शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

गायीच्या शेणानं बनू शकते बंकर, कॅन्सरवर उपाय शक्य- इंद्रेश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 15:07 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक इंद्रेश कुमार यांनी गायीच्या शेणानं बंकरही बनवता येऊ शकतं, असं विधान केलं आहे.

नवी दिल्ली, दि. 3 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक इंद्रेश कुमार यांनी गायीच्या शेणानं बंकरही बनवता येऊ शकतं, असं विधान केलं आहे. तसेच गायीच्या मूत्रापासून कॅन्सर सारख्या दुर्धर रोगावरही उपाय करता येऊ शकतो, असंही ते म्हणाले आहेत. चंदीगडमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी गायीवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. गोमांस हे विषासारखं आहे, गायीचे गोमूत्र व शेण हे उपयोगी असून, त्यापासून सैन्याला बंकरही बनवता येऊ शकतात. भारतातील अनेक खेड्यांमधील जमिनी सारवण्यासाठी आणि भिंती लिंपण्यासाठी शेणाचा सर्रास उपयोग केला जातो. लष्कर बंकर्स बनवण्यासाठीही शेणाचा वापर करू शकते, असे इंद्रेश कुमार म्हणाले आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एका इफ्तार पार्टीत मुस्लिमांनी मांस खाणे सोडलं पाहिजे, असं मत मांडलं होतं. जगामधील 90 टक्के लोक हे गायीच्या दुधावर निर्भर आहेत. गायीला माता म्हणूनही संबोधले जाते. गाय विषारी घटकांचं सेवन करते आणि शुद्ध दूध आणि शेण देते. गोमूत्रातही आयुर्वेदिक औषधी गुण असल्यानं कॅन्सरसारखा रोगही बरा होऊ शकतो, असंही इंद्रेश कुमार म्हणाले आहेत. प्रेषित आणि त्यांच्या अनुयायांनी कधीच मांस खाल्लं नाही. त्यामुळे मुस्लिमांनी मांस खाणं सोडून द्यावं, असे कुमार काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.गायीपासून मिळणा-या उत्पादनांच्या संशोधनासाठी देशभरातील 50 संशोधन संस्थांनी आयआयटी दिल्लीकडे आपले प्रस्ताव पाठवले आहेत.  स्वरुप हा प्रकल्प (सायंटिफिक व्हॅलिडेशन अॅंड रिसर्च ऑन पंचगव्य) खास गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनांच्या संशोधनासाठी तयार सुरु करण्यात आला आहे. पंचगव्यामध्ये गायीचे दूध, दही, गोमय, गोमूत्र आणि तूप यांचा समावेश होतो. आम्हाला सीएसआयआर प्रयोगशाळा, एनआयटी, आयआयटी अशा संस्थांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. अद्याप कोणत्याही संशोधन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली नाही, असे आयआयटी दिल्लीच्या ग्रामविकास आणि तंत्रज्ञान विभागाच्या व्ही. के विजय यांनी स्पष्ट केले होते. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आयआयटी दिल्लीमध्ये स्वरुप वरती विचारमंथन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पंचगव्याचा शेती, कुपोषण, साबण-डासप्रतिबंधक औषधांसारखी ग्राहकोपयोगी उत्पादनांसाठी कसा उपयोग होईल यावर चर्चा करण्यात आली होती. आता भारतीय गायींचे वेगळेपण आणि परदेशी गायींच्या तुलनेमध्ये त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनांची उपयुक्तता याचा अभ्यास करण्याचा विचार सरकारचा असल्याचे सांगण्यात येत होते.