शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

 घटस्फोटाचे प्रमाण सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये अधिक- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 11:02 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाढत्या घटस्फोटाच्या प्रकरणांवर मतप्रदर्शन केलं आहे.

अहमदाबाद : सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाढत्या घटस्फोटाच्या प्रकरणांवर मतप्रदर्शन केलं आहे. घटस्फोटाचे प्रमाण सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये अधिक असल्याचं भागवतांनी अधोरेखित केलं आहे. शिक्षण आणि संपन्नतेसोबत अहंकारही येतो. त्या कारणास्तव कुटुंबं विभक्त होतात, असं मोहन भागवत म्हणाले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत रविवारी संघाच्या स्वयंसेवकांशी अहमदाबादमध्ये बोलत होते.घटस्फोटाची प्रकरणे आजकाल मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. किरकोळ कारणांवरून जोडपी भांडतात. सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाची प्रकरणे अधिक आढळतात. मी हिंदू आहे. सर्वधर्मीय श्रद्धांचा मी आदर करतो, मात्र माझ्या स्वत:च्या श्रद्धास्थानांबाबत मी आग्रही आहे. मला माझ्या कुटुंबाकडून संस्कार मिळाले आहेत आणि मातृशक्ती आम्हाला ते शिकवते, संघातील उपक्रमांबाबत स्वयंसेवकांनी आपल्या कुटुंबीयांनाही सांगावे, अशी आमची अपेक्षा आहे. कारण अनेकदा आपल्या कुटुंबातील महिलांना अधिक वेदनादायी कामं करावी लागतात. आपुलकीची भावना ही समाजाची ओळख आहे.2 हजार वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेचं पालन करत असल्यानंच समाजात अशी परिस्थिती आहे. आपण महिलांना घरांपर्यंत मर्यादित ठेवलं आहे. अशी स्थिती 2 हजार वर्षांपूर्वी नव्हती. तो आपल्या समाजाचा सुवर्ण काळ आहे. हिंदू समाजानं सदगुणी आणि संघटित झालं पाहिजे. जेव्हा मी समाजासंदर्भात बोलतो तेव्हा फक्त ते पुरुषांसाठी नसतं. मी हिंदू आहे. मी सर्वच धर्मांच्या पवित्र स्थानांचा सन्मान करतो. परंतु मी आपल्या श्रद्धेच्या स्थानाप्रति कटिबद्ध आहे. मला हे संस्कार माझ्या कुटुंबीयांकडून मिळाले आहेत.मला मातृशक्तीनेच हे गुण शिकवले आहेत. कुटुंब आणि महिलेशिवाय समाज पूर्ण होत नाही. जी अर्ध्या समाजाचं नेतृत्व करते आणि त्याला शिक्षित करते. परंतु समाजाची आम्ही चिंता करत नाही. भारताकडे हिंदू समाजाशिवाय कोणताही पर्याय नाही. हिंदू समाजाकडेही परिवारासारखं व्यवहार करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचंही मोहन भागवतांनी स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत