नाशिक : राज्य शासनाची पंचायत राज समिती मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा दौर्यावर येत असून, या समितीच्या तयारीत ग्रामीण विकास यंत्रणा पूर्णत: गुंतल्यामुळे जलयुक्त शिवार तसेच पाणीटंचाईची सारी कामे ठप्प झाली आहेत. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. जिल्ात दर महिन्याला शासनाची कुठली तरी समिती दौर्यावर येत असल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून अधिकार्यांचे शासकीय कामावर दुर्लक्ष होत असून, त्याचा परिणाम विकासकामे तसेच दुष्काळ निवारणाच्या कामांवर दिसू लागले आहेत. विशेष करून शासनाच्याच जलयुक्त शिवार योजनेच्या कामांनाही अधिकार्यांच्या अन्यत्र व्यस्ततेमुळे खीळ बसू लागली आहे. आता पुन्हा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंचायत राज ही अतिशय महत्त्वाची समिती जिल्हा दौर्यावर येत असल्यामुळे या समितीने उपस्थित केलेल्या मुद्यांच्या आधारे गेल्या पाच ते सात वर्षांपूर्वीची माहिती गोळा करण्यात संपूर्ण ग्रामीण विकास यंत्रणा लागली असून, अधिकारी बैठकांमध्ये व्यस्त राहू लागल्याने पंचायत समित्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. या समितीतील सदस्यांची व्यवस्था, निवास, दौर्याचा कार्यक्रम याशिवाय समितीबरोबर येणार्या शासकीय अधिकार्यांसाठी वाहने आदि अनेक कामांची जबाबदारी अधिकार्यांवर सोपविण्यात आल्याने काही अधिकारी तर समितीच्या तयारीच्या निमित्ताने कार्यालयाकडे पाठ फिरवित आहेत. सध्या जिल्ात पाण्याचा प्रश्न गंभीर असून, नजीकच्या काळात जनावरांच्या चार्याचीही समस्या उभी राहण्याची शक्यता आहे, ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याची मुख्य जबाबदारी गट विकास अधिकार्यांची असली तरी, पंचायत राज समितीच्या दौर्यालाच अधिकार्यांनी प्राधान्य दिल्याची तक्रार ग्रामस्थ करू लागले आहेत.
ग्रामीण विकास यंत्रणा तयारीत गुंग
By admin | Updated: April 27, 2016 00:07 IST