शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

Mohan Bhagwat: “हिंदूंना सुसंघटित करणे हेच RSSचे खरे ध्येय”; मोहन भागवतांचे रोखठोक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 17:05 IST

RSSचे दूरून नव्हे तर प्रत्यक्ष सहभाग घेऊन निरीक्षणाने विश्लेषण करावे, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले आहे.

शिलाँग: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही केवळ संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करणारी एखादी संघटना नसून हिंदू समाजाला सुसंघटित करणे हेच खरे तिचे ध्येय आहे. भारताचा सर्वांगीण विकास व्हावा, ते साध्य करण्यासाठी स्वयंसेवक शाखा कार्यपद्धतीतून काही शिस्त शिकतात, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. मेघालयची राजधानी शिलाँग येथील यू सोसो थाम सभागृहात जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. 

आपण अनादी काळापासून एक प्राचीन राष्ट्र आहोत परंतु आपली सभ्यता आणि मूल्ये विसरल्यामुळे आपण आपले स्वातंत्र्य गमावले. आमची एकमेकांमधील बंधुत्वाची शक्ती ही अध्यात्मात निहित असलेली आमच्या जुन्या मूल्यावरील आमची जन्मजात श्रद्धा आहे. या देशाच्या शाश्वत सभ्यतेच्या मूल्यांना आपल्या देशाबाहेरील लोकांनी हिंदुत्व असे नाव दिले होते.  आम्ही हिंदू आहोत पण हिंदूची कोणतीही विशिष्ट व्याख्या नाही जरी ती आमची ओळख असली तरीही.  भारतीय आणि हिंदू हे दोन्ही शब्द समानार्थी शब्द आहेत. खरं तर ती भौगोलिक-सांस्कृतिक ओळख आहे याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले.

संघ स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून देशासाठी त्याग करायला शिकवतो

संघ स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून देशासाठी त्याग करायला शिकवतो.  एका तासाच्या संघशाखांमध्ये लोकांना ही परोपकारी मूल्ये आणि मातृभूमीबद्दलचे कर्तव्य कळते असे डॉ भागवत म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या देशाच्या प्राचीन इतिहासातून बलिदानाची ही परंपरा रेखाटली आहे.  आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्या होत्या आणि जपान, कोरिया, इंडोनेशिया आणि इतर अनेक देशांमध्ये आपल्या समान मूल्यांचा ठसा उमटवला होता.  तीच परंपरा आजही आपण पाळत आहोत.  डॉ. भागवत यांनी कोरोना संकटाच्या वेळी भारताने विविध देशांमध्ये लस पाठवून मानवतेची सेवा कशी केली याची उदाहरणे दिली आणि काही काळापूर्वी आपला देश श्रीलंकेच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभा होता याचेही स्मरण करून दिले.

राष्ट्रीयत्व व स्वयंसेवकत्व या प्रमुख गोष्टी

सरसंघचालकांनी १९२५ पासून आजतागायत पाच पिढ्यांपासून समर्पित स्वयंसेवकांच्या मदतीने संघ कसा राष्ट्रीय पुनर्निर्माण कार्य करत आहे यावर भर दिला. ते पुढे म्हणाले की संघ ही केवळ संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करणारी एखादी संघटना नसून हिंदू समाजाला सुसंघटित करणे हेच खरे तिचे ध्येय आहे. संघाचा सगळा भर ही रोजच्या सरावाने चांगल्या सवयी स्वतःत खोल रुजवण्यावर आहे. ज्या तीन गोष्टींवर भर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यात राष्ट्रीयत्व व स्वयंसेवकत्व या प्रमुख आहेत, असे नमूद केले. 

दरम्यान, जर भारत हे राष्ट्र सामर्थ्यवान आणि समृद्ध झाले तर प्रत्येक भारतीयही सामर्थ्यवान आणि समृद्ध होईल.  डॉ भागवत यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील श्रोत्यांना रा. स्व. संघाचे दूरून नव्हे तर प्रत्यक्ष सहभाग घेऊन निरीक्षणाने विश्लेषण करण्यास सांगितले.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ