

३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता परंतु भारतीय सैन्याने त्यांना चोख उत्तर  दिले.

नवी दिल्ली - १९७१ च्या युद्धात भारताला घेरण्यासाठी आणि सैन्य तळावर हल्ला करण्यासाठी अमेरिकेचे न्यूक्लियर पॉवर्ड एअरक्राफ्ट USS एंटरप्राईज बंगालच्या खाडीच्या दिशेने येत होते. पूर्वीचे पाकिस्तान म्हणजे आताचे बांगलादेश इथं भारताने पोहचू नये असं अमेरिकेला वाटत होते. त्यासाठी एअरक्राफ्ट कॅरिअर इंटरप्राइजला बंगालच्या खाडीत तैनात करून रवाना करण्यात आले होते. तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी त्यांच्या सैन्याला थेट भारतीय सैन्य तळावर हल्ला करण्याची परवानगी दिली होती. 

अमेरिकेच्या या खेळीला चोख उत्तर देण्यासाठी रशिया भारताच्या मदतीला पोहचली त्यामुळे अमेरिकेला पळावं लागले. अमेरिका भारतासोबत काय करणार आहे हे रशियाने आधीच सूचित केले होते. त्यावेळी भारतानेही आमचे वॉलंटियर फायटर पायलट अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरिअर इंटरप्राईज आत्मघातकी हल्ल्यासाठी तयार ठेवले होते. 

रशियाच्या एका पाऊलाने युद्धाची दिशा बदलली

रशियाने १९७१ च्या युद्धावेळी खतरनाक चाल खेळली. सोवियत नौसेना प्रमुख एडमिरल गोर्श्कोव यांनी त्यांच्या न्यूक्लियर पॉवर्ड सबमरीनला पाण्याच्या वरील बाजूस आणले. ज्यामुळे अमेरिकन सॅटेलाईट त्याचा फोटो काढू शकेल. रशियाच्या नौसेनेने क्रुझ मिसाईल लेन्स पाणबुड्या बंगालच्या खाडीजवळील समुद्रात पाण्याच्या वरच्या बाजूस दिसतील अशा आणल्या. त्यानंतर जे रशियाला हवं होते तेच झाले. अमेरिकन सॅटेलाईटने हा फोटो घेतला. 

दरम्यान, अमेरिकेने सॅटेलाईट फोटोत बंगालच्या खाडीजवळ रशियाच्या न्यूक्लियर सबमरीन तैनात आहेत हे पाहिले आणि त्यांना धक्का बसला. अमेरिकन नौदल घाबरले. जर त्यांनी भारतावर हल्ला केला तर रशियाची पाणबुडी अमेरिकन सैन्यावर हल्ला करेल. अमेरिकेला रशियासोबत युद्ध नको होतं. त्यामुळे अमेरिकेने त्यांच्या एअरक्राफ्टला दिशा बदलायला सांगितली आणि ते श्रीलंकेच्या दिशेने गेले. 

१३ दिवसांत युद्ध संपलं

३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता परंतु भारतीय सैन्याने त्यांना चोख उत्तर  दिले. जनरल मानेकशा यांच्या नेतृत्वात अवघ्या १३ दिवसांत पाकिस्तानला तोंडघशी पडावे लागले. १६ डिसेंबरला भारताने बांगलादेशाला पूर्व पाकिस्तानपासून स्वातंत्र मिळवून दिले. या युद्धात ९१ हजार पाक सैनिक भारताने पकडले परंतु पाकिस्तान सरकारच्या निवेदनानंतर भारताने त्यांना सोडून गेले. या युद्धात रशियाने भारताला साथ दिली नसती तर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या दुहेरी संकटात भारत अडकला असता.    

टॅग्स :IndiaभारतrussiaरशियाAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान