शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, २३ प्रवासी असलेली टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळली, १२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 15:23 IST

Uttarakhand accident : बद्रीनाथ महामार्गावरील रेंटोलीजवळ हा अपघात झाला.

उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. टेम्पो ट्रॅव्हलरचा ताबा सुटून उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावरील अलकनंदा नदीत पडली. या अपघातात १० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बद्रीनाथ महामार्गावरील रेंटोलीजवळ हा अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलरचा ताबा सुटून उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावरील अलकनंदा नदीत पडली. या अपघातात दहा पर्यटकांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये २३ प्रवासी असल्याची माहिती आहे. सर्वजण बद्रीनाथ दर्शनासाठी जात होते. हे पर्यटक दिल्लीतील असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफची टीमही घटनास्थळी रवाना झाली. एमआरएफ आणि एनडीआरपीची टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू झाले आहे.तसेच, स्थानिक लोक पोलिसांना मदत करत आहेत. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. गंभीर जखमींना हेलिकॉप्टरने ऋषिकेश एम्समध्ये पाठवण्यात येत आहे. एसपी डॉ. विशाखा अशोक भदाणे यांनी सांगितले की, स्थानिक लोक, एसडीआरएफ, अग्निशमन सेवा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि जल पोलीस बचावकार्य करत आहेत.

या अपघातावर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्यक्त केले दु:ख उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. पुष्कर सिंह धामी यांनी एक्सवर लिहिले की, "रुद्रप्रयाग जिल्ह्यात टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघाताची अत्यंत वेदनादायक बातमी मिळाली. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचावकार्य सुरु केले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दिवंगतांच्या आत्म्याला शांती मिळो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी बाबा केदार यांना प्रार्थना करतो."

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAccidentअपघात