शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

UN मध्ये पाकिस्तानला फटकारणाऱ्या कोण आहेत रुचिरा कंबोज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 13:18 IST

Ruchira Kamboj : संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) विशेष सत्रादरम्यान रुचिरा कंबोज यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली.

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघातील (United Nations) भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज (Ruchira Kamboj) यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला (Pakistan) फटकारले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) विशेष सत्रादरम्यान रुचिरा कंबोज यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली.

यावेळी रुचिरा कंबोज यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहणार असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच, पाकिस्तान संयुक्त राष्ट्रासारख्या मोठ्या व्यासपीठाचा गैरवापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान,  रुचिरा कंबोज या 1987 च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या त्या पहिल्या महिला राजदूत आहेत.

भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी रुचिरा कंबोज यांनी ऑगस्ट 2022 मध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या नवीन स्थायी प्रतिनिधी म्हणून पदभार स्वीकारला. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या त्या पहिल्या महिला राजदूत आहेत. रुचिरा कंबोज 1987 च्या बॅचच्या IFS अधिकारी आहेत. यापूर्वी त्या भूतानमध्ये भारताच्या राजदूत होत्या. तसेच, त्यांनी दक्षिण आफ्रिकेत भारताचे उच्चायुक्त म्हणूनही काम केले आहे. याशिवाय, 2011 ते 2014 पर्यंत त्या भारताच्या चीफ ऑफ प्रोटोकॉल म्हणून कार्यरत होत्या.

अनेक जबाबदार पदांवर काम करण्याचा अनुभवरुचिरा कंबोज यांची जून 2022 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मुख्यालयात भारताची स्थायी प्रतिनिधी  (Permanent Representative to UN) म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी राजदूत टीएस तिरुमूर्ती यांची जागा घेतली. रुचिरा कंबोज यांनी फ्रान्समध्ये थर्ड सेक्रेटरी म्हणून कारकीर्द सुरू केली होती. 1989 ते 1991 या काळात फ्रान्समधील भारतीय दूतावासात त्यांनी थर्ड सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याचबरोर, 1991 ते 1996 पर्यंत रुचिरा कंबोज यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या युरोप पश्चिम विभागात अतिरिक्त सचिव (Upper Secretary) म्हणून काम केले. तसेच, 1987 च्या सिव्हिल सर्व्हिसेस बॅचच्या त्या अखिल भारतीय महिला टॉपर होत्या.

टॅग्स :United StatesअमेरिकाIndiaभारतPakistanपाकिस्तान