शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

UPA सरकारमध्येही व्हायचं टॅपिंग; दर महिन्याला 9 हजार कॉल्स, 500 इमेल्सची पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 10:07 IST

कॉम्प्युटर आणि संचार साधनांवर पाळत ठेवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

नवी दिल्ली- कॉम्प्युटर आणि संचार साधनांवर पाळत ठेवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता आरटीआयमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकार प्रत्येक महिन्याला 9 हजार कॉल्स रेकॉर्ड करत होती. तसेच 500 इमेल्सवरही पाळत ठेवत असल्याचंही समोर आलं आहे.काँग्रेसच्या नेतृत्वातील मनमोहन सरकारनं हजारो फोन कॉल्स आणि इमेल इंटरसेप्ट केले होते. गृहमंत्रालयानं आरटीआयच्या अर्जाला दिलेल्या उत्तरातून हे उघड झालं आहे. केंद्र सरकार सरासरी 7500 ते 9000 फोन कॉल्स इंटरसेप्शन करण्याचे आदेश देत होतं. 6 ऑगस्ट 2013च्या प्रसेनजीत मंडळ यांच्या आरटीआय उत्तरात गृह मंत्रालयानं सांगितलं की, केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला 7500-9000 फोन कॉल्स रेकॉर्ड केले जात होत. तसेच प्रत्येक महिन्याला 300 ते 500 इमेल्सवरही नजर ठेवली जात होती. टेलिग्राफ एक्टनुसार संस्थांना फोन कॉल्स आणि इमेल इंटरसेप्शन करण्याचे अधिकार प्राप्त असल्याचाही या आरटीआयमधून खुलासा करण्यात आला होता.