शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Mohan Bhagwat: “हिंदूंना सुसंघटित करणे हेच RSSचे खरे ध्येय”; मोहन भागवतांचे रोखठोक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 17:05 IST

RSSचे दूरून नव्हे तर प्रत्यक्ष सहभाग घेऊन निरीक्षणाने विश्लेषण करावे, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले आहे.

शिलाँग: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही केवळ संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करणारी एखादी संघटना नसून हिंदू समाजाला सुसंघटित करणे हेच खरे तिचे ध्येय आहे. भारताचा सर्वांगीण विकास व्हावा, ते साध्य करण्यासाठी स्वयंसेवक शाखा कार्यपद्धतीतून काही शिस्त शिकतात, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. मेघालयची राजधानी शिलाँग येथील यू सोसो थाम सभागृहात जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. 

आपण अनादी काळापासून एक प्राचीन राष्ट्र आहोत परंतु आपली सभ्यता आणि मूल्ये विसरल्यामुळे आपण आपले स्वातंत्र्य गमावले. आमची एकमेकांमधील बंधुत्वाची शक्ती ही अध्यात्मात निहित असलेली आमच्या जुन्या मूल्यावरील आमची जन्मजात श्रद्धा आहे. या देशाच्या शाश्वत सभ्यतेच्या मूल्यांना आपल्या देशाबाहेरील लोकांनी हिंदुत्व असे नाव दिले होते.  आम्ही हिंदू आहोत पण हिंदूची कोणतीही विशिष्ट व्याख्या नाही जरी ती आमची ओळख असली तरीही.  भारतीय आणि हिंदू हे दोन्ही शब्द समानार्थी शब्द आहेत. खरं तर ती भौगोलिक-सांस्कृतिक ओळख आहे याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले.

संघ स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून देशासाठी त्याग करायला शिकवतो

संघ स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून देशासाठी त्याग करायला शिकवतो.  एका तासाच्या संघशाखांमध्ये लोकांना ही परोपकारी मूल्ये आणि मातृभूमीबद्दलचे कर्तव्य कळते असे डॉ भागवत म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या देशाच्या प्राचीन इतिहासातून बलिदानाची ही परंपरा रेखाटली आहे.  आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्या होत्या आणि जपान, कोरिया, इंडोनेशिया आणि इतर अनेक देशांमध्ये आपल्या समान मूल्यांचा ठसा उमटवला होता.  तीच परंपरा आजही आपण पाळत आहोत.  डॉ. भागवत यांनी कोरोना संकटाच्या वेळी भारताने विविध देशांमध्ये लस पाठवून मानवतेची सेवा कशी केली याची उदाहरणे दिली आणि काही काळापूर्वी आपला देश श्रीलंकेच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभा होता याचेही स्मरण करून दिले.

राष्ट्रीयत्व व स्वयंसेवकत्व या प्रमुख गोष्टी

सरसंघचालकांनी १९२५ पासून आजतागायत पाच पिढ्यांपासून समर्पित स्वयंसेवकांच्या मदतीने संघ कसा राष्ट्रीय पुनर्निर्माण कार्य करत आहे यावर भर दिला. ते पुढे म्हणाले की संघ ही केवळ संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करणारी एखादी संघटना नसून हिंदू समाजाला सुसंघटित करणे हेच खरे तिचे ध्येय आहे. संघाचा सगळा भर ही रोजच्या सरावाने चांगल्या सवयी स्वतःत खोल रुजवण्यावर आहे. ज्या तीन गोष्टींवर भर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यात राष्ट्रीयत्व व स्वयंसेवकत्व या प्रमुख आहेत, असे नमूद केले. 

दरम्यान, जर भारत हे राष्ट्र सामर्थ्यवान आणि समृद्ध झाले तर प्रत्येक भारतीयही सामर्थ्यवान आणि समृद्ध होईल.  डॉ भागवत यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील श्रोत्यांना रा. स्व. संघाचे दूरून नव्हे तर प्रत्यक्ष सहभाग घेऊन निरीक्षणाने विश्लेषण करण्यास सांगितले.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ