शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

बांगलादेश ते बंगालपर्यंत..., संघाच्या समन्वय बैठकीत या मुद्यांवर होणार चर्चा! केरळमध्ये 3 दिवस चालणार महामंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 15:33 IST

बैठकीच्या सुरुवातीला वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनासंदर्भातील माहिती आणि स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्याची माहिती सर्व प्रतिनिधींना देण्यात आली. या बैठकीत विविध संघटनांचे कार्यकर्ते कामाची माहिती आणि अनुभवांचे आदान-प्रदान करतील.

केरळमधील पलक्कडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीला सुरुवात झाली आहे. शनिवारी (31 ऑगस्ट) सरसंघचालक मोहन भागवत यांनी दीप प्रज्वलन करून बैठकीचा शुभारंभ केला. या बैठकीला सर्व 32 संलग्न संघटनांचे पदाधिकारी उपस्थित आहेत. संघप्रमुख मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे व्यासपीठावर उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनासंदर्भातील माहिती आणि स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्याची माहिती सर्व प्रतिनिधींना देण्यात आली. या बैठकीत विविध संघटनांचे कार्यकर्ते कामाची माहिती आणि अनुभवांचे आदान-प्रदान करतील.

या विषयांवर होऊ शकते चर्चा -या समन्वय बैठकीत राष्ट्रीय मुद्यांबरोबरच पश्चिम बंगाल सारख्या अनेक राज्यांतील महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते. या बैठकीला भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि सरचिटणीस बी.एल.संतोषही उपस्थित राहतील. मोदी सरकार 3.0 च्या स्थापनेनंतर संघाची ही पहिलीच समन्वय बैठक आहे. या बैठकीत विविध विषयांवर परस्पर सहकार्य आणि समन्वय वाढविण्यासंदर्भात आवश्यक उपाय योजनांवरही चर्चा केली जाईल.

काय म्हणाले प्रचार प्रमुख? - प्रचार प्रमुख सुनील आंबेडकर म्हणाले, "आम्ही केरळमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची बैठक घेत आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 90 सदस्यांसह 32 संघटनांचे 320 सदस्य या बैठकीत विचारविनिमय करतील. आम्ही निमंत्रितांकडून (राष्ट्रीय अध्यक्ष, संस्थेचे सचिव, पदाधिकारी) फीडबॅक घेऊ आणि जमिनीवरील परिस्थितीवर चर्चा करू. प्रत्येक संस्था त्या-त्या क्षेत्रातील अनुभव, त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि त्यांच्या निरीक्षणांचे आदान प्रदानही करतील."

आंबेकर पुढे म्हणाले, "राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे, राष्ट्रीय सुरक्षा, वर्तमान काळातील मुद्दे, घटना घडामोडी, काही राज्यांचे मुद्दे, काही राज्यातील चिंताजनक मुद्दे आदींवर चर्चा केली जाईल. समन्वय आणखी चांगला कशा प्रकारे करता येईल यावरही चर्चा होईल. तीन दिवसांत अेक सत्र होतील." या शिवाय, "आम्ही 2025 विजयादशमी ते 2026 विजयादशमी पर्यंत शताब्दी वर्ष साजरे करणार आहोत, याअंतर्गत आम्ही मोठ्या प्रमाणावर सामाजिक परिवर्तनाचे मुद्दे मांडणार आहोत. पंच परिवर्तनावर काम केले जाईल. यात, सामाजिक समरसता, कुंटुंब जागरण, पर्यावरणविषयक समस्या, आत्मसन्मान आणि नागरी कर्तव्य यांचा समावेश असेल. विजयादशमी 2025 रोजी हे पाचही उपक्रम आरएसएसकडून मोठ्या प्रमाणावर सुरू केले जातील," असेही ते म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघKeralaकेरळMohan Bhagwatमोहन भागवतJ P Naddaजगत प्रकाश नड्डा