शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

म्हैस आणि जर्सी गायीच्या दुधामुळं गुन्हेगारीत वाढ होतेय; रा. स्व. संघ प्रचारकाचा जावईशोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 16:03 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ नेत्यानं वादग्रस्त विधान केलं आहे. म्हैस आणि जर्सी गायीच्या दुधाच्या सेवनामुळं गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होत असल्याचा जावईशोध लावला आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ नेत्यानं वादग्रस्त विधान केलं आहे. म्हैस आणि जर्सी गायीच्या दुधाच्या सेवनामुळं गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होत आहे. नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार आरएसएसचे वरिष्ठ प्रचारक शंकरलाल यांनी असा दावा केला आहे. भारतीय गायींच्या दुधामुळं सात्विक शक्ती मिळते. देशी गाईच्या पोटात चुकून विष जरी गेलं तरी ते विष गाईच्या दुध, गोमूत्र अथवा शेणामध्ये जात नाही. बायबल, कुराण यांच्यासह इतर धर्मग्रंथात गोमांस निषिद्ध मानलं गेलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

देशी गाईच्या दुधाचे सेवन केल्यामुळं गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होतं असल्याचा दावाही त्यांनी केला. जर्सी गाईचं अथवा म्हशीचे दुध पिल्यानं रागाचं प्रमाण वाढतं आणि सहनशीलता संपते असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की,  भारतीय गायींची चमडी पातळ आसते. त्यांना खांदा असतो. पाय सरळ व मजबूत, पोळ खूपच लोंबती आणि शिस्न मध्यम आकाराचे असते.  तर जर्सी गाईंची चमडी ही जाडजूड असते. 

देशी गाईद्वारे गुन्हेगारमुक्त भारत ही कल्पाना आमंलात आणली जात असल्याचे आरएसएस प्रचारक शंकरलाल  यांनी सांगितले.  ते म्हणाले की, गाय प्रदुषण कमी करण्यातही मोलाची भुमिका बजावते. एक ग्राम तुपाचा दिवा लावल्यानं 100 किलो ऑक्सिजनची निर्मिती होते. जर तुपाचा दिवा तुळशीसमोर लावल्याने ओझोन गॅसचीही निर्मिती होतं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

एखादी व्यक्ती आजारी असल्यास त्यांच्या समोर तूपचा दिवा लावल्यास ऑक्सिजनची कमी भासत नाही, असाही दावा शंकरलाल यांनी केला. एक एकर शेती आणि एका देशी गाईच्या मदतीनं 50 हजारांचं एका महिन्यात घेता येऊ शकतं. याबाबतचं प्रशिक्षण लोकांना दिलं जात असल्याची माहिती यावेळी शंकरलाल यांनी दिली. 31 मार्च रोजी संघातर्फे गौ जप महायज्ञचे आयोजन करण्यात आलं आहे.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ