शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

बांगलादेश ते बंगालपर्यंत..., संघाच्या समन्वय बैठकीत या मुद्यांवर होणार चर्चा! केरळमध्ये 3 दिवस चालणार महामंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 15:33 IST

बैठकीच्या सुरुवातीला वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनासंदर्भातील माहिती आणि स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्याची माहिती सर्व प्रतिनिधींना देण्यात आली. या बैठकीत विविध संघटनांचे कार्यकर्ते कामाची माहिती आणि अनुभवांचे आदान-प्रदान करतील.

केरळमधील पलक्कडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीला सुरुवात झाली आहे. शनिवारी (31 ऑगस्ट) सरसंघचालक मोहन भागवत यांनी दीप प्रज्वलन करून बैठकीचा शुभारंभ केला. या बैठकीला सर्व 32 संलग्न संघटनांचे पदाधिकारी उपस्थित आहेत. संघप्रमुख मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे व्यासपीठावर उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनासंदर्भातील माहिती आणि स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्याची माहिती सर्व प्रतिनिधींना देण्यात आली. या बैठकीत विविध संघटनांचे कार्यकर्ते कामाची माहिती आणि अनुभवांचे आदान-प्रदान करतील.

या विषयांवर होऊ शकते चर्चा -या समन्वय बैठकीत राष्ट्रीय मुद्यांबरोबरच पश्चिम बंगाल सारख्या अनेक राज्यांतील महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते. या बैठकीला भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि सरचिटणीस बी.एल.संतोषही उपस्थित राहतील. मोदी सरकार 3.0 च्या स्थापनेनंतर संघाची ही पहिलीच समन्वय बैठक आहे. या बैठकीत विविध विषयांवर परस्पर सहकार्य आणि समन्वय वाढविण्यासंदर्भात आवश्यक उपाय योजनांवरही चर्चा केली जाईल.

काय म्हणाले प्रचार प्रमुख? - प्रचार प्रमुख सुनील आंबेडकर म्हणाले, "आम्ही केरळमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची बैठक घेत आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 90 सदस्यांसह 32 संघटनांचे 320 सदस्य या बैठकीत विचारविनिमय करतील. आम्ही निमंत्रितांकडून (राष्ट्रीय अध्यक्ष, संस्थेचे सचिव, पदाधिकारी) फीडबॅक घेऊ आणि जमिनीवरील परिस्थितीवर चर्चा करू. प्रत्येक संस्था त्या-त्या क्षेत्रातील अनुभव, त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि त्यांच्या निरीक्षणांचे आदान प्रदानही करतील."

आंबेकर पुढे म्हणाले, "राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे, राष्ट्रीय सुरक्षा, वर्तमान काळातील मुद्दे, घटना घडामोडी, काही राज्यांचे मुद्दे, काही राज्यातील चिंताजनक मुद्दे आदींवर चर्चा केली जाईल. समन्वय आणखी चांगला कशा प्रकारे करता येईल यावरही चर्चा होईल. तीन दिवसांत अेक सत्र होतील." या शिवाय, "आम्ही 2025 विजयादशमी ते 2026 विजयादशमी पर्यंत शताब्दी वर्ष साजरे करणार आहोत, याअंतर्गत आम्ही मोठ्या प्रमाणावर सामाजिक परिवर्तनाचे मुद्दे मांडणार आहोत. पंच परिवर्तनावर काम केले जाईल. यात, सामाजिक समरसता, कुंटुंब जागरण, पर्यावरणविषयक समस्या, आत्मसन्मान आणि नागरी कर्तव्य यांचा समावेश असेल. विजयादशमी 2025 रोजी हे पाचही उपक्रम आरएसएसकडून मोठ्या प्रमाणावर सुरू केले जातील," असेही ते म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघKeralaकेरळMohan Bhagwatमोहन भागवतJ P Naddaजगत प्रकाश नड्डा